शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 10:25 IST

Vinod Tawde Sindhudurg-देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.

ठळक मुद्देमोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप  आंदोलनजीवी लोक विविध मुद्द्यावर आंदोलने घडवतात

कणकवली: गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले. त्यात जीएसटी, एपीएमसी यांचा समावेश आहे. हे सगळे विषय काँग्रेसला करायचे होते.त्यांना हे निर्णय घेता आले नाहीत.पण कणखर मोदी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत.मात्र, आता काँग्रेस व इतर विरोधी पक्ष त्यालाच विरोध करीत आहेत.देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे.यावेळी बँक संचालक अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, बबलू सावंत,मेघा गांगण,पूजा कर्पे, संतोष पूजारे,समर्थ राणे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.विनोद तावडे म्हणाले, कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांपैकी पंजाब व छत्तीसगडमधील कॉग्रेस सरकारने अदानी बरोबर त्यांच्या राज्यात करार केले आहेत .देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका मैदान दिले. तर त्याबद्दल विरोधकांनी टीका सुरू केली.पण देशात २७ हून अधिक मैदानाना राजीव गांधी,इंदिरा गांधी,जवाहरलाल नेहरु यांचे नाव आहे. त्याबद्दल काँग्रेसवाले काहीच बोलत नाहीत. असा टोला विनोद तावडे यांनी यावेळी लगावला.देशात महात्मा गांधी,जयप्रकाश नारायण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनात केव्हाच हिंसा नव्हती.आता आंदोलने होतात,तेच तेच लोक आंदोलनात दिसतात. एकत्रितपणे ठरवून आंदोलने करतात.त्यांना आंदोलनजीवी लोक असे नाव ठेवले आहे . दिल्ली येथे रस्त्यावर बसून आंदोलकांनी जनजीवन विस्कळीत केले .त्यांना मैदानात आंदोलन करता आले असते. पण तसे झाले नाही.त्या आंदोलकांवर भाजपचे सरकार काही अन्याय करतेय का ?यासाठीही काहीजण प्रयत्न करीत आहेत. आंदोलन भडकविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांना ते शक्य झालेले नाही.मोदी सरकार गेली ७ वर्षे आहे. त्यात एक तरी भ्रष्टाचारी व्यक्ती दाखवावी . तेही करता येत नाही . त्यामुळे एक प्रकारे विरोधाला फक्त विरोध करण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबिले आहे. असेही विनोद तावडे यावेळी म्हणाले. 

 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेsindhudurgसिंधुदुर्ग