शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 10:25 IST

Vinod Tawde Sindhudurg-देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.

ठळक मुद्देमोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप  आंदोलनजीवी लोक विविध मुद्द्यावर आंदोलने घडवतात

कणकवली: गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले. त्यात जीएसटी, एपीएमसी यांचा समावेश आहे. हे सगळे विषय काँग्रेसला करायचे होते.त्यांना हे निर्णय घेता आले नाहीत.पण कणखर मोदी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत.मात्र, आता काँग्रेस व इतर विरोधी पक्ष त्यालाच विरोध करीत आहेत.देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे.यावेळी बँक संचालक अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, बबलू सावंत,मेघा गांगण,पूजा कर्पे, संतोष पूजारे,समर्थ राणे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.विनोद तावडे म्हणाले, कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांपैकी पंजाब व छत्तीसगडमधील कॉग्रेस सरकारने अदानी बरोबर त्यांच्या राज्यात करार केले आहेत .देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका मैदान दिले. तर त्याबद्दल विरोधकांनी टीका सुरू केली.पण देशात २७ हून अधिक मैदानाना राजीव गांधी,इंदिरा गांधी,जवाहरलाल नेहरु यांचे नाव आहे. त्याबद्दल काँग्रेसवाले काहीच बोलत नाहीत. असा टोला विनोद तावडे यांनी यावेळी लगावला.देशात महात्मा गांधी,जयप्रकाश नारायण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनात केव्हाच हिंसा नव्हती.आता आंदोलने होतात,तेच तेच लोक आंदोलनात दिसतात. एकत्रितपणे ठरवून आंदोलने करतात.त्यांना आंदोलनजीवी लोक असे नाव ठेवले आहे . दिल्ली येथे रस्त्यावर बसून आंदोलकांनी जनजीवन विस्कळीत केले .त्यांना मैदानात आंदोलन करता आले असते. पण तसे झाले नाही.त्या आंदोलकांवर भाजपचे सरकार काही अन्याय करतेय का ?यासाठीही काहीजण प्रयत्न करीत आहेत. आंदोलन भडकविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांना ते शक्य झालेले नाही.मोदी सरकार गेली ७ वर्षे आहे. त्यात एक तरी भ्रष्टाचारी व्यक्ती दाखवावी . तेही करता येत नाही . त्यामुळे एक प्रकारे विरोधाला फक्त विरोध करण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबिले आहे. असेही विनोद तावडे यावेळी म्हणाले. 

 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेsindhudurgसिंधुदुर्ग