शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाणी प्रकल्पाला विरोध, कोनशी भालावल ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:24 IST

कोनशी येथे नव्याने पाण्याचा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पासाठी तब्बल १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. दिवसाला पाच लाख लीटर पाणी या प्रकल्पासाठी वापरले जाणार असून, प्रकल्प झाल्यास कोनशी भालावल गावावर पाण्याचे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचा कोनशी पाणी प्रकल्पाला विरोधकोनशी भालावल ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

सावंतवाडी : कोनशी येथे नव्याने पाण्याचा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पासाठी तब्बल १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. दिवसाला पाच लाख लीटर पाणी या प्रकल्पासाठी वापरले जाणार असून, प्रकल्प झाल्यास कोनशी भालावल गावावर पाण्याचे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

हा प्रकल्प प्रशासनाने आठवड्यात रद्द करावा. अन्यथा आम्ही ७ जूनला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा कोनशी भालावल ग्रामस्थांनी दिला असून, याबाबतचे निवेदन महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांना दिला आहे.यावेळी भालावल उपसरपंच समीर परब, दिलीप गवस, गंगाराम नाईक, विठ्ठल गवस, सिद्धेश गवस, न्हानू सावंत, दीपक गवस, प्रविण सावंत, भरत सावंत, राजन गवस, लक्ष्मण गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कोनशी येथे नव्याने पाणी बॉटल प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी झाले होते. पण या प्रकल्पाला कोनशी व भालावल ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.हा प्रकल्प झाला तर पाणीटंचाई भासेल. प्रकल्प उभारण्यासाठी खासगी जागेत १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतकडून आठ वर्षापूर्वी परवानगी घेण्यात आली होती. त्या आधारे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पण याला गावातील लोकांची परवानगी घेण्यात आली नाही. ८० टक्के ग्रामस्थ विरोधात आहेत. त्यामुळे हा प्रकल्प त्वरीत रद्द झाला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.स्वाभिमान पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी : परबमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोनशी भालावल ग्रामस्थांच्या पाठीशी राहाणार आहे. कारण हा प्रकल्प अन्यायकारक असाच आहे. जर दिवसाला पाच लाख लीटर पाणी वापरण्यास सुरूवात केली तर पाणी कसे पुरेल असा सवाल ही यावेळी संजू परब यांनी केला असून, ग्रामस्थ जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आम्ही पाठीबा देऊ, निर्सगाशी कोणीही खेळ करण्याचा प्रयत्न करू नये असेही परब यांनी सांगितले.आठ दिवसांत प्रकल्प रद्द कराजर हा प्रकल्प झाला तर आम्हाला पाणी मिळणार नाही. तसेच बागायतींमधील झाडे मरून जातील याला जबाबदार कोण असा सवाल करत या प्रकल्पातून दिवसाला पाच लाख लीटर पाण्याचा वापर केला जाईल असे झाले तर पिण्यासाठी ही पाणी मिळणार नाही. त्यामुळे प्रकल्पाला आमचा कायम विरोध राहाणार आहे. तसेच प्रसंगी या प्रकल्पाविरोधात उपोषणास बसणार असून प्रशासनाने येत्या आठ दिवसांत प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ही यावेळी ग्रामस्थांनी केली आहे 

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग