शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

पाणी प्रकल्पाला विरोध, कोनशी भालावल ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:24 IST

कोनशी येथे नव्याने पाण्याचा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पासाठी तब्बल १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. दिवसाला पाच लाख लीटर पाणी या प्रकल्पासाठी वापरले जाणार असून, प्रकल्प झाल्यास कोनशी भालावल गावावर पाण्याचे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचा कोनशी पाणी प्रकल्पाला विरोधकोनशी भालावल ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

सावंतवाडी : कोनशी येथे नव्याने पाण्याचा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पासाठी तब्बल १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. दिवसाला पाच लाख लीटर पाणी या प्रकल्पासाठी वापरले जाणार असून, प्रकल्प झाल्यास कोनशी भालावल गावावर पाण्याचे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

हा प्रकल्प प्रशासनाने आठवड्यात रद्द करावा. अन्यथा आम्ही ७ जूनला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा कोनशी भालावल ग्रामस्थांनी दिला असून, याबाबतचे निवेदन महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांना दिला आहे.यावेळी भालावल उपसरपंच समीर परब, दिलीप गवस, गंगाराम नाईक, विठ्ठल गवस, सिद्धेश गवस, न्हानू सावंत, दीपक गवस, प्रविण सावंत, भरत सावंत, राजन गवस, लक्ष्मण गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कोनशी येथे नव्याने पाणी बॉटल प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी झाले होते. पण या प्रकल्पाला कोनशी व भालावल ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.हा प्रकल्प झाला तर पाणीटंचाई भासेल. प्रकल्प उभारण्यासाठी खासगी जागेत १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतकडून आठ वर्षापूर्वी परवानगी घेण्यात आली होती. त्या आधारे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पण याला गावातील लोकांची परवानगी घेण्यात आली नाही. ८० टक्के ग्रामस्थ विरोधात आहेत. त्यामुळे हा प्रकल्प त्वरीत रद्द झाला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.स्वाभिमान पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी : परबमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोनशी भालावल ग्रामस्थांच्या पाठीशी राहाणार आहे. कारण हा प्रकल्प अन्यायकारक असाच आहे. जर दिवसाला पाच लाख लीटर पाणी वापरण्यास सुरूवात केली तर पाणी कसे पुरेल असा सवाल ही यावेळी संजू परब यांनी केला असून, ग्रामस्थ जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आम्ही पाठीबा देऊ, निर्सगाशी कोणीही खेळ करण्याचा प्रयत्न करू नये असेही परब यांनी सांगितले.आठ दिवसांत प्रकल्प रद्द कराजर हा प्रकल्प झाला तर आम्हाला पाणी मिळणार नाही. तसेच बागायतींमधील झाडे मरून जातील याला जबाबदार कोण असा सवाल करत या प्रकल्पातून दिवसाला पाच लाख लीटर पाण्याचा वापर केला जाईल असे झाले तर पिण्यासाठी ही पाणी मिळणार नाही. त्यामुळे प्रकल्पाला आमचा कायम विरोध राहाणार आहे. तसेच प्रसंगी या प्रकल्पाविरोधात उपोषणास बसणार असून प्रशासनाने येत्या आठ दिवसांत प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ही यावेळी ग्रामस्थांनी केली आहे 

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग