शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रकल्पाला विरोध, कोनशी भालावल ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:24 IST

कोनशी येथे नव्याने पाण्याचा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पासाठी तब्बल १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. दिवसाला पाच लाख लीटर पाणी या प्रकल्पासाठी वापरले जाणार असून, प्रकल्प झाल्यास कोनशी भालावल गावावर पाण्याचे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचा कोनशी पाणी प्रकल्पाला विरोधकोनशी भालावल ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

सावंतवाडी : कोनशी येथे नव्याने पाण्याचा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पासाठी तब्बल १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. दिवसाला पाच लाख लीटर पाणी या प्रकल्पासाठी वापरले जाणार असून, प्रकल्प झाल्यास कोनशी भालावल गावावर पाण्याचे संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.

हा प्रकल्प प्रशासनाने आठवड्यात रद्द करावा. अन्यथा आम्ही ७ जूनला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा कोनशी भालावल ग्रामस्थांनी दिला असून, याबाबतचे निवेदन महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांना दिला आहे.यावेळी भालावल उपसरपंच समीर परब, दिलीप गवस, गंगाराम नाईक, विठ्ठल गवस, सिद्धेश गवस, न्हानू सावंत, दीपक गवस, प्रविण सावंत, भरत सावंत, राजन गवस, लक्ष्मण गवस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कोनशी येथे नव्याने पाणी बॉटल प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी झाले होते. पण या प्रकल्पाला कोनशी व भालावल ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.हा प्रकल्प झाला तर पाणीटंचाई भासेल. प्रकल्प उभारण्यासाठी खासगी जागेत १७ बोअरवेल्स मारण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतकडून आठ वर्षापूर्वी परवानगी घेण्यात आली होती. त्या आधारे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पण याला गावातील लोकांची परवानगी घेण्यात आली नाही. ८० टक्के ग्रामस्थ विरोधात आहेत. त्यामुळे हा प्रकल्प त्वरीत रद्द झाला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.स्वाभिमान पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी : परबमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कोनशी भालावल ग्रामस्थांच्या पाठीशी राहाणार आहे. कारण हा प्रकल्प अन्यायकारक असाच आहे. जर दिवसाला पाच लाख लीटर पाणी वापरण्यास सुरूवात केली तर पाणी कसे पुरेल असा सवाल ही यावेळी संजू परब यांनी केला असून, ग्रामस्थ जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आम्ही पाठीबा देऊ, निर्सगाशी कोणीही खेळ करण्याचा प्रयत्न करू नये असेही परब यांनी सांगितले.आठ दिवसांत प्रकल्प रद्द कराजर हा प्रकल्प झाला तर आम्हाला पाणी मिळणार नाही. तसेच बागायतींमधील झाडे मरून जातील याला जबाबदार कोण असा सवाल करत या प्रकल्पातून दिवसाला पाच लाख लीटर पाण्याचा वापर केला जाईल असे झाले तर पिण्यासाठी ही पाणी मिळणार नाही. त्यामुळे प्रकल्पाला आमचा कायम विरोध राहाणार आहे. तसेच प्रसंगी या प्रकल्पाविरोधात उपोषणास बसणार असून प्रशासनाने येत्या आठ दिवसांत प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ही यावेळी ग्रामस्थांनी केली आहे 

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग