शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

नेत्यांना खूश करण्यासाठी विरोधकांनी रचलाय बनाव: राजेंद्र राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 20:20 IST

वैभववाडी तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये 75 सदस्य बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी सर्वाधिक 27 सदस्य भाजपाचे आहेत. परंतु नेत्यांना खूश करण्यासाठी विरोधकांनी बिनविरोध 75 पैकी 59 सदस्य आपले असल्याचा बनाव रचला आहे.

वैभववाडी(सिंधुदुर्ग ): तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये 75 सदस्य बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी सर्वाधिक 27 सदस्य भाजपाचे आहेत. परंतु नेत्यांना खूश करण्यासाठी विरोधकांनी बिनविरोध 75 पैकी 59 सदस्य आपले असल्याचा बनाव रचला आहे. प्रत्यक्षात योग्य उमेदवार मिळाले नसल्याने विरोधकांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली असून काहींच्या अपत्यांची खोटी शपथपत्रे दाखल केली आहेत, असा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या 125 सदस्यांपैकी 8 जागा रिक्त राहिल्या असून उर्वरित 117 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अर्ज माघारीनंतर तब्बल 75 सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे चित्र स्पष्ट होताच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे बिनविरोध सदस्यांच्या संख्येवरून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. बिनविरोध 75 पैकी 59 सदस्य समर्थ विकास पॅनेलचे असल्याचा दावा राणे समर्थक पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे यांनी माध्यमांकडे केला होता. त्यांचा दावा खोडून काढताना समर्थ विकास पॅनेलचे 25 सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट करीत 'समर्थ'पेक्षा भाजपाचे 2 सदस्य अधिक असल्यानचे राणे यांनी पत्रकात नमूद केले आहे.पत्रकात राजेंद्र राणे यांनी पुढे म्हटले आहे की, काही गावात भाजपाने ग्रामविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ग्रामविकास आघाडीचे 17 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे बिनविरोध 75 सदस्यांपैकी 59 समर्थ विकास पॅनेलचे असल्याचा विरोधकांचा दावा म्हणजे आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी रचलेला निव्वळ बनाव आहे. तसेच सरपंचपदासाठी 10 गावांत भाजपाचे उमेदवार असून 6 ठिकाणी ग्रामविकास आघाडीला भाजपाचा उघड पाठिंबा आहे.आता निवडणूक लागलेल्या 17 पैकी 15 ग्रामपंचायतींवर अनेक वर्षे विरोधकांकडे तर केवळ 2 ग्रामपंचायती भाजप-शिवसेनेकडे होत्या. त्यामुळे आम्ही सर्व गावात ताकदीने उभे राहत पॅनेल केली हेच आमचे यश आहे. गावातील लोकांना आपला सरपंच थेट निवडून देण्याचा अधिकार भाजपनेच जनतेला दिला आहे. त्यामुळे जनता भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास राजेंद्र राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.हा 'त्यांचा' नैतिक पराभवअनेक वर्षे ग्रामपंचायतीची सत्ता असणा-यांपेक्षा भाजपचे बिनविरोध सदस्य अधिक आहेत. तर हा त्यांचा नैतिक पराभव आहे, अशी टीका करीत ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच उंबर्डे मेहबूबनगर येथून ज्युलेखा नासीर सारंग यांना आणि कोळपे येथून नजिया साजिद पाटणकर यांच्या रुपाने मुस्लिम समाजाचे सदस्य भाजपाने बिनविरोध निवडून आणले आहेत. तर नावळेत बिनविरोध निवडून आलेल्या 6 पैकी 4 सदस्य भाजपाचे आहेत. सडुरेतील 7 पैकी 5, निमअरुळेत 5 व जांभवडेत 6 पैकी 3 सदस्य भाजपाचे आहेत. अरुळे गावातील सरपंचपदाचे तिन्ही उमेदवार भाजपा-शिवसेना विचाराचे आहेत,असा दावा राजेंद्र राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

टॅग्स :BJPभाजपा