शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

कुडासे गावाच्या विभाजनास विरोध, अधिसूचना रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप अधिसूचनेनुसार केलेल्या कुडासे गावच्या विभाजनास कुडासे ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारलेली अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कुडासे येथील सातेरी भावई मंदिरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठळक मुद्देकुडासे गावाच्या विभाजनास विरोध, अधिसूचना रद्द करावी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दोडामार्ग : जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप अधिसूचनेनुसार केलेल्या कुडासे गावच्या विभाजनास कुडासे ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारलेली अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कुडासे येथील सातेरी भावई मंदिरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.ग्रामस्थांच्यावतीने गणपत (राजन) देसाई यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, सरपंच आणि त्यांचे पती जे विद्यमान सदस्य आहेत, त्यांनी मिळून हे कट कारस्थान केले आहे. त्यांनी शासनाला चुकीची माहिती दिली. तिलारी नदीवर दहा कोटी रुपये खर्चून भला मोठा पूल बांधण्यात आला आहे. शिवाय गावात आठ कॉजवे आहेत. असे असताना वानोशीतून कुडासेत जायला बारा ते सोळा किलोमीटर अंतर पडते, अशी चुकीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे .तिलारी नदीमुळे भौगोलिकदृष्ट्या गावाचे दोन भाग होत असले तरी गाव विभाजनाची मागणी कुणीही केली नव्हती. २००४ मध्ये झालेल्या ग्रामसभेतही गाव विभाजनाच्या विरोधाचा एकमुखी ठराव घेण्यात आला होता. मात्र, २०१७ मध्ये वानोशीवाडी येथे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात प्रभाग सभा घेण्यात आली.

यावेळी आयत्या वेळच्या विषयात विभाजनासंदर्भात ठराव घेण्यात आला. त्याला उपसरपंच हरी देसाई यांनी आक्षेप घेत गाव विभाजनाच्या विषयावर संपूर्ण गावाची स्वतंत्र सभा घेण्याची मागणी केली. तसा ठरावही सर्वानुमते मंजूर केला. त्यानंतर तहकूब मासिक सभेत ९ पैकी केवळ ३ सदस्य उपस्थित असताना गाव विभाजनाचा ठराव घेण्यात आल्याचे दाखविण्यात आले. त्याला सूचक आणि अनुमोदक सरपंच आणि सरपंचांचे पती या दोघांनीच संमती दिली.सरपंचांकडून प्रशासनाला चुकीची माहितीएकंदरीत सरपंच आणि त्यांचे पती या दोघांनी आपल्या पदाचा गैरवापर करून प्रशासनाला चुकीची माहिती दिली. तसेच गावातील लोकांना माहिती न देता परस्पर ठराव मांडले गेले. प्रशासनानेही संपूर्ण गावाचा विभाजनाला असलेला विरोध लक्षात घेतला नाही. त्यामुळेच चुकीच्या पद्धतीने गावावर अन्याय करणारी अधिसूचना प्रसिध्दी करण्यात आली असून, ती रद्द करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली .चुकीच्या प्रकारची अधिसूचनागाव विभाजनामुळे धनगरवाडी, देवमळावाडी व वानोशीवाडी असा कुडासे गाव बनणार असला तरी त्या वाडीतील बहुसंख्य गावकऱ्यांना विभाजन नको आहे. त्यासाठी आक्षेपाच्या पत्रावर त्यांनी सह्याही केल्या आहेत. कुडासे गाव म्हणून आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि यापुढेही राहणार. त्यामुळे प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने काढलेली अधिसूचना रद्द करून गावातील शांतता अबाधित ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग