शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

कुडासे गावाच्या विभाजनास विरोध, अधिसूचना रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप अधिसूचनेनुसार केलेल्या कुडासे गावच्या विभाजनास कुडासे ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारलेली अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कुडासे येथील सातेरी भावई मंदिरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठळक मुद्देकुडासे गावाच्या विभाजनास विरोध, अधिसूचना रद्द करावी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दोडामार्ग : जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप अधिसूचनेनुसार केलेल्या कुडासे गावच्या विभाजनास कुडासे ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारलेली अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कुडासे येथील सातेरी भावई मंदिरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.ग्रामस्थांच्यावतीने गणपत (राजन) देसाई यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, सरपंच आणि त्यांचे पती जे विद्यमान सदस्य आहेत, त्यांनी मिळून हे कट कारस्थान केले आहे. त्यांनी शासनाला चुकीची माहिती दिली. तिलारी नदीवर दहा कोटी रुपये खर्चून भला मोठा पूल बांधण्यात आला आहे. शिवाय गावात आठ कॉजवे आहेत. असे असताना वानोशीतून कुडासेत जायला बारा ते सोळा किलोमीटर अंतर पडते, अशी चुकीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे .तिलारी नदीमुळे भौगोलिकदृष्ट्या गावाचे दोन भाग होत असले तरी गाव विभाजनाची मागणी कुणीही केली नव्हती. २००४ मध्ये झालेल्या ग्रामसभेतही गाव विभाजनाच्या विरोधाचा एकमुखी ठराव घेण्यात आला होता. मात्र, २०१७ मध्ये वानोशीवाडी येथे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात प्रभाग सभा घेण्यात आली.

यावेळी आयत्या वेळच्या विषयात विभाजनासंदर्भात ठराव घेण्यात आला. त्याला उपसरपंच हरी देसाई यांनी आक्षेप घेत गाव विभाजनाच्या विषयावर संपूर्ण गावाची स्वतंत्र सभा घेण्याची मागणी केली. तसा ठरावही सर्वानुमते मंजूर केला. त्यानंतर तहकूब मासिक सभेत ९ पैकी केवळ ३ सदस्य उपस्थित असताना गाव विभाजनाचा ठराव घेण्यात आल्याचे दाखविण्यात आले. त्याला सूचक आणि अनुमोदक सरपंच आणि सरपंचांचे पती या दोघांनीच संमती दिली.सरपंचांकडून प्रशासनाला चुकीची माहितीएकंदरीत सरपंच आणि त्यांचे पती या दोघांनी आपल्या पदाचा गैरवापर करून प्रशासनाला चुकीची माहिती दिली. तसेच गावातील लोकांना माहिती न देता परस्पर ठराव मांडले गेले. प्रशासनानेही संपूर्ण गावाचा विभाजनाला असलेला विरोध लक्षात घेतला नाही. त्यामुळेच चुकीच्या पद्धतीने गावावर अन्याय करणारी अधिसूचना प्रसिध्दी करण्यात आली असून, ती रद्द करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली .चुकीच्या प्रकारची अधिसूचनागाव विभाजनामुळे धनगरवाडी, देवमळावाडी व वानोशीवाडी असा कुडासे गाव बनणार असला तरी त्या वाडीतील बहुसंख्य गावकऱ्यांना विभाजन नको आहे. त्यासाठी आक्षेपाच्या पत्रावर त्यांनी सह्याही केल्या आहेत. कुडासे गाव म्हणून आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि यापुढेही राहणार. त्यामुळे प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने काढलेली अधिसूचना रद्द करून गावातील शांतता अबाधित ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग