शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

शिवसेनेसमोर जनमत टिकविण्याचे आव्हान

By admin | Updated: June 10, 2014 01:36 IST

काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला : नारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष

रजनीकांत कदम ल्ल कुडाळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ- मालवण मतदारसंघाचे सत्ताधारी काँॅग्रेस पक्षाला या मतदार संघामध्ये घसरलेली मतांची टक्केवारी व जनमत राखण्याचे आव्हान असणार आहे. तर शिवसेना प्रणित महायुतीला त्यांच्या बाजूने असलेले आशाभूत जनमत विधानसभेपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान राहणार आहे. एकंदरीत, या मतदारसंघात सद्यस्थितीत शिवसेनेचे पारडे जड असल्याने काँग्रेस पक्षाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. दरम्यान, उद्योगमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. कुडाळच्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष टाकले असता, या मतदारसंघात कुडाळ व मालवण हे दोन तालुके येतात. राज्यात नव्यानेच हा मतदारसंघ इतर मतदारसंघांच्या तुलनेत कमी लोकसंख्येचा आहे. या मतदारसंघात पहिला आमदार होण्याचा मान जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी मिळविला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांचे सिंहावलोकन केले असता काही गोष्टी प्रामुख्याने निदर्शनास येतात. गेल्या निवडणुकीमध्ये काँगे्रसचे पक्षाचे उमेदवारी नारायण राणे हे शिवसेनेच्या नवखा उमेदवार वैभव नाईक समोर उभा असताना २४ हजार ४00 मतांनी निवडून आले होते. त्यांच्या मागील निवडणुकीच्या मताधिक्याच्या मनाने हे खूपच कमी होते. याचवेळी कुडाळ तालुक्यातील काही भागांमधून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. या मतदारसंघातील सद्यस्थिती पाहता, काँग्रेस पक्षाला मोठे आव्हान राहणार आहे. कारण या मतदारसंघात विविध कारणांमुळे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आणि जनमत घसरलेले आहे. कारण कुडाळ तालुक्यातील आकारीपड, वनसंज्ञा तसेच एमआयडीसी व इतर रखडलेले प्रकल्प, मालवणमधील वादग्रस्त सी-वर्ल्ड प्रकल्प, चिपी विमानतळ आदी वादग्रस्त प्रकल्प, मच्छिमारांचे न सुटलेले प्रश्न, दोन्ही तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे न सुटलेले प्रश्न, गौण खनिज बंदीमुळे व्यावसायिक व जनतेचे झालेले हाल, तसेच अन्य अनेक अपूर्ण प्रकल्प, तसेच विकासकामांची खालावलेली प्रतवारी व आता मोदी सरकार व महायुतीच्या प्रभावामुळे काँग्रेसला या ठिकाणी आव्हान टिकविणे कठीण जाणार आहे. या मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठी उभारी घेतली आहे. वैभव नाईक हे या मतदारसंघातून २३,९५२ मतांनी नारायण राणे विरोधात पराभूत झाले होते. परंतु त्यानंतर मागील ५ ते ६ वर्षात त्यांनी या दोन्ही तालुक्यांमध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी विशेष लक्ष पुरविले आहे. याच मतदारसंघातून पुढील विधानसभा लढविण्याचा निर्धार करून त्यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. गावागावात शाखा उभारून कार्यकर्त्यांना संघटीत केले. याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांना २१, ८८३ हजारांचे मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले. सत्ताधाऱ्यांनी न सोडविलेल्या अनेक प्रश्नांमुळे येथील जनता शिवसेनेकडे आशाभूत नजरेने पहात आहे. केंद्रातही भाजप आल्याने या परिवर्तन लाटेचा परिणाम राज्यातही होईल, असा जनतेचा दृष्टीकोन आहे. लोकसभेत काँग्रेसचे घटलेले मताधिक्य सेनेच्या बाजूने जाईल, यात शंका नाही. शिवसेनेकडून येथील जनतेसाठी लोकाभिमुख व विकासात्मक अजेंडा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मालवण व कुडाळ शहरांमध्येही शिवसेनेच्या बाजूने मताधिक्य वाढले असून हे मताधिक्यच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा मतदारसंघातून काँगे्रेस पक्षाची येथून पिछेहाट झाली असली तरी या पिछेहाटीचा अभ्यास करून येथील काँगे्रस पदाधिकारी नेते पुन्हा एकदा पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करू शकतात. कारण काँग्रेसमधील महत्त्वाचे पदाधिकारी व नेते या दोन तालुक्यातील असून त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. लोकसभेत झालेली पिछेहाट भरून काढण्यासाठी काँग्रेस पक्ष जोमाने काम करणार आहे.