शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेसमोर जनमत टिकविण्याचे आव्हान

By admin | Updated: June 10, 2014 01:36 IST

काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला : नारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष

रजनीकांत कदम ल्ल कुडाळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ- मालवण मतदारसंघाचे सत्ताधारी काँॅग्रेस पक्षाला या मतदार संघामध्ये घसरलेली मतांची टक्केवारी व जनमत राखण्याचे आव्हान असणार आहे. तर शिवसेना प्रणित महायुतीला त्यांच्या बाजूने असलेले आशाभूत जनमत विधानसभेपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान राहणार आहे. एकंदरीत, या मतदारसंघात सद्यस्थितीत शिवसेनेचे पारडे जड असल्याने काँग्रेस पक्षाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. दरम्यान, उद्योगमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. कुडाळच्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष टाकले असता, या मतदारसंघात कुडाळ व मालवण हे दोन तालुके येतात. राज्यात नव्यानेच हा मतदारसंघ इतर मतदारसंघांच्या तुलनेत कमी लोकसंख्येचा आहे. या मतदारसंघात पहिला आमदार होण्याचा मान जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी मिळविला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांचे सिंहावलोकन केले असता काही गोष्टी प्रामुख्याने निदर्शनास येतात. गेल्या निवडणुकीमध्ये काँगे्रसचे पक्षाचे उमेदवारी नारायण राणे हे शिवसेनेच्या नवखा उमेदवार वैभव नाईक समोर उभा असताना २४ हजार ४00 मतांनी निवडून आले होते. त्यांच्या मागील निवडणुकीच्या मताधिक्याच्या मनाने हे खूपच कमी होते. याचवेळी कुडाळ तालुक्यातील काही भागांमधून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. या मतदारसंघातील सद्यस्थिती पाहता, काँग्रेस पक्षाला मोठे आव्हान राहणार आहे. कारण या मतदारसंघात विविध कारणांमुळे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आणि जनमत घसरलेले आहे. कारण कुडाळ तालुक्यातील आकारीपड, वनसंज्ञा तसेच एमआयडीसी व इतर रखडलेले प्रकल्प, मालवणमधील वादग्रस्त सी-वर्ल्ड प्रकल्प, चिपी विमानतळ आदी वादग्रस्त प्रकल्प, मच्छिमारांचे न सुटलेले प्रश्न, दोन्ही तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे न सुटलेले प्रश्न, गौण खनिज बंदीमुळे व्यावसायिक व जनतेचे झालेले हाल, तसेच अन्य अनेक अपूर्ण प्रकल्प, तसेच विकासकामांची खालावलेली प्रतवारी व आता मोदी सरकार व महायुतीच्या प्रभावामुळे काँग्रेसला या ठिकाणी आव्हान टिकविणे कठीण जाणार आहे. या मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठी उभारी घेतली आहे. वैभव नाईक हे या मतदारसंघातून २३,९५२ मतांनी नारायण राणे विरोधात पराभूत झाले होते. परंतु त्यानंतर मागील ५ ते ६ वर्षात त्यांनी या दोन्ही तालुक्यांमध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी विशेष लक्ष पुरविले आहे. याच मतदारसंघातून पुढील विधानसभा लढविण्याचा निर्धार करून त्यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. गावागावात शाखा उभारून कार्यकर्त्यांना संघटीत केले. याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांना २१, ८८३ हजारांचे मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले. सत्ताधाऱ्यांनी न सोडविलेल्या अनेक प्रश्नांमुळे येथील जनता शिवसेनेकडे आशाभूत नजरेने पहात आहे. केंद्रातही भाजप आल्याने या परिवर्तन लाटेचा परिणाम राज्यातही होईल, असा जनतेचा दृष्टीकोन आहे. लोकसभेत काँग्रेसचे घटलेले मताधिक्य सेनेच्या बाजूने जाईल, यात शंका नाही. शिवसेनेकडून येथील जनतेसाठी लोकाभिमुख व विकासात्मक अजेंडा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मालवण व कुडाळ शहरांमध्येही शिवसेनेच्या बाजूने मताधिक्य वाढले असून हे मताधिक्यच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा मतदारसंघातून काँगे्रेस पक्षाची येथून पिछेहाट झाली असली तरी या पिछेहाटीचा अभ्यास करून येथील काँगे्रस पदाधिकारी नेते पुन्हा एकदा पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करू शकतात. कारण काँग्रेसमधील महत्त्वाचे पदाधिकारी व नेते या दोन तालुक्यातील असून त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. लोकसभेत झालेली पिछेहाट भरून काढण्यासाठी काँग्रेस पक्ष जोमाने काम करणार आहे.