शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विकासनिधीवर फक्त जनतेचाच अधिकार -विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 6:38 PM

वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो.

ठळक मुद्देश्री आदिष्टी देवी मंदिर आवारात बसविलेल्या हायमास्टचे लोकार्पण

वैभववाडी : रस्ते, पाणी याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. विकासनिधी जनतेचा असून या निधीवर सर्वस्वी जनतेचाच अधिकार असतो. त्यामुळे जनतेला अपेक्षित कामेच या निधीतून झाली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे लोकोपयोगी कामांची निवड करून ती पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी खांबाळे येथे केले.खांबाळे येथील श्री देवी आदिष्टी मंदिर परिसरात खासदार निधीतून उभारलेल्या हायमास्टचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कणकवली विधानसभाप्रमुख शैलेश भोगले, नागेंद्र परब, तालुकाप्रमुख मंगेश लोके, रमेश तावडे, नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, सरपंच संचिता गुरव, उपसरपंच लवू साळुंखे, बबन पवार, सूर्याजी पवार, सुनील पवार, शांताराम कदम, अशोक पवार, संजय साळुंखे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले की, विकासनिधीवर फक्त जनतेचाच हक्क असतो. त्यामुळे तुम्ही फक्त विकासकामे सूचवा. ती मार्गी लावण्याचे काम आमचे आहे. तळागाळापर्यंत विकास पोहोचविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. येथील शेतकºयांच्या आंबा, काजूला चांगला दर मिळाला पाहिजे. काजूला चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. काजू बोर्डाला निधी मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अधिकाधिक समस्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा विकासाकरीता आणलाआहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासाला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शैलेश भोगले यांनी मनोगत व्यक्त केले. श्री आदिष्टी देवी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष बबन पाटील यांच्या हस्ते खासदार राऊत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ऊस संशोधन केंद्रासाठी प्रयत्नशील!वैभववाडी तालुक्यातील शेतकरी ऊस शेतीकडे वळला आहे. तालुक्यात ऊस कारखाना झाला असता तर ऊसाचे क्षेत्र आणखी वाढले असते. परंतु दोघांच्या भांडणामुळे कारखाना होऊ शकला नाही. ऊसशेतीची शास्त्रीय माहिती मिळावी या हेतूने ऊस संशोधन केंद्र होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिराच्या आवारात बसविण्यात आलेल्या हायमास्टच्या उद्घाटनानंतर खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.