शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना 'शॉक' ट्रीटमेंट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:56 IST

mahavitaran NiteshRane Sindhudurg- पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्र्यांच्या आदेशाला वीज अधिकाऱ्यांनी भीक घातलेली नाही. मात्र, अशी अरेरावी करणाऱ्या विजअधिकाऱ्यांना वेगळ्या प्रकारे 'शॉक ट्रीटमेंट' भाजपा कार्यकर्ते देतील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देअरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना 'शॉक' ट्रीटमेंट देणार नितेश राणे यांचा इशारा ; वीज जोडणी तोडण्याचा मुद्दा

कणकवली : पालकमंत्री उदय सामंत यांची जिल्हा व्यापारी संघाने भेट घेतल्यानंतर मला विचारल्याशिवाय कोणाचीही विज तोडायची नाही. असा त्यांनी मारलेला 'डायलॉग 'फसवा आहे. या डायलॉगबाजीनंतरही सोमवारी सकाळी सिंधुदुर्गात विज अधिकारी विजतोडणीसाठी फिरताना दिसून आले आहेत. त्यामुळे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्र्यांच्या आदेशाला वीज अधिकाऱ्यांनी भीक घातलेली नाही. मात्र, अशी अरेरावी करणाऱ्या विजअधिकाऱ्यांना भाजपा कार्यकर्ते वेगळ्या प्रकारे 'शॉक ट्रीटमेंट' देतील असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.कणकवली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती मेघा गांगण, गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, रवींद्र गायकवाड, विराज भोसले, किशोर राणे , बंडू गांगण आदी उपस्थित होते.यावेळी नितेश राणे म्हणाले, ठाकरे सरकार कोरोना काळात कोणालाही नुकसान भरपाई देऊ शकले नाही.तर त्यांचे मंत्रीही जनतेला फसवत आहेत. कोरोना काळात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मुंबई येथे झालेल्या मायकल जॅक्सनच्या शोला करमाफी ठाकरे सरकार देते . मात्र, सामान्य नागरिकांना विज बिलमाफी का देत नाही ? असा सवालही आमदार राणे यांनी उपस्थित केला.ते म्हणाले, मायकल जॅक्सन आणि ठाकरे कुटुंबाला एक न्याय आणि सामान्य जनतेला दुसरा न्याय असे कसे चालेल ? अन्याय होत असेल तर आम्ही जनतेच्या बाजूने आवाज उठवणार आहोत. दमदाटी करून विज जोडणी तोडली तर वीजअधिकाऱ्यांना कसा 'शॉक' द्यायचा हे भाजपा कार्यकर्त्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात या अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढे पोलीस संरक्षण द्यावे लागले तर त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही. पोलीस प्रशासन आणि सरकारच त्याला जबाबदार असेल. असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला.हा तर राजकीय कोरोना !१ मार्चला राज्य विधिमंडळ अधिवेशन आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्री कोरोना बाधित होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री नाहीत, अशी परिस्थिती सरकार मुद्दामहून निर्माण करत आहे का ? आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री छगन भुजबळ,मंत्री जयंत पाटील यांना आता कोरोना झाला आहे.त्यामुळे हा वेगळा राजकीय कोरोना तर नव्हे ना ? असा प्रश्न आम्हाला पडत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला आपण त्याबाबत संशोधन करण्यासाठी पत्र लिहणार आहे. असा टोला आमदार नितेश राणे यांनी यावेळी लगावला .फोटो - नितेश राणे

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा