शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

रिफायनरी प्रकल्प थांबविण्याची ताकद कुणात नाही, आमदार नितेश राणेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत

By सुधीर राणे | Updated: April 27, 2023 13:09 IST

'प्रकल्प उभा राहिला की हेच ठेका घेणार'

कणकवली: बारसूमध्ये सध्या माती परीक्षणाचे काम सुरू आहे. तिथे रिफायनरीचे कामही सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसहीत आम्ही सरकारचे जेवढे प्रतिनिधी आहोत, या सर्वांची भूमिका स्पष्ट आहे. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प होणार नाही. बारसू असेल वा नाणार तो भाग वगळून देवगड व राजापूरचा भाग असेल तिथे  हा प्रकल्प  होणार आहे. त्याठिकाणी  ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार असून त्याला थांबविण्याची कुणात ताकद नाही, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.रिफायनरी प्रकल्पाविषयी भूमीका स्पष्ट करण्यासाठी कणकवली येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्राचा हा मूळ प्रकल्प असल्याने त्याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे पंतप्रधान  व संबंधीत मंत्र्यांनाही भेटलेले आहेत. त्यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार त्यांच्या सोबत होते. त्यामुळे सर्वांची सहमती घेऊनच, सर्वांना विश्वासात घेऊनच केंद्र व राज्य सरकार हा प्रकल्प राबविणार आहे. त्यामुळे कुणालाही आंदोलनाची गरज भासणार नाही. विरोधाची गरज भासणार नाही.आता  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे विरोध करताना दिसत आहेत, ते स्वतःची किंमत वाढवत आहेत. खासदार राऊत आता उद्योगमंत्री उदय सामंतांवर टीका करतात. ते खासदार राऊत दिवसातून कितीवेळा उदय सामंत व किरण सामंत यांना फोन करतात व काय, काय बोलतात? याचा एकदा मी तपशिल जाहीर करणार आहे. मी खोटे बोलत असेन तर खासदार राऊत यांनी फोनचा 'सीडीआर रिपोर्ट' जाहीर करावा. एका बाजूला तुम्ही प्रकल्पाला विरोध करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उदय सामंत व त्यांच्या लोकांकडून स्वतःसाठी खर्च मागता. हे असे कसे होणार ?  विनायक राऊत व वैभव नाईक यांनी बारसू सारखीच भेट चिपी विमानतळ, सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या विरोधावेळी दिली होती. आता विमानतळ सुरू झाले. त्यावेळी उद्घाटन करण्यासाठी कोण पुढे आले? जे विरोध करीत होते तेच आले. विमानतळ सुरू झाल्यानंतर लेबर व कॅटरिंग ठेका कोण मागत होते?  ती विनायक राऊत यांचीच कंपनी होती. ब्लास्टिंग ठेका वैभव नाईक यांच्या कंपनीने घेतला. त्यामुळे त्यांचे दौरे हे लोकांसाठी नाहीत. प्रकल्प उभा राहिला की हेच ठेका घेणार आहेत. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हेच विरोध करतात व काम झाले की हेच कामे घेतात, हे कसे काय? टोलबाबतही तीच स्थिती आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प केंद्र व राज्य सरकार पूर्ण करणारच, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पNitesh Raneनीतेश राणे