शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प थांबविण्याची ताकद कुणात नाही, आमदार नितेश राणेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत

By सुधीर राणे | Updated: April 27, 2023 13:09 IST

'प्रकल्प उभा राहिला की हेच ठेका घेणार'

कणकवली: बारसूमध्ये सध्या माती परीक्षणाचे काम सुरू आहे. तिथे रिफायनरीचे कामही सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसहीत आम्ही सरकारचे जेवढे प्रतिनिधी आहोत, या सर्वांची भूमिका स्पष्ट आहे. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प होणार नाही. बारसू असेल वा नाणार तो भाग वगळून देवगड व राजापूरचा भाग असेल तिथे  हा प्रकल्प  होणार आहे. त्याठिकाणी  ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार असून त्याला थांबविण्याची कुणात ताकद नाही, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.रिफायनरी प्रकल्पाविषयी भूमीका स्पष्ट करण्यासाठी कणकवली येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्राचा हा मूळ प्रकल्प असल्याने त्याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे पंतप्रधान  व संबंधीत मंत्र्यांनाही भेटलेले आहेत. त्यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार त्यांच्या सोबत होते. त्यामुळे सर्वांची सहमती घेऊनच, सर्वांना विश्वासात घेऊनच केंद्र व राज्य सरकार हा प्रकल्प राबविणार आहे. त्यामुळे कुणालाही आंदोलनाची गरज भासणार नाही. विरोधाची गरज भासणार नाही.आता  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे विरोध करताना दिसत आहेत, ते स्वतःची किंमत वाढवत आहेत. खासदार राऊत आता उद्योगमंत्री उदय सामंतांवर टीका करतात. ते खासदार राऊत दिवसातून कितीवेळा उदय सामंत व किरण सामंत यांना फोन करतात व काय, काय बोलतात? याचा एकदा मी तपशिल जाहीर करणार आहे. मी खोटे बोलत असेन तर खासदार राऊत यांनी फोनचा 'सीडीआर रिपोर्ट' जाहीर करावा. एका बाजूला तुम्ही प्रकल्पाला विरोध करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उदय सामंत व त्यांच्या लोकांकडून स्वतःसाठी खर्च मागता. हे असे कसे होणार ?  विनायक राऊत व वैभव नाईक यांनी बारसू सारखीच भेट चिपी विमानतळ, सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या विरोधावेळी दिली होती. आता विमानतळ सुरू झाले. त्यावेळी उद्घाटन करण्यासाठी कोण पुढे आले? जे विरोध करीत होते तेच आले. विमानतळ सुरू झाल्यानंतर लेबर व कॅटरिंग ठेका कोण मागत होते?  ती विनायक राऊत यांचीच कंपनी होती. ब्लास्टिंग ठेका वैभव नाईक यांच्या कंपनीने घेतला. त्यामुळे त्यांचे दौरे हे लोकांसाठी नाहीत. प्रकल्प उभा राहिला की हेच ठेका घेणार आहेत. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हेच विरोध करतात व काम झाले की हेच कामे घेतात, हे कसे काय? टोलबाबतही तीच स्थिती आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प केंद्र व राज्य सरकार पूर्ण करणारच, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पNitesh Raneनीतेश राणे