शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणे यांचा ‘रिफायनरी’ विरोधात एल्गार, गिर्ये येथील जाहीर सभा : शिवसेनेचा प्रकल्पाला आतून पाठिंबा; ...तर ‘त्या’ व्यक्तींची गय करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 14:49 IST

ग्रीन रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी अधिकारीवर्ग जर प्रयत्न करीत असेल तर त्यांची गाठ राणे कुटुंबीयांशी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसेनेचे कोकणामधील २४ आमदार आहेत. मात्र ते हा प्रकल्प रद्द होण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. मात्र मतांसाठीच दिखाऊपणा करीत ते विरोध करीत आहेत. उद्योगमंत्री हे शिवसेनेचे असून ते हा प्रकल्प रद्द होण्याची का वक्तव्ये करीत नाहीत. यावरुन शिवसेनेचा या प्रकल्पाला आतून पाठिंबा असल्याचे सरळपणे दिसून येत आहे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी गिर्ये येथील जाहीर सभेत व्यक्त केले.

ठळक मुद्देनीतेश राणे यांचा ‘रिफायनरी’ विरोधात एल्गारगिर्ये येथील जाहीर सभा शिवसेनेचा प्रकल्पाला आतून पाठिंबा...तर ‘त्या’ व्यक्तींची गय करणार नाही

 

देवगड : ग्रीन रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी अधिकारीवर्ग जर प्रयत्न करीत असेल तर त्यांची गाठ राणे कुटुंबीयांशी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसेनेचे कोकणामधील २४ आमदार आहेत. मात्र ते हा प्रकल्प रद्द होण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. मात्र मतांसाठीच दिखाऊपणा करीत ते विरोध करीत आहेत.

उद्योगमंत्री हे शिवसेनेचे असून ते हा प्रकल्प रद्द होण्याची का वक्तव्ये करीत नाहीत. यावरुन शिवसेनेचा या प्रकल्पाला आतून पाठिंबा असल्याचे सरळपणे दिसून येत आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी गिर्ये येथील जाहीर सभेत केला.

गिर्ये-रामेश्वर येथील होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कोकणामध्ये विनाशकारी प्रकल्प आपण कधीही होऊ देणार नाही.

कोकणचे पर्यटन हे निसर्गसौंदर्याने बहरलेले आहे. गिर्ये-रामेश्वरमधील एक हजार क्षेत्रामध्ये होणारा हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प म्हणजे येथील पर्यटनासहीत आंबा बागायतींचा ऱ्हास करणारा प्रकल्प आहे. असा प्रकल्प आपण कधीही या ठिकाणी होऊ देणार नाही. या ठिकाणी प्रकल्प उभारायचे असतील तर पर्यटनाचे प्रकल्प येथे आणले पाहिजेत. यामुळे पर्यटनाला चालना मिळून येथील लोकांना रोजगार मिळेल. असे जर कोणी केले तर मी नक्कीच स्वत: त्यांचा जाहीर सत्कार करीन. मात्र विनाशकारी प्रकल्प आणणाऱ्या व्यक्तींची आपण कधीही गय करणार नाही.ते पुढे म्हणाले, शिवसेना कोकणी जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम करीत आहे. जगात सर्वात मोठा होणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा कोकणात का आणला जातो? परदेशामध्ये असे प्रकल्प प्रदुषणामुळे उभारले जात नाहीत. मात्र आपले खासदार असा प्रकल्प कोकणामध्ये उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हा प्रकल्प गुहागरमध्ये होणार होता. मात्र तेथील जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने हा प्रकल्प राजापूर परिसरात व देवगड तालुक्यातील गिर्ये-रामेश्वर येथे होण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनीच आणला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

हे सांगितल्यावर विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवरती न्यायालयात हक्कभंग सादर करुन कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत ती का केली नाही? यावरुन असे स्पष्ट दिसून  येते की, हा प्रकल्प खासदार विनायक राऊत यांच्यामुळेच या ठिकाणी लादला गेला आहे.असा हा विनाशकारी प्रकल्प कधीही आपण होऊ देणार नाही. नारायण राणे यांच्या विचारसरणीमधूनच आमची जडणघडण झाली आहे. त्यामुळे  कोकणकडे कोणी वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो आपण मुळासकट मोडून काढू असे सांगतानाच कोकणचे भवितव्य व कोकणचे निसर्गसौंदर्य स्वाभिमान पक्षच टिकवू शकतो, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले.ठाकरे यांनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावेनीतेश राणे म्हणाले,  शिवसेनेचे कोकणामधील २४ आमदार आहेत. उद्योगमंत्रीदेखील शिवसेनेचेच आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची भाषा का करीत नाहीत? शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हा प्रकल्प रद्द करण्याची भाषा वापरत आहेत. तर त्यांनी उद्योगमंत्र्यांनाच हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सांगावे.

राजापूरला येऊन तेथील जनतेला हा प्रकल्प रद्द करण्याची नौटंकी ठाकरे यांनी करु नये. आता त्यांनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावे. सत्तेमधून बाहेर पडणार असे शिवसेना नेहमीच सांगत आहे. मात्र ते सत्तेमधून बाहेर पडत नाहीत. सत्तेमधून भाजप पक्षाने शिवसेनेला हाकलून लावले तरी शिवसेना सत्तेमधून कधीही बाहेर पडणार नाही. सत्तेसाठी लाचार झालेला पक्ष हा शिवसेना पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग