शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई निवारणासाठी अधिकारी, ग्रामसेवकांत समन्वय आवश्यक- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 15:26 IST

वैभववाडी : आपण टोलवाटोलवी करतो किंवा अपुरी माहिती देतो; तेव्हा जनतेचा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांनी आपसात समन्वय ठेवून ग्रामस्थांना विश्वासात घ्या.

वैभववाडी : आपण टोलवाटोलवी करतो किंवा अपुरी माहिती देतो; तेव्हा जनतेचा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांनी आपसात समन्वय ठेवून ग्रामस्थांना विश्वासात घ्या. तरच तालुक्यातील पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो. यावर्षीचा टंचाई आराखडा बनविताना आधीची मंजूर कामे पूर्ण करून घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी पाणीटंचाई आराखडा नियोजन सभेत व्यक्त केले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाई आराखड्याची सभा झाली. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, उपसभापती हर्षदा हरयाण, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला आमदार राणे यांनी गेल्या वर्षीच्या टंचाई आराखड्यातील मंजूर कामांच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये बरीच कामे न झाल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत माहिती घेत असताना अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या माहितीत विसंगती आढळली. त्यामुळे अधिकारी आणि ग्रामसेवकांमध्ये समन्वय नसल्यामुळेच पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे  उपस्थितांच्या निदर्शनास आणून देत चुकीची माहिती देऊन लोकप्रतिनिधींची दिशाभूल करता हा आमचा अपमान नाही का? असे खडे बोल राणे यांनी अधिका-यांना सुनावले. तांत्रिक अडचणीमुळे गेल्या वर्षीच्या आराखड्यातील न झालेली टंचाईची कामे यावर्षीच्या आराखड्यात प्राधान्याने घेण्याची सूचना करताना अडचणींवर उपायही सुचवा. नुसती कारणे सांगत बसू नका, असेही आमदार राणे यांनी प्रशासनाला सुनावले. पाणीटंचाईच्या कामात कुचराई करणा-या एकावर तरी निलंबनाची कारवाई करा. त्याशिवाय सगळे सरळ होणार नाहीत, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली.गेल्या वर्षीच्या टंचाई आराखड्यात मंजूर असलेली परंतु अद्याप सुरू न झालेली कामे येत्या आठ दिवसांत सुरू करून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याची ग्वाही देताना टंचाई आराखडा सभेला मोजकेच सरपंच उपस्थित राहिल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत पुढच्या सभेला सरपंच व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राणे यांनी केले.नव्या राष्ट्रपतींचाही सन्मान करा !सभागृहात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रपतींची प्रतिमा दिसते. परंतु नव्या राष्ट्रपतींची निवड होऊन बरेच दिवस झाले. तरी त्यांची प्रतिमा सभागृहात दिसत नाही. पंचायत समितीत सत्ताबदल होताच ज्या तत्परतेने नारायण राणेंच्या प्रतिमा काढल्या ती तत्परता नव्या राष्ट्रपतींच्या बाबतीत येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे दिसत नाही. नव्या राष्ट्रपतींचीही प्रतिमा तात्काळ सभागृहात लावून त्यांचाही सन्मान करा, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. पाणीटंचाई आराखडा नियोजनाची सभा आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी तहसीलदार संतोष जाधव, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती लक्ष्मण रावराणे, गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे