शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:34 IST

निधीअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेतली जाईल. कोल्हापुरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाही या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. नियोजन आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणू, अशी ग्वाही राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक : राजेश क्षीरसागरकोल्हापूरसाठी जास्तीत जास्त निधी आणणार

कोल्हापूर : निधीअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेतली जाईल. कोल्हापुरातील प्रश्नांसंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाही या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. नियोजन आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणू, अशी ग्वाही राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, आदी प्रमुख उपस्थित होते.क्षीरसागर म्हणाले, आपल्याला हे पद देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार मनावर घेतले. त्यांनी याची जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर सोपविली होेती. अवघ्या दोन तासांत आपल्याला ही जबाबदारी मिळाली. ही मोठी जबाबदारी असून, ती सक्षमपणे पेलून सर्वांच्या विश्वासात पात्र ठरण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. राज्य नियोजन मंडळाची प्रमुख उद्दिष्टे असणारे विषय अभ्यासपूर्वक हाताळून नियोजन आयोगाचे काम पारदर्शी ठेवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. पाणंद विकासासाठी, तसेच राज्याच्या १२५ तालुक्यांत मानव विकासासाठी निधी दिला जाईल.ते पुढे म्हणाले, रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेतली जाणार आहे. यावेळी प्रधान सचिव यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात माहिती होण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनाही बोलविण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी नियोजनच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रंकाळा सुशोभिकरण करणे, याबरोबरच राजाराम, कोटीतीर्थ तलावांचेही सुशोभिकरण करणे, अ‍ॅमेझिंग पार्क उभारणे, तसेच ग्रामीण भागात गडकिल्ल्यांमध्ये ट्रेकिंगची सुविधा करणे, सार्वजनिक बांधकामसह राष्ट्रीय महामार्गचे रस्ते भक्कम करण्यावर भर देणे, असे उपक्रम हाती घेतले जातील.

विकासकामांसाठी ४४ कार्यासनेविभागाची सर्व एकत्रित कामे पार पाडण्यासाठी प्रधान सचिव (नियोजन) व प्रधान सचिव (रोहयो) यांच्या अंतर्गत सर्व योजनांचे नियोजन केले जात आहे. नियोजन विभागातील सर्व विकासाची कामे पाहण्यासाठी ४४ कार्यासने कार्यरत आहेत.

विकासकामांना अडथळे आणू नयेतथेट पाईपलाईनसंदर्भातील सर्व शासकीय अडथळे आम्ही दूर केले आहेत. आता काही लोकांकडून अडथळे येत आहेत. त्यांना विनंती आहे की विकासकामांसाठी अडथळ्याऐवजी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.महापालिकेतील विकासकामांना विरोध नकोविकासकामांना विरोध केल्याने २४ कोटींचा निधी महापालिकेतून परत गेला आहे, याकडे क्षीरसागर यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, नगरसेवकांनी अशी भूमिका घेऊ नये. परत गेलेला निधी मागे आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.==========================कोल्हापूरचा नियतव्य कमीकोल्हापूर जिल्ह्याचा नियतव्यय साताऱ्यापेक्षाही कमी आहे. यामध्ये लक्ष घालून बजेट वाढवून देण्याचा व जास्तीत जास्त निधी कोल्हापूरला आणण्याचा प्रयत्न राहील, असे क्षीरसागर यांनी सांगितले.============================(प्रवीण देसाई)

 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर