शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नवरात्रोत्सवाचे निमित्त सिंधुदुर्गात आता होणार आदिमायेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:46 IST

गणेशोत्सवानंतर सुरु झालेला पितृपक्ष पंधरवडा आता संपला आहे. त्यामुळे आता कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणाईला आनंद देणा-या नवरात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली असून त्यानिमित्ताने आदिमायेचा जागर केला जाणार आहे. या उत्सवासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवाचे निमित्त सिंधुदुर्गात आता होणार आदिमायेचा जागरदांडिया स्पर्धा रंगणार; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, तरुणाई सज्ज

सुधीर राणे

कणकवली : गणेशोत्सवानंतर सुरु झालेला पितृपक्ष पंधरवडा आता संपला आहे. त्यामुळे आता कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणाईला आनंद देणा-या नवरात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली असून त्यानिमित्ताने आदिमायेचा जागर केला जाणार आहे. या उत्सवासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.नवरात्रोत्सवाची नऊ दिवस चालणारी ही धूम एक वेगळेच वातावरण निर्माण करीत असते . सिंधुदुर्गात यावर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्ष सुरु झाल्याने पितरांच्या श्राध्दाचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले होते. त्याचबरोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत होती. दांडिया नृत्य तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तालमी रंगत होत्या.नवरात्रोत्सवात जिल्हयामध्ये सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी श्री दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, तर अनेक ठिकाणी नुसतेच गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.कोकणामध्ये पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरांपुरताच घटस्थापना करण्यापर्यंत नवरात्रोत्सव मर्यादित होता. मात्र, काळानुसार त्यात आता बदल होत आहेत. ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना करून, दांडियाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तर काही ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना न करताच दांडिया,गरबा खेळला जात असल्याचे चित्र पहायला मिळते.शहरांमध्ये मात्र गल्लोगल्ली नवरात्रोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. राजकीयदृष्टया जनतेच्या जवळ जाणारा हा उत्सव असल्याने राजकारणीही मोठय़ा संख्येने या उत्सवांना मदतीचा सढळ हस्ते हात देत असल्याचे दिसून येते.पारंपारिक पध्दतीने गरब्याचे आयोजन प्रामुख्याने गुजराती वस्ती असणा-या ठिकाणीच मोठया प्रमाणात होत असते. मात्र ,जिल्हयातील प्रमुख शहरांसह काही पंचक्रोशींच्या ठिकाणीही असे कार्यक्रम अलीकडे केले जात असल्याचे दिसून येते.

कणकवली शहरातही मागील काही वर्षात नवरात्रोत्सव मोठया प्रमाणावर साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. नवरात्रोत्सव मंडळांसह अनेक ठिकाणी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याने या उत्सवाची रंगत आणखी वाढत आहे.दांडिया स्पर्धेत विशेष करून युवा पिढीचा सहभाग अधिक असल्याने राजकीय मंडळीही या उत्सवाचा राजकीय फायदा करून घेण्यास पुढे सरसावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या स्पर्धांची भव्यता आणखीनच वाढते.सिंधुदूर्गातील अनेक मंदिरात दसऱ्या पर्यन्त देवीचा जागर केला जाणार आहे. भजन, पूजन आदी धार्मिक विधि यानिमित्ताने होणार आहेत. त्याची तयारी सध्या सुरु आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाच्या नऊ रात्री आता जागविल्या जाणार आहेत.बाजारपेठांमध्ये साहित्य दाखल!नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लागणारे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने रंगणाऱ्या दांडिया, गरबा तसेच इतर कार्यक्रमाच्या वेळी इतरांपेक्षा आपला 'लुक' वेगळा असावा यासाठी तरुणाई प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा कल तसेच आवड़ बघुन विविध स्टाईलचे कपड़े तसेच साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीsindhudurgसिंधुदुर्ग