शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

नाटळ-कनेडी पुलाला 6 कोटीची मंजुरी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 17:33 IST

Sindhudurg flood UdaySamant Sindhudurg :  नाटळ - कनेडी पुलाच्या कामासाठी सहा कोटी निधीला मंजुरी मिळणार आहे. पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूल सुरु केला जाईल. दरम्यानच्या कालावधीत पर्यायी पुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथून थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

ठळक मुद्देनाटळ - कनेडी पुलाला सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून 6 कोटीची मंजुरी मिळणारपालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी थेट साधला संपर्क

सिंधुदुर्ग :  नाटळ - कनेडी पुलाच्या कामासाठी सहा कोटी निधीला मंजुरी मिळणार आहे. पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूल सुरु केला जाईल. दरम्यानच्या कालावधीत पर्यायी पुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथून थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून चर्चा केली.जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची काल केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठका घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांनी आज चिपळूण येथे पूरग्रस्त भागातील प्राधान्याने करावयाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये विशेषतः खारेपाटण येथील पर्यायी मार्गासाठी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

खारेपाटण येथील खाडीला पत्तन विभागाच्या माध्यमातून संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. या भिंतीची उंची वाढवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता म.श्री. कदम यांनी नरडवे - पामतेल येथील के.टी. वेअरची पाहणी केली असून या के.टी.वेअरला संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.तिलारी कॅनॉल दुरुस्तीसाठी 35 कोटी; निविदा प्रक्रिया राबवाजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तिलारी येथील कॅनॉल दुरुस्तीसाठी 35 कोटीचा निधी मंजूर केला आहे. याबाबत लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून हे काम पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री श्री सामंत यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिली. तिलारी प्रकल्प हा सद्यःस्थितीत अंतिम टप्प्यात असून प्रकल्पाचे कालवे पूर्ण होऊन सुमारे 30 - 35 वर्षे कालावधी झाला आहे.

हे कालवे प्रामुख्याने मऊस्तर मातीमधून गेल्यामुळे सन 2019 - 20 च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये क्षतीग्रस्त झाले होते. ज्या ठिकाणी डोंगर कडा ढासळून कालव्यातील प्रवाह बंद होतो, त्या ठिकाणी क्षेत्रीय परिस्थितीनुसार मंजुषा पेटीचे बांधकाम करणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, तसेच कालवा गळतीच्या ठिकाणी कालवा अस्तरीकरण करणे अशा प्रतिबंधक उपाययोजनेच्या नवीन व दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे 35 कोटी च्या रकमेची मागणी शासनस्तरावर करून पाठपुरावा करण्यात आला होता.

खासदार  राऊत हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिपळूण येथे स्वतः थांबून यंत्रणा राबवित आहेत. पूरग्रस्त भागात करावयाच्या कामांबाबत प्राधान्य देण्यासाठी आज त्यांच्यासोबत चर्चा झाली. पुढील दौऱ्यात बांदा, तिलारी येथील पाहणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चिपी विमानतळाच्या अनुषंगानेही बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :floodपूरUday Samantउदय सामंतVinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्गAshok Chavanअशोक चव्हाण