शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Narayan Rane: 'तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला', राणेंनी सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 12:23 IST

Narayan Rane: "शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन करुन मातोश्री सोडण्याचा सल्ला दिला होता"

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. दररोज दोन्ही बाजूनं एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आज नारायण राणे यांनी शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये केलेल्या कामाची आठवण शिवसेनेला करुन दिली. ते कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

 'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

"संजय राऊत आज शिवसेनेची वाट लावत आहेत. ते पक्षाला खड्ड्यात नेत आहेत. आज माझ्यावर टीका केल्या जात आहेत. पण याच शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये माझाही वाटा आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही", असं नारायण राणे म्हणाले. 

संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; 'सामना'वर 'प्रहार' करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल

राणेंना सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा"शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन करुन मातोश्री सोडण्याचा सल्ला दिला होता. दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला होता आणि नारायण जसा असशील तसा निघून ये असं सांगितलं. मी जिथं जाईन तिथं माझ्या पुढे आणि मागे तुझ्या गाड्या असल्या पाहिजेत अशी जबाबदारी मला दिली होती. बाळासाहेब तेव्हा काही दिवस अज्ञातवासात होते आणि त्यांना मी सुरक्षा देत होतो. त्यांच्या सुरक्षेसाठी मी १५ दिवस अंघोळ वगैरे न करता.. जे मिळेत खाऊन आणि गाडीतच झोपत होतो. रात्रभर मच्छरांचा त्रास सहन करत होतो. पण हे सारं बाळासाहेबांवरील प्रेमापोटी आम्ही केलं होतं", असं नारायण राणे म्हणाले. 

शिवसेनेत केलेल्या कामाचा दाखला आणि आठवणी सांगत राणेंनी यावेळी पक्षाच्या आजच्या अस्तित्वात असलेलं त्यांचं योगदान दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तसंच संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. 

"संजय राऊतांना पक्षात काही स्थान नाही. ना ते संपादक, ना त्यांच्याकडे कोणतं खातं, ना कोणतं पद. त्यांच्या लेखांना आणि विधानांना कुणी फारसं महत्त्व देत नाही. त्यांना फक्त बोलण्यापुरतं शिवसेनेनं जवळ ठेवलं आहे", असा हल्लाबोल राणेंनी यावेळी केला. 

संदुक कसली उघडताय? रोखठोक काय ते बोलातुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. "एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना सामनाचा संपादक, ना धड प्रवक्ता. त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय", असं नारायण राणे म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना