शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

रिकामे असल्यानेच नारायण राणे पुड्या सोडतात, सरकारमधील मंत्र्यांची खोचक टीका 

By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 20:04 IST

आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले.

ठळक मुद्देसतत विरोधक महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी टिका करतात त्यावर सत्तार यांनी आमचे सरकार ३२ तारखेला पडेल याची वाट बघावी कारण ३२ तारीख कधीही येणार नाही आणि आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे.

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे सरकार ३२ तारखेला पडेल, त्याची भाजपने वाट बघावी. आम्ही आमचे काम करत राहू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन चांगलं काम करत असल्याने भाजपवाले खासगीतही मुख्यमंत्र्याचे कौतुक करतात. त्यामुळे आमच्या सरकारला पाच वर्षे भिती नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आता काय काम उरले नसल्याने ते पुड्या सोडण्याचे काम करत आहेत, अशी जोरदार टिका महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी केली. ते  रविवारी आंबोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, योगेश नाईक, अशोेक दळवी आदि उपस्थीत होते.मंत्री सत्तार म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये वाळू माफिया असतील तर त्यांच्या विरोधात कडक धोरण राबवण्यात येणार असून, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना सांगून त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण कदापी अवैध वाळू उत्खनन चालू देणार नाही, असा इशारा मंत्री सत्तार यांनी दिला. वाळूचे दर निश्चीती लवकरच होणार आहे. याबाबतच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे हे दर शासनस्तरावर ठरवले जाणार आहेत. जांभ्या दगडाच्या उत्खननामुळे सरकारने परवानगी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सतत विरोधक महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी टिका करतात त्यावर सत्तार यांनी आमचे सरकार ३२ तारखेला पडेल याची वाट बघावी कारण ३२ तारीख कधीही येणार नाही आणि आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. विरोधकांना आता कोणतेही काम शिल्लक राहिले नसल्याने ते पाडापाडीचे राजकारण करत आहेत. पण त्यांना ते यश येणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ज्या भाषेत टिका करत आहेत, ती भाषा निषेधार्थ आहे. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. राणे आता कोणतेही काम उरले नाही. त्यामुळे प्रसिद्धीसाठीच ते पुड्या सोडतात, असा आरोपही सत्तार यांनी यावेळी केला. आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले. तर चौकुळचा प्रश्न अद्याप सुटला नसून लवकरच प्रांताधिकारी व तहसिलदार हे गावात जाउन बैठक घेतील आणि तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवतील नंतरच त्यावर निर्णय होईल यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक होणार असल्याचेही मंत्री सत्तारी यांनी सांगितले.

कुडाळ प्रांताधिकारी यांची पुन्हा चौकशी होणार

कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची पुन्हा चौकशी होणार असून, आमदार वैभव नाईक यांनी तक्रार दिल्यानंतर एकदा त्यांची चौकशी झाली असून, त्या चौकशीवर कोणाचा विश्वास नसेल तर पुन्हा चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही मंत्री सत्तार यांनी सांगितले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Abdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे