शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

रिकामे असल्यानेच नारायण राणे पुड्या सोडतात, सरकारमधील मंत्र्यांची खोचक टीका 

By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 20:04 IST

आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले.

ठळक मुद्देसतत विरोधक महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी टिका करतात त्यावर सत्तार यांनी आमचे सरकार ३२ तारखेला पडेल याची वाट बघावी कारण ३२ तारीख कधीही येणार नाही आणि आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे.

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे सरकार ३२ तारखेला पडेल, त्याची भाजपने वाट बघावी. आम्ही आमचे काम करत राहू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन चांगलं काम करत असल्याने भाजपवाले खासगीतही मुख्यमंत्र्याचे कौतुक करतात. त्यामुळे आमच्या सरकारला पाच वर्षे भिती नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आता काय काम उरले नसल्याने ते पुड्या सोडण्याचे काम करत आहेत, अशी जोरदार टिका महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी केली. ते  रविवारी आंबोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, योगेश नाईक, अशोेक दळवी आदि उपस्थीत होते.मंत्री सत्तार म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये वाळू माफिया असतील तर त्यांच्या विरोधात कडक धोरण राबवण्यात येणार असून, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना सांगून त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण कदापी अवैध वाळू उत्खनन चालू देणार नाही, असा इशारा मंत्री सत्तार यांनी दिला. वाळूचे दर निश्चीती लवकरच होणार आहे. याबाबतच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे हे दर शासनस्तरावर ठरवले जाणार आहेत. जांभ्या दगडाच्या उत्खननामुळे सरकारने परवानगी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सतत विरोधक महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी टिका करतात त्यावर सत्तार यांनी आमचे सरकार ३२ तारखेला पडेल याची वाट बघावी कारण ३२ तारीख कधीही येणार नाही आणि आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. विरोधकांना आता कोणतेही काम शिल्लक राहिले नसल्याने ते पाडापाडीचे राजकारण करत आहेत. पण त्यांना ते यश येणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ज्या भाषेत टिका करत आहेत, ती भाषा निषेधार्थ आहे. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. राणे आता कोणतेही काम उरले नाही. त्यामुळे प्रसिद्धीसाठीच ते पुड्या सोडतात, असा आरोपही सत्तार यांनी यावेळी केला. आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले. तर चौकुळचा प्रश्न अद्याप सुटला नसून लवकरच प्रांताधिकारी व तहसिलदार हे गावात जाउन बैठक घेतील आणि तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवतील नंतरच त्यावर निर्णय होईल यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक होणार असल्याचेही मंत्री सत्तारी यांनी सांगितले.

कुडाळ प्रांताधिकारी यांची पुन्हा चौकशी होणार

कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची पुन्हा चौकशी होणार असून, आमदार वैभव नाईक यांनी तक्रार दिल्यानंतर एकदा त्यांची चौकशी झाली असून, त्या चौकशीवर कोणाचा विश्वास नसेल तर पुन्हा चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही मंत्री सत्तार यांनी सांगितले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Abdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे