शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Narayan Rane: “महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही; आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी अवस्था” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 15:46 IST

Narayan Rane सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग: गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) भाजपवर सातत्याने टीका करत असून, दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे मुख्यंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला असून, महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी अवस्था, असा खोचक टोला लगावला आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, असा प्रहार नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. 

या सरकारला काहीही पडलेले नाही

राज्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही या सरकारला त्याचं काही पडलं नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास फंड कमीच होत चालला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय हे स्पष्ट होते. सिंधुदुर्गाला ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, ती अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात वादळ आले, अतिवृष्टी झाली तरी दखल घेतली जात नाही. पुरेसे पैसे दिले जात नाहीत. विकासाला चालना मिळेल असे बजेट या नियोजन समितीकडे नाही. आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे असे या सरकारचे धोरण आहे. जिल्हा परिषदेसाठी सरकारने ४६ कोटी रुपये दिले होते. पण नंतर विभागीय चौकशीची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्याकडून ते परत मागवून घेतले, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. 

अशांतता राहू नये म्हणून आमचे नेते प्रयत्न करत आहेत

अलीकडेच राज्यातील काही भागात दंगली उसळल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्र धगधगतोय त्याचे खापर भाजपवर फोडण्याचे कारण नाही. दंगलीला कोण कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींकडे सरकार काय दृष्टीने पाहते हे सर्वांना माहीत आहे. राज्यात अशांतता राहू नये म्हणून आमचे नेते प्रयत्न करत आहेत. विकासाच्या कामात खोडा घालायचा नाही. या विषयावर कधी बोललो नाही, असे नारायण राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी