शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Narayan Rane: “महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही; आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी अवस्था” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 15:46 IST

Narayan Rane सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग: गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) भाजपवर सातत्याने टीका करत असून, दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे मुख्यंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला असून, महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी अवस्था, असा खोचक टोला लगावला आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, असा प्रहार नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. 

या सरकारला काहीही पडलेले नाही

राज्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही या सरकारला त्याचं काही पडलं नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास फंड कमीच होत चालला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय हे स्पष्ट होते. सिंधुदुर्गाला ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, ती अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात वादळ आले, अतिवृष्टी झाली तरी दखल घेतली जात नाही. पुरेसे पैसे दिले जात नाहीत. विकासाला चालना मिळेल असे बजेट या नियोजन समितीकडे नाही. आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे असे या सरकारचे धोरण आहे. जिल्हा परिषदेसाठी सरकारने ४६ कोटी रुपये दिले होते. पण नंतर विभागीय चौकशीची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्याकडून ते परत मागवून घेतले, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. 

अशांतता राहू नये म्हणून आमचे नेते प्रयत्न करत आहेत

अलीकडेच राज्यातील काही भागात दंगली उसळल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्र धगधगतोय त्याचे खापर भाजपवर फोडण्याचे कारण नाही. दंगलीला कोण कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींकडे सरकार काय दृष्टीने पाहते हे सर्वांना माहीत आहे. राज्यात अशांतता राहू नये म्हणून आमचे नेते प्रयत्न करत आहेत. विकासाच्या कामात खोडा घालायचा नाही. या विषयावर कधी बोललो नाही, असे नारायण राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी