शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

nanar refinery project: पक्ष बदलला की नितेश राणेंची तत्वे बदलतात, सतीश सावंत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 13:59 IST

भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा. सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा असा पलटवारही त्यांनी केला.

कणकवली : रिफायनरी प्रकल्पावरुन सुरु असलेल्या वादावरुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणेंनी काँग्रेस आणि स्वाभिमानमध्ये असताना रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडणार असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांनी ग्रीन रिफायनरीबाबत आपल्या दुटप्पी भूमिकेबद्दल आधी सांगावे.पक्ष बदलला की तत्वे बदलणाऱ्या आणि पक्षाच्या रंगाप्रमाणे आपला रंग बदलणाऱ्या राणेंनी मतांवर डोळा ठेवून रिफायनरीला विरोध केला होता हे आठवावे असा टोला सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंना लगावला.तर, राजापूरच्या ग्रीन रिफायनरीला जनतेचा विरोध असल्यामुळे शिवसेनेने विरोध केला होता. आता ग्रीन रिफायनरीला काहींचे समर्थन आणि काहींचा विरोध अशी जनतेची भावना आहे. शिवसेना ग्रीन रिफायनरीबाबत जनतेसोबत होती आणि यापूढेही राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, संतोष परब, सचिन सावंत उपस्थित होते.यावेळी बोलताना सावंत म्हणाले, यापूर्वी देवगडमध्ये नितेश राणेंनी ग्रीन रिफायनरीमुळे जनतेला कॅन्सर होईल असे वक्तव्य केले होते. मग आता हा प्रकल्प करताना कॅन्सर कसा होणार नाही? हेही जनतेला सांगावे. नितेश राणेंच्या रिफायनरी प्रकल्पाविरोधातील या अगोदरची भाषणाची वृत्तपत्रातील कात्रणेच सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. ते म्हणाले, रिफायनरीचे दलाल म्हणून प्रमोद जठार यांना हिणवणाऱ्या नितेश राणेंनी आता त्यांचेच नेतृत्व रिफायनरी साठी मान्य केले आहे.पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगडमध्ये राज्य शासनाने दिलेल्या निधीच्याच कामांचे भूमिपूजन केले. दुसऱ्यावर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी आपल्या सोयिस्कर बदलत्या भूमिकेबद्दल आधी बोलावे. केंद्रातून त्यांनी किती निधी आणला ते जनतेला सांगावे. सोयीनुसार आपली भूमिका बदलणाऱ्या राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.देवगडमध्ये शिवसेनेचा आवाज वाढला असे म्हणणाऱ्या मंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून मांजरीचा की वाघाचा ? अशा खोचक सवालाने भाजपा आमदार नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले होते. यावर सतीश सावंत यांनी नितेश राणेंना उद्देशून सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा पलटवार केला. भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा असल्याचा पलटवार सतीश सावंत यांनी यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गnanar refinery projectनाणार प्रकल्पNitesh Raneनीतेश राणे