शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

nanar refinery project: पक्ष बदलला की नितेश राणेंची तत्वे बदलतात, सतीश सावंत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 13:59 IST

भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा. सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा असा पलटवारही त्यांनी केला.

कणकवली : रिफायनरी प्रकल्पावरुन सुरु असलेल्या वादावरुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणेंनी काँग्रेस आणि स्वाभिमानमध्ये असताना रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडणार असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांनी ग्रीन रिफायनरीबाबत आपल्या दुटप्पी भूमिकेबद्दल आधी सांगावे.पक्ष बदलला की तत्वे बदलणाऱ्या आणि पक्षाच्या रंगाप्रमाणे आपला रंग बदलणाऱ्या राणेंनी मतांवर डोळा ठेवून रिफायनरीला विरोध केला होता हे आठवावे असा टोला सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंना लगावला.तर, राजापूरच्या ग्रीन रिफायनरीला जनतेचा विरोध असल्यामुळे शिवसेनेने विरोध केला होता. आता ग्रीन रिफायनरीला काहींचे समर्थन आणि काहींचा विरोध अशी जनतेची भावना आहे. शिवसेना ग्रीन रिफायनरीबाबत जनतेसोबत होती आणि यापूढेही राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, संतोष परब, सचिन सावंत उपस्थित होते.यावेळी बोलताना सावंत म्हणाले, यापूर्वी देवगडमध्ये नितेश राणेंनी ग्रीन रिफायनरीमुळे जनतेला कॅन्सर होईल असे वक्तव्य केले होते. मग आता हा प्रकल्प करताना कॅन्सर कसा होणार नाही? हेही जनतेला सांगावे. नितेश राणेंच्या रिफायनरी प्रकल्पाविरोधातील या अगोदरची भाषणाची वृत्तपत्रातील कात्रणेच सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. ते म्हणाले, रिफायनरीचे दलाल म्हणून प्रमोद जठार यांना हिणवणाऱ्या नितेश राणेंनी आता त्यांचेच नेतृत्व रिफायनरी साठी मान्य केले आहे.पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगडमध्ये राज्य शासनाने दिलेल्या निधीच्याच कामांचे भूमिपूजन केले. दुसऱ्यावर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी आपल्या सोयिस्कर बदलत्या भूमिकेबद्दल आधी बोलावे. केंद्रातून त्यांनी किती निधी आणला ते जनतेला सांगावे. सोयीनुसार आपली भूमिका बदलणाऱ्या राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.देवगडमध्ये शिवसेनेचा आवाज वाढला असे म्हणणाऱ्या मंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून मांजरीचा की वाघाचा ? अशा खोचक सवालाने भाजपा आमदार नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले होते. यावर सतीश सावंत यांनी नितेश राणेंना उद्देशून सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा पलटवार केला. भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा असल्याचा पलटवार सतीश सावंत यांनी यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गnanar refinery projectनाणार प्रकल्पNitesh Raneनीतेश राणे