शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

नलावडे यांनी पारकरांना निष्ठा शिकवू नये : रुपेश नार्वेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:57 IST

Politics, Kankavli, Sandeshparkar, samir nalavde, RupeshNarvekar नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर यांनी टीका केली होती. त्यामुळे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पारकर यांच्यावर टीका केली आहे. मात्र, नलावडे यांनी पारकराना निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत. असा उपरोधिक टोला नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देनलावडे यांनी पारकरांना निष्ठा शिकवू नये नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी लगावला टोला

कणकवली : नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर यांनी टीका केली होती. त्यामुळे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पारकर यांच्यावर टीका केली आहे. मात्र, नलावडे यांनी पारकराना निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत. असा उपरोधिक टोला नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पक्षांतराची धमकी देत नेत्यांना अधून मधून ब्लॅकमेल करणाऱ्यानी "निष्ठा" हा शब्द सुद्धा उच्चारू नये . माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते संदेश पारकर यांच्यामुळे राजकारणात आले आणि पदाधिकारी झाले.

समीर नलावडे यांचा राजकीय उदय सुद्धा संदेश पारकर यांच्यामुळेच झाला, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पारकर यांचा हात डोक्यावर नसता, तर नगरसेवक, बांधकाम सभापती आणि पंचायत समिती सदस्य अशी पदे स्वप्नातसुद्धा नलावडे यांना दिसली नसती, हे वास्तव स्वतः नलावडे विसरले असले तरी कणकवलीतील जनता विसरलेली नाही.नलावडे राजकारणाच्या नकाशावर कुठेही नव्हते तेव्हा पारकर कणकवलीचे सरपंच होते. पारकर यांनी संघर्ष करून पद मिळवले होते. "उमेदवार पाहू नका, माझ्याकडे बघून मत द्या" असा प्रचार पारकर यांच्यासाठी कोणत्याही आमदाराने केलेला नव्हता.नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर या एकट्याच नेत्याने टीका केली नाही. आणखीही बऱ्याच नेत्यांनी राणे यांच्यावर शरसंधान साधले आहे. पण नलावडे यांचे प्रत्युत्तर मात्र फक्त पारकर यांना उद्देशून आहे. त्यामागचे गौडबंगाल काय आहे ? हे नलावडे यांनी स्पष्ट करावे.जेव्हा नलावडे आणि राणेही नव्हते तेव्हापासून पारकर राजकारणात आहेत. त्यांनी पदाची अपेक्षाच कधी केली नाही. जी पदे मिळाली ती त्यांनी हिमतीवर मिळवली आहेत. पारकर यांनी कोणत्याही पक्षाशी गद्दारी केलेली नाही, म्हणून सर्व पक्षांत त्यांचे मित्रत्वाचे संबंध आजही आहेत. नलावडे यांनी स्वतःच्या दुसऱ्या पक्षातल्या एकातरी मित्राचे नाव सांगावे.नेतृत्व हे गुणांवर ठरत असते. निवडणुकीत हारजीत होत असते. पारकर एकदा पराभूत झाले असतील तर स्वतः नारायण राणे आणि निलेश राणे दोनदा पराभूत झाले आहेत. मग ते तुमचे नेते नाहीत का ? की ते पराभूत झाले म्हणून त्यांचे नेतृत्व नाकारणार आहात का ?पारकर यांचे नेतृत्व कणकवलीच्या पुरते मर्यादित नाही. ते जिल्ह्याचे नेतृत्व आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते कायम त्यांच्या पाठीशी आहेत आणि भविष्यातही राहतील. नलावडे यांनी त्याची काळजी करू नये. असेही या प्रसिद्धी पत्रकात नार्वेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग