शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नलावडे यांनी पारकरांना निष्ठा शिकवू नये : रुपेश नार्वेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:57 IST

Politics, Kankavli, Sandeshparkar, samir nalavde, RupeshNarvekar नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर यांनी टीका केली होती. त्यामुळे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पारकर यांच्यावर टीका केली आहे. मात्र, नलावडे यांनी पारकराना निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत. असा उपरोधिक टोला नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देनलावडे यांनी पारकरांना निष्ठा शिकवू नये नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी लगावला टोला

कणकवली : नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर यांनी टीका केली होती. त्यामुळे कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पारकर यांच्यावर टीका केली आहे. मात्र, नलावडे यांनी पारकराना निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत. असा उपरोधिक टोला नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पक्षांतराची धमकी देत नेत्यांना अधून मधून ब्लॅकमेल करणाऱ्यानी "निष्ठा" हा शब्द सुद्धा उच्चारू नये . माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते संदेश पारकर यांच्यामुळे राजकारणात आले आणि पदाधिकारी झाले.

समीर नलावडे यांचा राजकीय उदय सुद्धा संदेश पारकर यांच्यामुळेच झाला, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पारकर यांचा हात डोक्यावर नसता, तर नगरसेवक, बांधकाम सभापती आणि पंचायत समिती सदस्य अशी पदे स्वप्नातसुद्धा नलावडे यांना दिसली नसती, हे वास्तव स्वतः नलावडे विसरले असले तरी कणकवलीतील जनता विसरलेली नाही.नलावडे राजकारणाच्या नकाशावर कुठेही नव्हते तेव्हा पारकर कणकवलीचे सरपंच होते. पारकर यांनी संघर्ष करून पद मिळवले होते. "उमेदवार पाहू नका, माझ्याकडे बघून मत द्या" असा प्रचार पारकर यांच्यासाठी कोणत्याही आमदाराने केलेला नव्हता.नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर या एकट्याच नेत्याने टीका केली नाही. आणखीही बऱ्याच नेत्यांनी राणे यांच्यावर शरसंधान साधले आहे. पण नलावडे यांचे प्रत्युत्तर मात्र फक्त पारकर यांना उद्देशून आहे. त्यामागचे गौडबंगाल काय आहे ? हे नलावडे यांनी स्पष्ट करावे.जेव्हा नलावडे आणि राणेही नव्हते तेव्हापासून पारकर राजकारणात आहेत. त्यांनी पदाची अपेक्षाच कधी केली नाही. जी पदे मिळाली ती त्यांनी हिमतीवर मिळवली आहेत. पारकर यांनी कोणत्याही पक्षाशी गद्दारी केलेली नाही, म्हणून सर्व पक्षांत त्यांचे मित्रत्वाचे संबंध आजही आहेत. नलावडे यांनी स्वतःच्या दुसऱ्या पक्षातल्या एकातरी मित्राचे नाव सांगावे.नेतृत्व हे गुणांवर ठरत असते. निवडणुकीत हारजीत होत असते. पारकर एकदा पराभूत झाले असतील तर स्वतः नारायण राणे आणि निलेश राणे दोनदा पराभूत झाले आहेत. मग ते तुमचे नेते नाहीत का ? की ते पराभूत झाले म्हणून त्यांचे नेतृत्व नाकारणार आहात का ?पारकर यांचे नेतृत्व कणकवलीच्या पुरते मर्यादित नाही. ते जिल्ह्याचे नेतृत्व आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते कायम त्यांच्या पाठीशी आहेत आणि भविष्यातही राहतील. नलावडे यांनी त्याची काळजी करू नये. असेही या प्रसिद्धी पत्रकात नार्वेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग