शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मुंबई-गोवा चौपदरीकरण : कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला गती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:45 IST

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा चौपदरीकरण : कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला गती !महामार्ग चौपदरीकरण काम ; धुळीचा नागरिकांना त्रास

कणकवली : मुंबई-गोवा चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांनंतर सरकारने मान्य केली आहे. कोकणातील या महामार्गासाठी सुमारे २२ हजार ६६४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे.या चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गाचे चित्र पालटल्याचे दृष्य सिंधुदुर्गात पहायला मिळत आहे. ठेकेदाराच्या अनास्थेमुळे चौपदरीकरणातील १४ पुलांचे काम पुन्हा फेरनिवीदा करून करण्यात येणार असल्याने काम मार्गी लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम करताना इंदापूर ते झाराप असे १० टप्पे बनविण्यात आले. त्या टप्प्यांमध्ये विविध १० ठेकेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या रस्त्याची ४५० किमी लांबी असून त्यासाठी शासनाने २२ हजार ६६४ कोटी निधीची तरतूद केली आहे.

इंदापूर ते वडेपाले, वीर ते भोगाव, भोगाव ते कशेडी घाट, कशेडी घाट ते परशुराम घाट, परशुराम घाट ते आरवली, आरवली ते काटे, काटे ते वाकेड, वाकेड ते तळगाव, तळगाव ते कलमठ जानवली नदीपूल, कलमठ - कणकवली ते झाराप असे १० टप्पे बनविण्यात आले आहेत.१० टप्प्यांमध्ये चौपदरीकरण करत असताना कॉन्क्रीट रस्ता, मोठे तसेच लहान पूल, बस स्टॅण्ड, छोठी मोठी जंक्शन, अंडरपास, प्लायओव्हर, सर्व्हिस रोड अशी कामे अंर्तभूत करण्यात आली आहेत. त्यामुळे कोकणातील दळणवळणासाठी हा मुंबई-गोवा महामार्ग खऱ्या अर्थाने चौफेर विकासाचा मार्ग ठरेल अशी शक्यता आहे. सध्या या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे.ठिक-ठिकाणी चौपदरीकरणाचे रस्ते पुर्णत्वास जातानाचे चित्र दिसून येत आहे. कधी नव्हे ते चौपदरीकरण झाल्यानंतरचे चित्र कोकण वासियांना पाहता येत आहे़.या चौपदरीकरणाला लागून सिंधुदुर्गात नांदगाव-देवगड, कुडाळ मालवण, कणकवली-आचरा, कुडाळ-सिंधुदुर्ग असे चार रस्ते सीमेंट क्राँक्रीटीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.त्यासाठी २१२० कोटींचा निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.सिंधुदुर्गात मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम फार गतीने सुरू आहे. कणकवलीत जिल्ह्यातील पहिले उड्डान पुल होत असून या उड्डान पुलाचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीने हाती घेतले आहे. आतापर्यंत सात पिलर उभारण्याची प्रक्रीया पुर्ण होताना दिसुन येत आहे. दिवस रात्र चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. कणकवली शहरात हा मार्ग पुर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व्हिस रोड पूर्ण करण्यात येत आहेत.शहरातील १८०० मीटरच्या अंतरात १२०० मिटरचे सर्व्हिस मार्ग पुर्ण करण्यात आले आहेत. सर्व्हिसमार्गावर असलेल्या मातीमुळे नागरिकांना व वाहनचालकाना मोठ्या प्रमाणात धुळीचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग