शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा चौपदरीकरण : कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला गती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:45 IST

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा चौपदरीकरण : कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला गती !महामार्ग चौपदरीकरण काम ; धुळीचा नागरिकांना त्रास

कणकवली : मुंबई-गोवा चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांनंतर सरकारने मान्य केली आहे. कोकणातील या महामार्गासाठी सुमारे २२ हजार ६६४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे.या चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गाचे चित्र पालटल्याचे दृष्य सिंधुदुर्गात पहायला मिळत आहे. ठेकेदाराच्या अनास्थेमुळे चौपदरीकरणातील १४ पुलांचे काम पुन्हा फेरनिवीदा करून करण्यात येणार असल्याने काम मार्गी लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम करताना इंदापूर ते झाराप असे १० टप्पे बनविण्यात आले. त्या टप्प्यांमध्ये विविध १० ठेकेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या रस्त्याची ४५० किमी लांबी असून त्यासाठी शासनाने २२ हजार ६६४ कोटी निधीची तरतूद केली आहे.

इंदापूर ते वडेपाले, वीर ते भोगाव, भोगाव ते कशेडी घाट, कशेडी घाट ते परशुराम घाट, परशुराम घाट ते आरवली, आरवली ते काटे, काटे ते वाकेड, वाकेड ते तळगाव, तळगाव ते कलमठ जानवली नदीपूल, कलमठ - कणकवली ते झाराप असे १० टप्पे बनविण्यात आले आहेत.१० टप्प्यांमध्ये चौपदरीकरण करत असताना कॉन्क्रीट रस्ता, मोठे तसेच लहान पूल, बस स्टॅण्ड, छोठी मोठी जंक्शन, अंडरपास, प्लायओव्हर, सर्व्हिस रोड अशी कामे अंर्तभूत करण्यात आली आहेत. त्यामुळे कोकणातील दळणवळणासाठी हा मुंबई-गोवा महामार्ग खऱ्या अर्थाने चौफेर विकासाचा मार्ग ठरेल अशी शक्यता आहे. सध्या या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे.ठिक-ठिकाणी चौपदरीकरणाचे रस्ते पुर्णत्वास जातानाचे चित्र दिसून येत आहे. कधी नव्हे ते चौपदरीकरण झाल्यानंतरचे चित्र कोकण वासियांना पाहता येत आहे़.या चौपदरीकरणाला लागून सिंधुदुर्गात नांदगाव-देवगड, कुडाळ मालवण, कणकवली-आचरा, कुडाळ-सिंधुदुर्ग असे चार रस्ते सीमेंट क्राँक्रीटीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.त्यासाठी २१२० कोटींचा निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.सिंधुदुर्गात मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम फार गतीने सुरू आहे. कणकवलीत जिल्ह्यातील पहिले उड्डान पुल होत असून या उड्डान पुलाचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीने हाती घेतले आहे. आतापर्यंत सात पिलर उभारण्याची प्रक्रीया पुर्ण होताना दिसुन येत आहे. दिवस रात्र चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. कणकवली शहरात हा मार्ग पुर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व्हिस रोड पूर्ण करण्यात येत आहेत.शहरातील १८०० मीटरच्या अंतरात १२०० मिटरचे सर्व्हिस मार्ग पुर्ण करण्यात आले आहेत. सर्व्हिसमार्गावर असलेल्या मातीमुळे नागरिकांना व वाहनचालकाना मोठ्या प्रमाणात धुळीचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग