शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 4:07 PM

संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देआंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागेजुलैपासून पावसाला सुरुवात; ८५७५ मिलीमीटर पावसाची नोंद

आंबोली : संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.आतापर्यंत तब्बल ३४० इंच म्हणजेच ८५७५ मिलीमीटर पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले.आंबोलीतील जाणकारांच्या म्हणण्यानुसार तीस वर्षांपूर्वी असा पाऊस पडत असे, तो पुन्हा यावर्षी बघायला मिळाला. त्याकाळी मे महिन्याच्या १५ तारीखला पाऊस सुरू होत असे, तो आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पडत असे. ४०० किंवा ४५० इंच पाऊस आंबोलीत पडत असे.मधल्या काळात जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड अशा विविध कारणांमुळे आंबोलीतील पाऊस कमी झाला होता. २९० इंच ते ३०० इंच इतका पाऊस आंबोलीत होत असे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता २०१५ साली २९२ इंच, २०१६ साली १९० इंच, २०१७ मध्ये २८३, २०१८ साली २९६ इंच आणि २०१९ साली म्हणजेच यावर्षी हा पाऊस तब्बल त्रिशतक गाठून ३४० इंचापर्यंत पोहोचला आहे.भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो. मात्र, यावर्षी तो ६१०० मिलीमीटर इतकाच झाला आहे. मात्र, आंबोलीत ८५७५ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंबोलीच्या पावसाने यापूर्वीची सर्व रेकॉर्ड ब्रेक केली आहेत, असेच जाणकारांकडून बोलले जात आहे.आणखी तब्बल एक महिना पावसाचा शिल्लक असून या एक महिन्यात सात इंचापेक्षा जर जास्त पाऊस झाला तर आंबोलीच्या इतिहासातील सर्वात जास्त पाऊस यावर्षी झाला, असे म्हटले जाईल.पर्यटन व्यावसायिकांना बसतोय फटकाआंबोलीत कोसळलेल्या यावर्षीच्या पावसामुळे आंबोलीतील जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे नुकसान झाले. घाटामध्ये ठिकठिकाणी रस्ते खचले, दरडी कोसळल्या. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायिकांनासुद्धा त्याचा फटका बसला. संपूर्ण महाराष्ट्रालाच यंदाच्या वर्षी पावसाने झोडपून काढले.

आंबोलीमध्ये कोसळणाऱ्या पावसाचे पाणी कोल्हापूर जिल्हा, बेळगावातील काही भाग तसेच बांदा आदी भागांमध्ये जात असते. आंबोलीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या भागांमध्येसुद्धा पाणी येण्यास आंबोलीचा पाऊस कारणीभूत ठरला होता.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग