शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसे न्यायालयात जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:13 IST

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे दोन्ही ठेकेदार बोगस काम करीत आहेत. या कामाकडे गेले वर्षभर मनसेने लक्ष वेधले आहे. महामार्ग प्राधिकरणला त्याबाबत पत्रही दिले आहे. मात्र, लोकप्रतिनिधीना तसेच अधिकाऱ्यांना खिशात घातल्यासारखी या ठेकेदारांची वर्तणूक असून सामान्य जनता मात्र विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामा विरोधात मनसे न्यायालयात जाणार आहे. अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसे न्यायालयात जाणार!परशुराम उपरकर यांची माहिती; महामार्गाच्या दुर्दशेची समस्या

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे दोन्ही ठेकेदार बोगस काम करीत आहेत. या कामाकडे गेले वर्षभर मनसेने लक्ष वेधले आहे. महामार्ग प्राधिकरणला त्याबाबत पत्रही दिले आहे. मात्र, लोकप्रतिनिधीना तसेच अधिकाऱ्यांना खिशात घातल्यासारखी या ठेकेदारांची वर्तणूक असून सामान्य जनता मात्र विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामा विरोधात मनसे न्यायालयात जाणार आहे. अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, प्रांताधिकारी व तहसीलदार कणकवली गडनदी पुलाजवळ महामार्ग ठेकेदाराची वाट पाहत असताना तो वेळेवर येत नाही. यावरून ठेकेदार अधिकारी व प्रशासनाला जुमानत नाही.हे सिद्ध झाले आहे.श्री गणेश चतुर्थी पूर्वी बांधकाम मंत्री, पालकमंत्री , खासदार आणि सर्व आमदार दुर्दशा झालेल्या महामार्गाची पाहणी करतील आणि छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवतील. मात्र, तरीही महामार्गाचे प्रश्न कायमच राहतील. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी महामार्गाचे प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरले आहेत. तर प्रशासनाचे या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष दुर्दैवी आहे.मनसेच्यावतीने आम्ही नविन रस्त्याला पडलेल्या भेगा आणि रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा अनेकवेळा दाखवून दिला आहे. महामार्गाचे निकृष्ट काम मुख्य अभियंत्यांच्याही निदर्शनास आणून दिले आहे. महामार्गावरील पुलाच्या जोडरस्त्यांना टाकलेला मातीचा भराव हा यापुढेही टिकणार नाही. याची जाणीव संबधित अधिकाऱ्यांना करून दिली आहे.हायवे रोड सेफ्टी तसेच क्वालिटी कंट्रोल एजन्सीला जिल्ह्यातील जनतेचे सोयरसुतक नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही कृती होत नाही . किमान ५० वर्षे तरी टिकणारा रस्ता बांधणे आवश्यक आहे. पण सध्याचा रस्ता ५ वर्षे टिकणेही अवघड आहे.गणेश चतुर्थीपूर्वी मागील २ वर्षांसारखेच खड्डे महामार्गावर पडणार आहेत. त्यावेळी बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदार आणि सर्व आमदार येऊन रस्त्याच्या पाहणीची नौटंकी करतील. मात्र, महामार्गाच्या कामात काहीच सुधारणा होणार नाही. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागणार आहे. हे मनसे कदापिही खपवून घेणार नाही.असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळे महामार्गाची दुर्दशा!सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कार्यतत्पर नव्हे तर भ्रष्टाचारी अधिकारी हवे आहेत.जिल्ह्याला स्त्रीरोगतज्ञ आवश्यक असताना जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. चाकूरकर यांच्यासारख्याची बदली झालेली असताना पालकमंत्र्यांनी नियुक्ती केली आहे. पालकमंत्री निष्क्रिय असल्यानेच जिल्ह्याचा विकास रखडला असून महामार्गाची दुर्दशा झाली आहे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग