शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसे न्यायालयात जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:13 IST

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे दोन्ही ठेकेदार बोगस काम करीत आहेत. या कामाकडे गेले वर्षभर मनसेने लक्ष वेधले आहे. महामार्ग प्राधिकरणला त्याबाबत पत्रही दिले आहे. मात्र, लोकप्रतिनिधीना तसेच अधिकाऱ्यांना खिशात घातल्यासारखी या ठेकेदारांची वर्तणूक असून सामान्य जनता मात्र विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामा विरोधात मनसे न्यायालयात जाणार आहे. अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात मनसे न्यायालयात जाणार!परशुराम उपरकर यांची माहिती; महामार्गाच्या दुर्दशेची समस्या

कणकवली : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे दोन्ही ठेकेदार बोगस काम करीत आहेत. या कामाकडे गेले वर्षभर मनसेने लक्ष वेधले आहे. महामार्ग प्राधिकरणला त्याबाबत पत्रही दिले आहे. मात्र, लोकप्रतिनिधीना तसेच अधिकाऱ्यांना खिशात घातल्यासारखी या ठेकेदारांची वर्तणूक असून सामान्य जनता मात्र विविध समस्यांमुळे त्रस्त आहे. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामा विरोधात मनसे न्यायालयात जाणार आहे. अशी माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, प्रांताधिकारी व तहसीलदार कणकवली गडनदी पुलाजवळ महामार्ग ठेकेदाराची वाट पाहत असताना तो वेळेवर येत नाही. यावरून ठेकेदार अधिकारी व प्रशासनाला जुमानत नाही.हे सिद्ध झाले आहे.श्री गणेश चतुर्थी पूर्वी बांधकाम मंत्री, पालकमंत्री , खासदार आणि सर्व आमदार दुर्दशा झालेल्या महामार्गाची पाहणी करतील आणि छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवतील. मात्र, तरीही महामार्गाचे प्रश्न कायमच राहतील. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षांचे लोकप्रतिनिधी महामार्गाचे प्रश्न सोडविण्यात असमर्थ ठरले आहेत. तर प्रशासनाचे या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष दुर्दैवी आहे.मनसेच्यावतीने आम्ही नविन रस्त्याला पडलेल्या भेगा आणि रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा अनेकवेळा दाखवून दिला आहे. महामार्गाचे निकृष्ट काम मुख्य अभियंत्यांच्याही निदर्शनास आणून दिले आहे. महामार्गावरील पुलाच्या जोडरस्त्यांना टाकलेला मातीचा भराव हा यापुढेही टिकणार नाही. याची जाणीव संबधित अधिकाऱ्यांना करून दिली आहे.हायवे रोड सेफ्टी तसेच क्वालिटी कंट्रोल एजन्सीला जिल्ह्यातील जनतेचे सोयरसुतक नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही कृती होत नाही . किमान ५० वर्षे तरी टिकणारा रस्ता बांधणे आवश्यक आहे. पण सध्याचा रस्ता ५ वर्षे टिकणेही अवघड आहे.गणेश चतुर्थीपूर्वी मागील २ वर्षांसारखेच खड्डे महामार्गावर पडणार आहेत. त्यावेळी बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदार आणि सर्व आमदार येऊन रस्त्याच्या पाहणीची नौटंकी करतील. मात्र, महामार्गाच्या कामात काहीच सुधारणा होणार नाही. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागणार आहे. हे मनसे कदापिही खपवून घेणार नाही.असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळे महामार्गाची दुर्दशा!सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कार्यतत्पर नव्हे तर भ्रष्टाचारी अधिकारी हवे आहेत.जिल्ह्याला स्त्रीरोगतज्ञ आवश्यक असताना जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. चाकूरकर यांच्यासारख्याची बदली झालेली असताना पालकमंत्र्यांनी नियुक्ती केली आहे. पालकमंत्री निष्क्रिय असल्यानेच जिल्ह्याचा विकास रखडला असून महामार्गाची दुर्दशा झाली आहे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग