शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बेपत्ता चव्हाण यांचा रेल्वे अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:31 IST

तब्बल दीड महिन्यानंतर सोशल मीडियावरून आलेल्या माहितीच्या आधारे अंकित चव्हाण यांच्या कपड्यांवरून नातेवाईकांनी ओळख पटवली असल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देबेपत्ता चव्हाण यांचा रेल्वे अपघातात मृत्यूतब्बल दीड महिन्यानंतर माहिती

सावंतवाडी : आंबोली येथे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या गुजरात-बडोदा येथील अंकित चव्हाण यांचा मृतदेह राजापूर येथील रेल्वे बोगद्यात २५ जानेवारीला आढळून आला होता. मात्र, पोलिसांनी माहिती प्रसारित करूनही कोणीही आले नसल्याने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

मात्र, तब्बल दीड महिन्यानंतर सोशल मीडियावरून आलेल्या माहितीच्या आधारे अंकित चव्हाण यांच्या कपड्यांवरून नातेवाईकांनी ओळख पटवली असल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली.आंबोली येथील स्कूलमध्ये अंकित चव्हाण यांचा मुलगा असून, त्याची सुटी संपल्याने त्याला सोडण्यासाठी चव्हाण हे गुजरात-बडोदा येथून आले होते. त्याला सोडून रेल्वेने पुन्हा गुजरातकडे जात असताना राजापूर येथील बोगद्याजवळ ते रेल्वेतून खाली कोसळले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना २५ जानेवारीची असून, राजापूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. ९ दिवस होऊनही कोणीही न आल्याने प्रशासनानेच अत्यसंस्कार केले.मात्र, सोशल मीडियावरून राजापूर येथे मृतदेह मिळाल्याची माहिती प्रसारित झाली होती, हे चव्हाण यांच्या नातेवाईकांना समजले. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली. तसेच राजापूर पोलिसांशी संपर्क केला. त्यावेळी राजापूर पोलिसांनी हे कपडे नातेवाईकांना दाखविले. त्यावेळी मृतदेह अंकित यांचा असल्याचे पुढे आले आहे.

याबाबत सावंतवाडी पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून तब्बल दीड महिन्यानंतर बेपत्ता चव्हाण यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. चव्हाण बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलिसांशी संपर्क केला होता. त्यानंतर पोलिसांनीही शोधाशोध केली, पण ते सापडू शकले नव्हते.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग