शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
4
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
5
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
6
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
7
शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?
8
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
9
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
10
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
11
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
12
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
14
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
15
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
16
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
17
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
18
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
19
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
20
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्याचे आदेश, मंत्री केसरकरांचा विद्युत निर्मिती प्रकल्पाला शॉक

By अनंत खं.जाधव | Published: March 29, 2023 6:28 PM

सर्व वीज बाहेरच्या जिल्ह्यांना पुरविण्यात येते. त्यामुळे याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना

अनंत जाधव सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यातील विजघर येथील महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्पाला तिलारी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही विद्युत निर्मिती कंपनी गेल्या बारा वर्षांपासून वीजनिर्मितीचे काम करत असून पहिल्यांदाच या कंपनीला मंत्री केसरकर यांनी शॉक दिला आहे.तिलारी या आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यावर विजघर येथे महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्प 2010 मध्ये आघाडी सरकारच्या काळात उभारण्यात आला आहे. या विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी तिलारी धरणातून किती पाणी घ्यायचे यांची कोणती ही नोंद पाटबंधारे विभागाकडे नाही. कंपनीशी झालेल्या करारात ही नमूद करण्यात आले नाही. विशेष म्हणजे तिलारी धरणाचे गेट हे या विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या तोंडावर असल्याने प्रकल्पाला धरणातून किती पाणी जाते याचा अंदाज येत नाही. तसेच या विज निर्मिती प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या विजेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही फायदा नाही. ही सर्व वीज बाहेरच्या जिल्ह्यांना पुरविण्यात येते. त्यामुळे याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसतो.तिलारी पाटबंधारे प्रकल्प हा 16 टीएमसीचा आहे. मात्र सध्या या धरण क्षेत्रात 54 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. पावसाळ्यात हे धरण क्षेत्र पूर्ण पणे भरलेले असते. उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने याच्या झळा या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना बसतात. परिणामी धरण लाभ क्षेत्रातील शेतीला तसेच बागायतीला पाणी मिळत नाही.अनेक वेळा यावर आंदोलने झाली, मात्र कोणीही दखल घेतली नाही. सोमवारी (दि.27) मंत्री केसरकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही दोडामार्ग मधील काही शेतकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याचा मुद्दा लावून धरला. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी याच बैठकीत अधीक्षक अभियंता विजय थोरात यांना विजघर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे पाणी तत्काळ बंद करा पाच कोटीची वीज आणि पन्नास कोटीचे पाणी कसे शक्य फायदा कोणाला या सगळ्याची चौकशी लावण्याचे सांगत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्याचा रोख कंपनीवर कमी आणि राजकीय विरोधकांवर जास्त होता. त्यातच ही कंपनी विरोधी पक्षनेते अजित पवार याच्या जवळच्या व्यक्तीची असल्याने केसरकर यांना आयती संधी आल्याचे बोलले जात आहे.आमचे शेतकऱ्यांचे सरकार : केसरकर या विद्युत प्रकल्पाला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य नाही. पावसाळ्यात हवे तेवढे पाणी द्या महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार हे शेतकऱ्यांचे आहे असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTilari damतिलारि धरणelectricityवीजDeepak Kesarkarदीपक केसरकर