शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

By अनंत खं.जाधव | Updated: March 11, 2023 16:39 IST

सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार करावा

सावंतवाडी : आम्हाला पन्नास खोके म्हणता मग एवढी वर्षे तुम्ही काय करत होता. मुंबईतील खोके बंद झाल्यानेच उद्धव ठाकरेची चिडचिड होत आहे. पण आता गप्प बसणार नाही खोक्याना त्याच भाषेत उत्तर देणार असून मागील पाच वर्षांत माझी मालमत्ता विकून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष चालवला त्यावेळी खोके कुठे गेले असा सवाल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी करत ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार टीकास्त्र सोडले.ते शिवसेना शिंदे गटाकडून सावंतवाडीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग चे संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, माजी खासदार सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, सचिन वालावलकर, गणेशप्रसाद गवस, नितीन मांजरेकर, अनारोजीन लोबो, सचिन देसाई, प्रेमानंद देसाई, सुनिल डुबळे उपस्थित होते.केसरकर म्हणाले, आमच्यावर खोक्याचे आरोप करता मग तुम्ही आतापर्यंत घेतलेले खोके कुठे ठेवले. मुंबई मधून किती खोके मिळत होते. पदे द्यायला किती खोके घेता असे अनेक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. ठाकरे पिता-पूत्र जेव्हा आमच्यावर टिका करतात त्यावेळी याच्याबाबत सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार त्यांनी करावा असा सल्लाही केसरकरांनी दिला. तसेच सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना आडाळी येथे गरज नसताना धरण बांधण्यात आले याला जबाबदार कोण आणि लोक रस्त्यावर उतरले असते तर काय झाले असते याचा विचार करा असे म्हणत देसाईंवरही टीकास्त्र सोडले. यापुढे जिल्हा परिषद निहाय दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रविंद्र फाटक म्हणाले, पक्ष संघटना वाढवली तरच आपणास याचा फायदा होणार आहे. प्रत्येकाने तळागाळात जाऊन संघटना वाढण्यासाठी प्रयत्न करावा. आगामी सर्व निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकत राहिला पाहिजे. मी सतत या भागाचा दौरा करेन आणि याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या जिल्ह्यात येण्याची विनंती करेन असेही सांगितले.सुधीर सावंत म्हणाले, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. अनेक विकासात्मक कामे त्यांच्या हातून मागील सहा महिन्यात या महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन सावंत यांनी केले.दरम्यान, आजगाव सरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर या निमित्ताने महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गचे संपर्क प्रमुख म्हणून रविंद्र फाटक यांची निवड झाल्याबद्दल मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे