शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील खोके बंद झाल्यानेच आमच्यावर खोक्याचे आरोप, दीपक केसरकरांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल

By अनंत खं.जाधव | Updated: March 11, 2023 16:39 IST

सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार करावा

सावंतवाडी : आम्हाला पन्नास खोके म्हणता मग एवढी वर्षे तुम्ही काय करत होता. मुंबईतील खोके बंद झाल्यानेच उद्धव ठाकरेची चिडचिड होत आहे. पण आता गप्प बसणार नाही खोक्याना त्याच भाषेत उत्तर देणार असून मागील पाच वर्षांत माझी मालमत्ता विकून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष चालवला त्यावेळी खोके कुठे गेले असा सवाल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी करत ठाकरे पिता-पुत्रावर जोरदार टीकास्त्र सोडले.ते शिवसेना शिंदे गटाकडून सावंतवाडीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग चे संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, माजी खासदार सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, सचिन वालावलकर, गणेशप्रसाद गवस, नितीन मांजरेकर, अनारोजीन लोबो, सचिन देसाई, प्रेमानंद देसाई, सुनिल डुबळे उपस्थित होते.केसरकर म्हणाले, आमच्यावर खोक्याचे आरोप करता मग तुम्ही आतापर्यंत घेतलेले खोके कुठे ठेवले. मुंबई मधून किती खोके मिळत होते. पदे द्यायला किती खोके घेता असे अनेक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले. ठाकरे पिता-पूत्र जेव्हा आमच्यावर टिका करतात त्यावेळी याच्याबाबत सर्व माहिती जनते समोर आणली तर काय होईल याचा विचार त्यांनी करावा असा सल्लाही केसरकरांनी दिला. तसेच सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना आडाळी येथे गरज नसताना धरण बांधण्यात आले याला जबाबदार कोण आणि लोक रस्त्यावर उतरले असते तर काय झाले असते याचा विचार करा असे म्हणत देसाईंवरही टीकास्त्र सोडले. यापुढे जिल्हा परिषद निहाय दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.रविंद्र फाटक म्हणाले, पक्ष संघटना वाढवली तरच आपणास याचा फायदा होणार आहे. प्रत्येकाने तळागाळात जाऊन संघटना वाढण्यासाठी प्रयत्न करावा. आगामी सर्व निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकत राहिला पाहिजे. मी सतत या भागाचा दौरा करेन आणि याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या जिल्ह्यात येण्याची विनंती करेन असेही सांगितले.सुधीर सावंत म्हणाले, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. अनेक विकासात्मक कामे त्यांच्या हातून मागील सहा महिन्यात या महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन सावंत यांनी केले.दरम्यान, आजगाव सरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर या निमित्ताने महिला पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गचे संपर्क प्रमुख म्हणून रविंद्र फाटक यांची निवड झाल्याबद्दल मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे