शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

आशिये बायपाससाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 17:07 IST

Muncipal Corporation Kankavli Sindhudurg: कणकवली शहरातील आशिये बायपास रस्त्यासाठी आवश्यक असणारी पोस्ट खात्याच्या मालकीची सर्व जमीन भूसंपादनाने ताब्यात घेण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन रीतसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे येत्या महिन्याभरात सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देकणकवलीतील पोस्ट खात्याच्या जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव महिन्याभरातजिल्हाधिकाऱ्यांकडे करणार सादर

कणकवली : शहरातील आशिये बायपास रस्त्यासाठी आवश्यक असणारी पोस्ट खात्याच्या मालकीची सर्व जमीन भूसंपादनाने ताब्यात घेण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन रीतसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे येत्या महिन्याभरात सादर केला जाणार आहे.या भूसंपादनासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद नगरपंचायतने करून ठेवलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रस्तावाला मंजुरी देताच प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकातून आचरा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आशिये -कलमठ - वरवडे बायपास मार्गाचा प्रस्ताव पूढे आला. या गावातील भूसंपादन प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, या बायपासच्या महामार्गालगतच्या तोंडालाच कणकवली शहरात असलेली पोस्ट खात्याची जमीन ही मोठी अडचणीची ठरत आहे.

शहरातील सह्याद्री हॉटेलसमोर महाडिक यांच्या घरामागून हा बायपास रस्ता जाणार आहे. कणकवली नगरपंचायतच्या डीपी प्लॅन मध्ये हा रस्ता असूनही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे हा बायपास रखडला आहे.

डीपी प्लॅन मध्ये ही जागा आरक्षित असल्यामुळे त्याचे हस्तांतरण नगरपंचायतकडे होणे आवश्यक होते. यासाठी १० लाखांहून अधिक निधीची उपलब्धता नगरपंचायतने केली होती. तो निधी अद्यापही तसाच अखर्चित आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह यांच्या कार्यकाळात पोस्ट खात्याचे क्षेत्रीय अधिकारी आणि नगरपंचायत दरम्यान झालेल्या बैठकीत या जागेत पोस्ट खात्याला विकासासाठी नगरपंचायतने परवानगी द्यावी, त्याबदल्यात पोस्ट खात्याकडून उर्वरित जागेतून आशिये बायपाससाठी आवश्यक जागेचे भूसंपादन नगरपंचायतला दिले जाईल असे चर्चेअंती ठरले.

तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतने पोस्ट खात्याने केलेल्या मागणीनुसार जागा विकसित करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, ही परवानगी मिळाल्यानंतर पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपले हात वर केले.

१ वर्षाच्या आत नगरपंचायतने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणे आवश्यक होते. तसे शक्य न झाल्याने नगरपंचायत प्रशासनाकडे वाढीव मुदतीसाठी परवानगी घेणे आवश्यक असते. तसे झालेले नाही. त्यामुळे पोस्ट खात्याला जागा विकसित करण्यासाठी दिलेली परवानगीच नगरपंचायतने रद्द केली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गPost Officeपोस्ट ऑफिसcollectorजिल्हाधिकारी