शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

भाजी मार्केट आरक्षण विकास प्रश्न ; फसवणूक प्रकरणी नगराध्यक्षानी गुन्हा दाखल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:30 IST

Kankavli Market Sindhudurg- कणकवली शहरात भाजी मार्केटच्या उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली भागधारक असलेल्या ग्लोबल असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे . त्यांच्याच पक्षाचे असलेले कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्याबाबतचा आरोप सभागृहात केला आहे . त्यामुळे या फसवणूक प्रकरणी त्यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच तेलींनी आपल्या भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली आहे .

ठळक मुद्देफसवणूक प्रकरणी नगराध्यक्षानी गुन्हा दाखल करावा कन्हैया पारकर यांची मागणी ; भाजी मार्केट आरक्षण विकास प्रश्न

कणकवली : कणकवली शहरात भाजी मार्केटच्या उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली भागधारक असलेल्या ग्लोबल असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे . त्यांच्याच पक्षाचे असलेले कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्याबाबतचा आरोप सभागृहात केला आहे . त्यामुळे या फसवणूक प्रकरणी त्यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच तेलींनी आपल्या भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली आहे .येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नगरपंचायत विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक , नगरसेवक रूपेश नार्वेकर उपस्थित होते .यावेळी कन्हैया पारकर म्हणाले , भाजी मार्केट साठी आरक्षित असलेल्या ३२ गुंठे जागे पैकी १२ गुंठे जागा आणि १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम ग्लोबल असोसिएट नगरपंचायतीला करारानुसार देणार आहेत . मात्र भाजी मार्केटचे बांधकाम करताना तळमजल्यावर पार्किंग आणि उर्वरित तीन मजल्यावर गाळे आणि भाजी विक्रीचे कट्टे बांधण्यात आले आहेत . एका मजल्यावर फक्त ४२ विक्रेत्यांची सोय होणार आहे . शहरात ३०० हून अधिक भाजी , फळ , फुल विक्रेते आहेत . त्यामुळे भाजी मार्केट बांधूनही शहरातील भाजी विक्रेत्यांचे तेथे स्थलांतर होणार नाही .नगरपंचायतीला १२ गुंठे जागा देण्याच्या मोबदल्यात विकासकाने संपूर्ण ३२ गुंठे जागेचा एफएसआय घेतला आहे . या विकासकाच्या इमारती दर्शनी भागात आणि रस्त्यालगत आहेत . तर भाजी मार्केट अडगळीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहे . तेथे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता देखील नाही . तसेच ग्राहक पहिल्या मजल्यापर्यंतच भाजी व इतर वस्तू खरेदीसाठी जाऊ शकतात . दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर भाजी मार्केट उभारल्याचे उदाहरण आपल्या देशात तरी नाही . त्यामुळे १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम बांधून देत असल्याचा तेली यांचा दावा खोटा आहे .

नगरपंचायत सभेत खुद्द नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीच विकासकांनी शहरवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे . नगराध्यक्ष हे भाजपचे आहेत . तर त्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आहेत . त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत . त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा . तसेच नगराध्यक्षांनीही विकासकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडायला हवे . नगराध्यक्षांनी तसे न केल्यास आम्ही विरोधक प्रशासनाकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणार असल्याचेही पारकर यावेळी म्हणाले .नगराध्यक्षाना शिवसेनेचे दरवाजे खुलेकणकवली भाजी मार्केट प्रश्नी कणकवली नगराध्यक्षांनी सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे . त्यांनी त्या भूमिकेवर ठाम राहावे . भाजी मार्केटमध्ये शहरवासीयांची फसवणूक होत आहे . खुद्द नगराध्यक्षांनीच आम्हा सर्व नगरसेवकांच्यावतीने त्याबाबतची भूमिका सभागृहात मांडली आहे .

भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आहेत . तर नगराध्यक्ष समीर नलावडे हे देखील त्याच पक्षात आहेत . त्यामुळे त्यांच्यावर पक्षीय दबाव तसेच दडपण येण्याची शक्यता आहे . त्यांना पक्षाचे दरवाजे देखील बंद होऊ शकतात . तशी परिस्थिती निर्माण झाली तर नगराध्यक्षांना शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत . त्यांना आमच्याकडे येण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही . त्यामुळे भाजी मार्केट प्रश्नी त्यांनी आपली भूमिका कायम ठेवावी. असे यावेळी सुशांत नाईक म्हणाले.

टॅग्स :MarketबाजारKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग