शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: संततधार पावसाने काही रस्ते पाण्याखाली, वाहतूक झाली होती ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:15 IST

कणकवली तालुक्यात नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर येऊन शेजारील रस्त्यावर आल्याने काही काळ ते रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते.पाऊस थांबल्यावर पाणी ओसरल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. सोमवारी दिवसभर अधून मधून किरकोळ सरी कोसळत असल्या तरी पावसाने तशी उसंतच घेतली होती. रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील जानवली, गडनदी तसेच अन्य नद्यांची पात्रे तुडुंब भरून वाहत होती. काही ठिकाणी पात्राबाहेर पुराचे पाणी आले होते. तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर सदृश पाणी आल्याने आजूबाजूच्या परिसराला पाण्याचा वेढा पडला होता. तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी दुपारनंतर पाणी बऱ्यापैकी ओसरले होते. खबरदारी म्हणून महसूल विभागाबरोबरच पोलिस प्रशासन देखील विविध ठिकाणी सक्रिय होते.कणकवली आचरा मार्गावर वरवडे फणसवाडी येथे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. अर्थात या रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण न झाल्याने काही प्रमाणातच दुचाकी तसेच चारचाकी त्या मार्गावरून जात असतात. त्या मार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली नाही. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास वरवडे येथील रस्त्यावर आलेले पाणी ओसरले. मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने पूरस्थिती पूर्वपदावर आली होती.शालेय बसफेरी पर्यायी मार्गाने वळविलीहळवल गावातील भाकरवाडी-शिवडाव जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी आले होते. सोमवारी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास काहीसे पाणी कमी झाले होते. मात्र मार्गावरील वाहतूक ठप्प होती. सोमवारपासून शाळा देखील सुरू झाल्या. मात्र रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे शालेय बसफेरी देखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला.पुराचे पाणी रस्त्यावर, वाहतूक काही काळ ठप्पसोमवारी सकाळी हरकुळ बुद्रूक भाट दुकान नजीक पुलावरून पाणी वाहत होते. जानवली व गडनदी दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे जानवली नदीवरील गणपती सान्यावरही पाणी वाढले होते. तर शिवडाव, हळवल या ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.