शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

उष्माघातामुळे आंबा डागळतोय, लासे होण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 5:00 PM

गेले आठ दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे उष्माघात होऊन आंब्यांच्या देठातील डिंक सुकून आंबे जमिनीवर पडून आंब्यांमध्ये लासे होण्याचे प्रकार जिल्ह्यात ठिकठिकाणी घडले आहेत.

ठळक मुद्देउष्माघातामुळे आंबा डागळतोय, लासे होण्याचा प्रकार बागायतदार, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

वेंगुर्ले : गेले आठ दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे उष्माघात होऊन आंब्यांच्या देठातील डिंक सुकून आंबे जमिनीवर पडून आंब्यांमध्ये लासे होण्याचे प्रकार जिल्ह्यात ठिकठिकाणी घडले आहेत.यामुळे आंबा बागायतदार व शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले असून अद्यापपर्यंत याची दखल प्रशासन, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी घेतली नसल्याने याबाबत वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या हंगामात सुरुवातीलाच काही ठिकाणी आंब्याचे उत्पादन कमी असून आता गेले काही दिवस वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एका झाडावर असलेल्या आंब्यांच्या ३० ते ४० टक्के आंबे या उष्माघातामुळे खाली पडून नुकसान झाले आहे. या आंब्यांना कैरी विक्रेत्यांनीही घेण्यासाठी नकार दिल्यामुळे हे आंबे अक्षरश: फेकून देण्याची वेळ बागायतदारांवर आली आहे. असा प्रकार घडूनही प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने बागायतदारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तसेच आंबा बागायतदार शेतकऱ्यांकडून १२ हजार व केंद्र शासनाने १२ हजार असा एकूण २४ हजारांचा विमा काढला असून हे पैसे या विमा कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी आहेत काय? असा सवालही परब यांनी केला आहे.शासनाने दखल घेण्याची मागणीया प्रकारामुळे आंबे कुसण्याचे प्रकार घडत असल्याने मुंबई बाजारपेठेत जोपर्यंत कॅनिंग सुरू होत नाही तोपर्यंत आंबे घेण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याचेही परब यांनी सांगितले आहे. तरी शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन कृषी विभागाने संपूर्ण जिल्ह्याचा सर्व्हे करावा व नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणीही परब यांनी केली आहे.

 

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग