शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

आंबा, काजू पिकांवर अवकाळी संकट - ढगाळ वातावरण : बागायतदारांची तारेवरची कसरत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:22 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

-प्रथमेश गुरव । वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

साधारणत: पाऊस आटोक्यात आल्यानंतर दसरा, दिवाळी या सणांमध्ये आंबा-काजू बागायतदारांमध्ये व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाते. त्यानुसार नवीन बागा विकत घेणे किंवा करारावर घेणे तसेच जुन्या बागांचा करार वाढवून घेणे आदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आता घेतलेल्या बागांची स्वच्छता करणे, आंबा कलमांवर आलेली बांधा काढणे अशी कामे बºयापैकी बागायतदारांनी उरकून घेतली. काही ठिकाणी आंबा कलमांवर औषधांची पहिली फवारणी झाली असून काही बागांमध्ये औषध फवारणीचे काम सुरु आहे. त्यासाठी कित्येक स्थानिक तरुण, मध्यमवयीन पुरुष बागांमध्ये राबत आहेत. हे सर्व चालू असताना अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने बागायतदारांपुढे संकट निर्माण झाले आहे.शासनाकडून मात्र उपेक्षाआतापर्यंत अनेक वेळा आंबा बागायतदारांना वेगवेगळ्या समस्येचा सामना करावा लागला आहे. आंबा पीक कधी कधी धोक्यातही येते. पण शासनाकडून मदत मिळत नाही. वेगवेगळ््या घोषणा फक्त केल्या जातात. प्रत्यक्षात शेतकरी,  आंबा बागायतदार उपेक्षितच राहतो. आंबा पिकांना विमा संरक्षण देण्याची गरज आहे. तसेच कृषी विभागानेही आंबा पीक जास्तीत जास्त यावे यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच अडीअडचणीच्या काळात आंबा बागायतदारांच्या मागे उभे राहणेही गरजेचे आहे. मात्र सर्व स्तरावर शासनाकडून आंबा बागायतदारांची उपेक्षाच होत असते.कोकणातील शेतकरी मागे पडतोकोकणात फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. पण हे आंबा पीक काही कारणांनी धोक्यात आल्यास त्याकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नसतो. शासनस्तरावरही दखल घेतली जात नाही. या उलट विदर्भ, मराठवाडा येथे कोणतेही पीक धोक्यात आले तर शासन त्यांच्या पाठीशी उभे राहते. मात्र आपला शेतकरी शासनाशी भांडत नाही आणि येथील राजकीय नेतेही शासनाकडे भांडण्यात कमी पडतात. त्यामुळे शेतकरी कमी पडतो.हलक्या पावसामुळे अशाप्रकारे आंबा पिकावर करपा व तुडतुड्या रोगाची शक्यता आहे.पानावरील करपा मोहोरावरील करपाआंब्यावरील तुडतुडे

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग