शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू पिकांवर अवकाळी संकट - ढगाळ वातावरण : बागायतदारांची तारेवरची कसरत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:22 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

-प्रथमेश गुरव । वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

साधारणत: पाऊस आटोक्यात आल्यानंतर दसरा, दिवाळी या सणांमध्ये आंबा-काजू बागायतदारांमध्ये व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाते. त्यानुसार नवीन बागा विकत घेणे किंवा करारावर घेणे तसेच जुन्या बागांचा करार वाढवून घेणे आदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आता घेतलेल्या बागांची स्वच्छता करणे, आंबा कलमांवर आलेली बांधा काढणे अशी कामे बºयापैकी बागायतदारांनी उरकून घेतली. काही ठिकाणी आंबा कलमांवर औषधांची पहिली फवारणी झाली असून काही बागांमध्ये औषध फवारणीचे काम सुरु आहे. त्यासाठी कित्येक स्थानिक तरुण, मध्यमवयीन पुरुष बागांमध्ये राबत आहेत. हे सर्व चालू असताना अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने बागायतदारांपुढे संकट निर्माण झाले आहे.शासनाकडून मात्र उपेक्षाआतापर्यंत अनेक वेळा आंबा बागायतदारांना वेगवेगळ्या समस्येचा सामना करावा लागला आहे. आंबा पीक कधी कधी धोक्यातही येते. पण शासनाकडून मदत मिळत नाही. वेगवेगळ््या घोषणा फक्त केल्या जातात. प्रत्यक्षात शेतकरी,  आंबा बागायतदार उपेक्षितच राहतो. आंबा पिकांना विमा संरक्षण देण्याची गरज आहे. तसेच कृषी विभागानेही आंबा पीक जास्तीत जास्त यावे यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच अडीअडचणीच्या काळात आंबा बागायतदारांच्या मागे उभे राहणेही गरजेचे आहे. मात्र सर्व स्तरावर शासनाकडून आंबा बागायतदारांची उपेक्षाच होत असते.कोकणातील शेतकरी मागे पडतोकोकणात फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. पण हे आंबा पीक काही कारणांनी धोक्यात आल्यास त्याकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नसतो. शासनस्तरावरही दखल घेतली जात नाही. या उलट विदर्भ, मराठवाडा येथे कोणतेही पीक धोक्यात आले तर शासन त्यांच्या पाठीशी उभे राहते. मात्र आपला शेतकरी शासनाशी भांडत नाही आणि येथील राजकीय नेतेही शासनाकडे भांडण्यात कमी पडतात. त्यामुळे शेतकरी कमी पडतो.हलक्या पावसामुळे अशाप्रकारे आंबा पिकावर करपा व तुडतुड्या रोगाची शक्यता आहे.पानावरील करपा मोहोरावरील करपाआंब्यावरील तुडतुडे

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग