शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू पिकांवर अवकाळी संकट - ढगाळ वातावरण : बागायतदारांची तारेवरची कसरत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:22 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

-प्रथमेश गुरव । वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

साधारणत: पाऊस आटोक्यात आल्यानंतर दसरा, दिवाळी या सणांमध्ये आंबा-काजू बागायतदारांमध्ये व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाते. त्यानुसार नवीन बागा विकत घेणे किंवा करारावर घेणे तसेच जुन्या बागांचा करार वाढवून घेणे आदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आता घेतलेल्या बागांची स्वच्छता करणे, आंबा कलमांवर आलेली बांधा काढणे अशी कामे बºयापैकी बागायतदारांनी उरकून घेतली. काही ठिकाणी आंबा कलमांवर औषधांची पहिली फवारणी झाली असून काही बागांमध्ये औषध फवारणीचे काम सुरु आहे. त्यासाठी कित्येक स्थानिक तरुण, मध्यमवयीन पुरुष बागांमध्ये राबत आहेत. हे सर्व चालू असताना अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने बागायतदारांपुढे संकट निर्माण झाले आहे.शासनाकडून मात्र उपेक्षाआतापर्यंत अनेक वेळा आंबा बागायतदारांना वेगवेगळ्या समस्येचा सामना करावा लागला आहे. आंबा पीक कधी कधी धोक्यातही येते. पण शासनाकडून मदत मिळत नाही. वेगवेगळ््या घोषणा फक्त केल्या जातात. प्रत्यक्षात शेतकरी,  आंबा बागायतदार उपेक्षितच राहतो. आंबा पिकांना विमा संरक्षण देण्याची गरज आहे. तसेच कृषी विभागानेही आंबा पीक जास्तीत जास्त यावे यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच अडीअडचणीच्या काळात आंबा बागायतदारांच्या मागे उभे राहणेही गरजेचे आहे. मात्र सर्व स्तरावर शासनाकडून आंबा बागायतदारांची उपेक्षाच होत असते.कोकणातील शेतकरी मागे पडतोकोकणात फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. पण हे आंबा पीक काही कारणांनी धोक्यात आल्यास त्याकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नसतो. शासनस्तरावरही दखल घेतली जात नाही. या उलट विदर्भ, मराठवाडा येथे कोणतेही पीक धोक्यात आले तर शासन त्यांच्या पाठीशी उभे राहते. मात्र आपला शेतकरी शासनाशी भांडत नाही आणि येथील राजकीय नेतेही शासनाकडे भांडण्यात कमी पडतात. त्यामुळे शेतकरी कमी पडतो.हलक्या पावसामुळे अशाप्रकारे आंबा पिकावर करपा व तुडतुड्या रोगाची शक्यता आहे.पानावरील करपा मोहोरावरील करपाआंब्यावरील तुडतुडे

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग