शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

हिवाळ्यात पावसाळा; सिंधुदुर्गला झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 14:31 IST

पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा आहे. मच्छीमारांसाठीही येत्या चोवीस तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग : गेले काही दिवस जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत होता. मात्र बुधवारी सायंकाळ पासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु झाली ती आज गुरूवारी दुपारपर्यंत कायम होती. या पावसाचा फटका आंबा आणि काजू पिकाला बसणार आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.चौवीस तास हाय अलर्टपाऊस मुसळधार नसला तरी तो सातत्याने पडत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा होता. अनेक ठिकाणी धुक्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते. मच्छीमारांसाठीही येत्या चोवीस तासांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.मच्छिमार व्यवसाय ठप्पमच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या बहुतांशी नौका बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत देवगड बंदरात दाखल होत होत्या. सध्या बांगडा, म्हाकुल, सौंदाळा आदी मासळी मिळत होती. गेले आठ दिवस समाधानकारक स्थिती होती. मात्र वादळी वाऱ्यामुळे वातावरणात पुन्हा एकदा मच्छीमारी व्यवसायावर संकट कोसळले असून सुरळीत सुरू असलेला व्यवसाय ठप्प झाला आहे.इतर राज्यातील नौका दाखल१ ते ५ डिसेंबर या कालावधीत पाऊस व ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने जिल्ह्यातील मच्छीमारांनी समुद्रात मच्छीमारी साठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिल्याने सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात स्थानिक लोकांबरोबरच मालवण गुजरात राज्यातील नौका दाखल होत आहेत.थंडी गायब, किडरोगाचा प्रादुर्भाव होणारनोव्हेंबर महिना हा कडक थंडीचा असतो. मात्र, यावर्षी अवकाळी पाऊस सातत्याने पडत असल्याने थंडी गायब झाली आहे. या महिन्यात आंबा, काजू कलमांना पालवी फुटून त्यानंतर मोहाेर व फळधारणा होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून आंबा, काजू ही कोकणी फळे बाजारात येत असतात. मात्र, यावर्षी अजूनही पाऊस सुरू असल्याने त्याचा फटका या फळांना बसणार आहे. आता पडत असलेल्या अवकाळी पावसाने किडरोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकरी आणि बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.हवामान खात्याचा अचूक अंदाजहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेले दोन दिवस जिल्ह्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी वारे वाहत आहेत. समुद्र खवळला असल्याने मासेमारी ठप्प आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसfishermanमच्छीमारFarmerशेतकरी