शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात जमिनी जाणा-या देवस्थानांना नुकसानभरपाई मिळणार- महेश जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 15:31 IST

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात ज्या देवस्थान समितीच्या जमिनी जात आहेत त्या देवस्थानांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी चर्चा केली.

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात ज्या देवस्थान समितीच्या जमिनी जात आहेत त्या देवस्थानांना नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी चर्चा केली. देवस्थान समितीचा एकच ना हरकत दाखला देण्याची मागणी केली.काळसेकर यांनी जाधव यांची कोल्हापूर येथे देवस्थान कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष चारूदत्त देसाई, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अभिषेक चव्हाण आदी उपस्थित होते. जाधव यांनी जिल्हा दौ-यावर येऊन जिल्ह्यातील देवस्थाने सुरळीत चालावीत यासाठी मार्गदर्शन करण्यासंदर्भात तसेच जिल्ह्यातील सर्व देवस्थानांना टप्प्याटप्प्याने भेटी देण्या संदर्भात काळसेकर यांनी विनंती केली.छोट्या मोठ्या गैरसमजुती, कायद्यातील अज्ञान अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक देवस्थान उपसमित्यांमध्ये वाद आहेत. त्यावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी जाधव यांनी जातीने लक्ष घालावा अशी आग्रहाची मागणी काळसेकर यांनी केली आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत महेश जाधव यांनी २२ किंवा २३ डिसेंबरच्या दरम्यान जिल्ह्यात येण्याचे आश्वासन यावेळी दिले. नेरूर, वेतोरे आदी गावातील उपसमित्यांच्या पदाधिका-यांनी अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली महेश जाधव यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.या चर्चेदरम्यान अतुल काळसेकर यांनी महेश जाधव यांचे आणखी एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान होणा-या जमीन संपादनात काही देवस्थानांच्या जमिनी संपादित होत आहेत, त्यात देवस्थान समिती ४0 टक्के आणि कुळांना ६० टक्के नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. प्रत्येक खातेदारांना देवस्थान समितीचा नाहरकत दाखला आवश्यक असणार आहे. तो गावातील सर्वच कुळांना मिळून एकच देता येईल का यावर विचार करावा, अशी मागणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग