शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाविकास आघाडीला धोका उद्भवणार नाही, शिवसेना आमदाराने व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 16:30 IST

आमदार दीपक केसरकरांबाबत तसा कोणताही प्रकार घडला नाही

कणकवली :  मातोश्री हे आमचे दैवत तर सेनाभवन हे आमचे घर आहे. आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेसोबतच आहोत. कोकणला गद्दारीचा लागलेला कलंक कोकणातील आमच्यासारख्या आमदारांनी आज पुसला आहे. जे गेलेत ते निश्चित परत येतील. राज्यातील महाविकास आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन महाविकास आघाडीला धोका उद्भवणार नाही, असा निर्णय वरिष्ठ घेतील, अशा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेचे कुडाळ – मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे बुधवारी सकाळी श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने  कणकवलीत दाखल झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते तातडीने मुंबईला रवाना होण्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, कोकणातील सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे आहेत. त्यामुळे जे कुणी गेलेले आहेत ते सर्वजण परत येतील, असा आपणाला ठाम विश्वास आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही काम करतो. त्यांचे आदेश माणून काम करतो म्हणून आम्ही निवडून येतो. त्यामुळे आमच्यासारखा कार्यकर्ता कायमस्वरूपी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे , असेही आमदार वैभव नाईक म्हणाले.केसरकरांबाबत तसा कोणताही प्रकार घडला नाहीमुंबईमध्ये एका हॉटेलमधून बाहेर पडताना शिवसैनिकांनी माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांना अडवले. या वृत्ताचा आमदार वैभव नाईक यांनी इन्कार केला. आमदार दिपक केसरकर व आपण एकत्रच होतो. उलट दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आहोत. त्यामुळे असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसेच मंगळवारच्या मुंबई येथील वर्षावरील बैठकीला किती आमदार होते ? यावर वरिष्ठच उत्तर देतील. मात्र , उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलेले आहे . त्यामुळे आम्ही कायमस्वरूपी त्यांच्यासोबतच आहोत. तसेच महाविकास आघाडीला धोका उद्भवू नये , असा निर्णय वरिष्ठ घेतील . महाविकास आघाडीला धोका आहे, असे आपणाला वाटत नसल्याचे आमदार वैभव नाईक यावेळी  म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVaibhav Naikवैभव नाईक