शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या विरोधात: प्रमोद जठार यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:28 IST

bjp, Farmar, Pramod Jathar, sindhudurgnews महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून आता सरकारमधील कार्यकर्ते मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या विरोधात: प्रमोद जठार यांचा आरोपकेंद्रशासनाच्या कृषी विधेयकाला विरोध केल्याबाबत कडाडून टीका

देवगड :    महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून आता सरकारमधील कार्यकर्ते मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे गॉडफादर शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जी संकल्पना मांडली तीच संकल्पना केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्यातून सत्यात आली. मात्र, या कायद्याला महाविकास आघाडी शासनाने विरोध केला आहे. विरोध करणाऱ्या सरकारमधील घटक असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील पान क्रमांक २३८ वाचावे,असा सल्ला भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिला आहे.भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद जठार बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, शहरअध्यक्ष योगेश पाटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर आदी उपस्थित होते.केंद्रशासनाच्या कृषी विधेयकाला राज्यशासनाने विरोध केला. यावरून जठार यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला. या विधेयकाला राज्यशासनाने विरोध केला यावरून आत्मचरित्रात भूमिका मांडून शेतकऱ्यांबद्दल दाखवित असलेला एक चेहरा व प्रत्यक्षात सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कायद्याला विरोध करून दाखवित असलेला चेहरा हा आता जनतेने ओळखणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी, सेना, काँग्रेसचे कार्यकर्ते आत मूग गिळून गप्प का? असा सवाल जठार यांनी करीत शासनाच्या या धोरणाबाबत आवाज उठविणार असल्याचे सांगितले.विरोधासाठी विरोध, सरकारकडून सुडाचे राजकारणहे सरकार केवळ विरोधासाठी विरोध करून सुडाचे राजकारण करीत आहे, असा घणाघात जठार यांनी केला. आघाडी सरकारमधील मंत्र्यांना त्यांचे गॉडफादर असलेले शरद पवार यांचे आत्मचरित्र वाचायला देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्याला विरोध करणाऱ्या सत्तेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा जठार यांनी दिला.

नाणार प्रकल्पाला विरोध करून सेनेने तरुणांचा रोजगार घालविला. कृषी विधेयकाला विरोध करून राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या हिताचा आड येत आहे. यावरूनच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची शेतकरी, ग्राहक, युवावर्ग यांच्याबद्दलची असलेली कळकळ दिसून येत आहे.एकीकडे महाविकास आघाडीचे गॉडफादर शरद पवार यांच्या आत्मचरित्रात कृषी उत्पन्न बाजार समिती ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल खुल्या बाजारपेठेत विकावा अशी संकल्पना मांडली. हीच संकल्पना मोदींनी कृषी कायद्यातून सत्यात आणली.

टॅग्स :FarmerशेतकरीPramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग