शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या विरोधात: प्रमोद जठार यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:28 IST

bjp, Farmar, Pramod Jathar, sindhudurgnews महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून आता सरकारमधील कार्यकर्ते मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या विरोधात: प्रमोद जठार यांचा आरोपकेंद्रशासनाच्या कृषी विधेयकाला विरोध केल्याबाबत कडाडून टीका

देवगड :    महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून आता सरकारमधील कार्यकर्ते मूग गिळून गप्प का? असा सवाल भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे गॉडफादर शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात जी संकल्पना मांडली तीच संकल्पना केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्यातून सत्यात आली. मात्र, या कायद्याला महाविकास आघाडी शासनाने विरोध केला आहे. विरोध करणाऱ्या सरकारमधील घटक असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील पान क्रमांक २३८ वाचावे,असा सल्ला भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिला आहे.भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रमोद जठार बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, शहरअध्यक्ष योगेश पाटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर आदी उपस्थित होते.केंद्रशासनाच्या कृषी विधेयकाला राज्यशासनाने विरोध केला. यावरून जठार यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल केला. या विधेयकाला राज्यशासनाने विरोध केला यावरून आत्मचरित्रात भूमिका मांडून शेतकऱ्यांबद्दल दाखवित असलेला एक चेहरा व प्रत्यक्षात सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कायद्याला विरोध करून दाखवित असलेला चेहरा हा आता जनतेने ओळखणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी, सेना, काँग्रेसचे कार्यकर्ते आत मूग गिळून गप्प का? असा सवाल जठार यांनी करीत शासनाच्या या धोरणाबाबत आवाज उठविणार असल्याचे सांगितले.विरोधासाठी विरोध, सरकारकडून सुडाचे राजकारणहे सरकार केवळ विरोधासाठी विरोध करून सुडाचे राजकारण करीत आहे, असा घणाघात जठार यांनी केला. आघाडी सरकारमधील मंत्र्यांना त्यांचे गॉडफादर असलेले शरद पवार यांचे आत्मचरित्र वाचायला देण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्याला विरोध करणाऱ्या सत्तेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा जठार यांनी दिला.

नाणार प्रकल्पाला विरोध करून सेनेने तरुणांचा रोजगार घालविला. कृषी विधेयकाला विरोध करून राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या हिताचा आड येत आहे. यावरूनच महाविकास आघाडीतील घटक पक्षांची शेतकरी, ग्राहक, युवावर्ग यांच्याबद्दलची असलेली कळकळ दिसून येत आहे.एकीकडे महाविकास आघाडीचे गॉडफादर शरद पवार यांच्या आत्मचरित्रात कृषी उत्पन्न बाजार समिती ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल खुल्या बाजारपेठेत विकावा अशी संकल्पना मांडली. हीच संकल्पना मोदींनी कृषी कायद्यातून सत्यात आणली.

टॅग्स :FarmerशेतकरीPramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग