शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 14:39 IST

कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आज कणकवलीत झाली.

कणकवली/ मुंबई -  विरोधी पक्षनेते म्हणून नारायण राणे यांनी आक्रमकपणे काम केले होते. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सुरुवातीलापासूनच  मिळाले आहे. आज त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचा संपूर्ण परिवार भाजपामध्ये दाखल झाला आहे याचा आनंद आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आज कणकवलीत झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण झाले, 'नारायण राणेंच्या भाजपाप्रवेशाबाबत अनेक दिवसांपासून विचारणा होत होती. मात्र नारायण राणे हे कधीच भाजपावासी झाले होते. तसेच नितेश राणेंनाही उमेदवारी देताना त्यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले होते. त्यामुळे आता केवळ स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणाचा प्रश्न उरला होता. अखेर हे विलिनीकरण कणकवली येथे करण्याचा निश्चित करण्यात आले. त्यानुसार आज पक्षप्रवेश झाला आहे.''असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ''नारायण राणेंशी सुरुवातीपासूनच माझे चांगले संबंध होते. नारायण राणेंनी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमक काम केले होते. विरोधी पक्षात असताना त्याचे मार्गदर्शन सुरुवातीपासूनच लाभले. आज राणेंचा संपूर्ण परिवार भाजपावासी झाला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षाविस्तारासाठी होईल,''असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या मतदारसंघात भाजपाचाच विजय निश्चित आहे. येथे सुमारे 65 ते 70 टक्के मतदान भाजपाला होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक शांतपणे लढावी, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षांतील कारभारापेक्षा आम्ही पाच वर्षांत अधिक चांगले काम केले आहे. कोकणाच्या विकासासंदर्भात काही प्रश्न आहेत. त्यापैकी सीवर्ल्डचे काम येत्या दोन वर्षांत करून दाखवू. तसेच नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक सिंधदुर्गात घेतली जाईल, असे आश्वासनही मुख्यंत्र्यांनी दिले. त्याबरोबरच कोकणातून वाहून जाणारे पाणी अडवून कोकणाला टँकरमुक्त करण्याचे काम पुढील काळात केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे kankavli-acकणकवली