शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
3
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
4
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
7
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
8
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
9
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
10
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
11
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
12
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
13
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
14
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
15
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
16
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
17
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
18
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
19
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
20
शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, "हेच लोकशाहीचं सौंदर्य"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, सिंधुदुर्गात काँग्रेसची पाटी कोरीच; राजापुरात बंडाचे निशाण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 30, 2024 19:07 IST

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा कोकण म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची ओळख होती; मात्र ...

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा कोकण म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची ओळख होती; मात्र लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीतून रत्नागिरीतील पाच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन म्हणजे एकूण आठपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेसची पाटी कोरी राहिली आहे.यामुळे कट्टर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून, पक्षाच्या या परिस्थितीला जबाबदार कोण ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. याच रागातून राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.कोकणातील नेत्यांना आमदार, खासदार, महामंडळाचे अध्यक्ष, राज्यातील विविध मंत्रिपदे आदी पदे मिळाली आहेत.खासदार नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना म्हणजे सन २००५ साली राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे त्यांच्याकडे होती. सन २००५ ते २०१४ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने काँग्रेसकडे होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा हात जगन्नाथ ठरला होता. आमदार नितेश राणे यांच्या रूपाने कणकवली विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये काँग्रेसचा कोकणातील एकमेव आमदार होता. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही राज्यात सर्वत्र काँग्रेसचा पराभव झाला असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसचा मोठा विजय झाला होता.

नेतृत्वाकडूनही दुर्लक्षनारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत स्वत:चा स्वाभिमान पक्ष काढला आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसची पूर्णत: वाताहत झाली. राणेंसोबत जे काँग्रेसमध्ये गेले होते. ते पुन्हा राणेंच्या समवेत त्यांच्या पक्षात गेले आणि काही काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते होते ते देखील राणेंसमवेत गेले. या सर्व घटनांकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मात्र वेळोवेळी दुर्लक्ष केले.

राजापुरात काँग्रेसमधून बंडाचे निशाणकाँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांना राजापूर मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा वाटत होती. मागील दोन वर्षांपासून ते त्यादृष्टीने प्रयत्नशील होते. महाविकास आघाडीत रत्नागिरीतील पाच मतदारसंघापैकी चार मतदारसंघ उद्धवसेना आणि एक मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला. त्यामुळे अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत राजापूरमधून बंडाचे निशाण रोवले आहे.

आघाडीचेच काम करणारराज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन व्हावे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्ह्यात एकही जागा काँग्रेसला मिळाली नसली तरी आम्ही नाराज न होता आघाडी धर्म पाळणार असून आघाडीच्या उमेदवारांसाठी मनापासून काम करणार आहोत. - प्रदीप मांजरेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष, कणकवली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीkankavli-acकणकवलीcongressकाँग्रेसthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024