शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

रत्नागिरी, सिंधुदुर्गात काँग्रेसची पाटी कोरीच; राजापुरात बंडाचे निशाण

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 30, 2024 19:07 IST

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा कोकण म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची ओळख होती; मात्र ...

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा कोकण म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची ओळख होती; मात्र लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीतून रत्नागिरीतील पाच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन म्हणजे एकूण आठपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेसची पाटी कोरी राहिली आहे.यामुळे कट्टर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून, पक्षाच्या या परिस्थितीला जबाबदार कोण ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. याच रागातून राजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.कोकणातील नेत्यांना आमदार, खासदार, महामंडळाचे अध्यक्ष, राज्यातील विविध मंत्रिपदे आदी पदे मिळाली आहेत.खासदार नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना म्हणजे सन २००५ साली राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे त्यांच्याकडे होती. सन २००५ ते २०१४ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने काँग्रेसकडे होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा हात जगन्नाथ ठरला होता. आमदार नितेश राणे यांच्या रूपाने कणकवली विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये काँग्रेसचा कोकणातील एकमेव आमदार होता. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही राज्यात सर्वत्र काँग्रेसचा पराभव झाला असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसचा मोठा विजय झाला होता.

नेतृत्वाकडूनही दुर्लक्षनारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत स्वत:चा स्वाभिमान पक्ष काढला आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसची पूर्णत: वाताहत झाली. राणेंसोबत जे काँग्रेसमध्ये गेले होते. ते पुन्हा राणेंच्या समवेत त्यांच्या पक्षात गेले आणि काही काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते होते ते देखील राणेंसमवेत गेले. या सर्व घटनांकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मात्र वेळोवेळी दुर्लक्ष केले.

राजापुरात काँग्रेसमधून बंडाचे निशाणकाँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांना राजापूर मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा वाटत होती. मागील दोन वर्षांपासून ते त्यादृष्टीने प्रयत्नशील होते. महाविकास आघाडीत रत्नागिरीतील पाच मतदारसंघापैकी चार मतदारसंघ उद्धवसेना आणि एक मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला. त्यामुळे अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत राजापूरमधून बंडाचे निशाण रोवले आहे.

आघाडीचेच काम करणारराज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन व्हावे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जिल्ह्यात एकही जागा काँग्रेसला मिळाली नसली तरी आम्ही नाराज न होता आघाडी धर्म पाळणार असून आघाडीच्या उमेदवारांसाठी मनापासून काम करणार आहोत. - प्रदीप मांजरेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष, कणकवली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीkankavli-acकणकवलीcongressकाँग्रेसthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024