शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

CAA: हिंसाचार माजवून राजकारण करणाऱ्यांच्या पाठीमागे विरोधकांचा हात: भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:21 IST

घटनात्मक चौकटीत राहून करण्यात आलेल्या कायद्याचे आव्हान देणाऱ्या काँग्रेसला संसदीय कार्यपद्धती, संविधान मान्य नाही, असेच यातून दिसून येत असल्याचे टीकास्त्रदेखील त्यांनी केले.

रत्नागिरी ( देवरुख ) : नागरिकत्व कायद्यावरून एवढा विरोध आणि संघर्ष का सुरू आहे. आपण संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. हा कायदा सरकारने बहुमताने घटनात्मक कार्यपद्धतीच्या चौकटीत राहूनच संमत केलेला आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीला संविधानाशी, घटनात्मक कार्यपद्धतीशी बांधीलकी नसल्याचा आरोप भाजपचे महाराष्ट्र मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी देवरुख येथे केला. 'नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ भ्रम आणि वास्तव' याविषयी व्याख्यान व चर्चासत्रात भंडारी बोलत होते.

यावेळी भंडारी म्हणाले की, सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून विरोधी भूमिका टोकाला पोहोचल्या आहेत. टोकाची विधाने दिल्लीच्या शाहीनबाग यांच्याकडून केली जात आहेत. कायद्याचे समर्थन करणाऱ्यांना देखील हा कायदा म्हणजे काय हे कळालेले नाही, तर विरोधी भूमिका संघर्ष करणाऱ्यांना देखील याची नीटशी माहिती नाही. तर कायद्याला विरोध करुन जे लोक हिंसाचार माजवून राजकारण करीत आहेत, त्याच्या पाठीमागे विरोधकांचा हात असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.

नागरिकत्व सुधारणा कायद्याचे विधेयक डिसेंबरमध्ये मांडण्यात आले. या कायद्यामध्ये आजपर्यंत सातवेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. यातील सहावेळा दुरुस्त्या काँग्रेसच्या राजवटीत झाल्या आहेत. २००३ मध्ये झालेली दुरुस्ती आणि आता केलेली दुरुस्ती या दोनच दुरुस्त्या भाजपच्या सरकारने केल्या आहेत. घटनात्मक चौकटीत राहून करण्यात आलेल्या कायद्याचे आव्हान देणाऱ्या काँग्रेसला संसदीय कार्यपद्धती, संविधान मान्य नाही, असेच यातून दिसून येत असल्याचे टीकास्त्रदेखील त्यांनी केले.