शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

CAA : राजकरणासाठी समाजात संघर्ष भडकविण्याच्या प्रयत्न: माधव भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 10:18 IST

या दुरुस्तीमुळे कोणाच्याही नागरिकत्व बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही.

सिंधुदुर्ग ( वेंगुर्ला ) : २०१९ मध्ये भारतीय नागरिकत्व कायद्यात केलेल्या दुरुस्तीबाबत अत्यंत खोटे बोलून, अपप्रचार करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम गेले काही दिवस सातत्याने सुरु आहे. जनतेने या दुरुस्ती केलेल्या कायद्यातील सत्य समजून घ्यावे. कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. केवळ राजकारणासाठी जे समाजात संघर्ष भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडे जनतेने पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन भाजपाचे प्रमुख प्रवक्ते माधव भांडारी यांनी वेंगुर्ला येथे केले.

तर यावेळी भांडारी म्हणाले, ज्या मुद्यावर आम्ही मते मागितली त्या मुद्यावर काम करणे आमचे कर्तव्य आहे, आणि ते आम्ही करीत आहोत. या कायद्यात केलेली दुरुस्ती वास्तविक सर्वसमावेश आहे. या दुरुस्तीमुळे कोणाला नागरिकत्व सिद्ध करण्याचा तसेच कोणतीही कागदपत्रे मागण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही, असे ते म्हणाले.

सन १९५0 ते २00९ या काळामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतून त्या देशातील जे हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी हे निर्वासित म्हणून भारतामध्ये आलेले आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व देणे एवढ्या मर्यादित कारणासाठी ही दुरुस्ती केलेली आहे.

त्यामुळे या दुरुस्तीमुळे कोणाच्याही नागरिकत्व बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. जनतेने एवढे समजून घ्यावे की, यात केलेली दुरुस्ती ही या कायद्यातील पहिली दुरुस्ती नसून यापूर्वी ५ दुरुस्त्या अशाप्रकारे वेगवेगळ्या देशातील नागरिकांसाठी त्या त्या वेळच्या सरकारने केल्या आहेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने दुरुस्त्या कराव्या लागल्या तरी त्यावेळी जे कोणी सरकार असेल त्यांना ते करावे लागेल, असेही माधव भांडारी यांनी सांगितले.

नागरिकत्व दुरुस्त विधेयकाबाबत राजकीय पक्षांची काही नेतेमंडळी समाजात वेगवेगळ्या अफवा पसरवित आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत असल्याचे भांडारी यांनी स्पष्ट केले.