शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

सागाचे झाड घरावर कोसळून नुकसान, भातशेती, नाचणी शेती कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:15 IST

गेले चार दिवस देवगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊ स पडत आहे. पडेल येथील नामदेव शंकर बाणे यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे देवगड बंदरात दाखल झालेल्या सुमारे ७०० हून अधिक नौका समुद्रातील वातावरण स्थिर होईपर्यंत बंदरातच आश्रयाला राहणार आहेत. शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला तरी तालुक्यात १८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भातशेती व नाचणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देघरावर सागाचे झाड कोसळून सहा हजारांचे नुकसान शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या

देवगड : गेले चार दिवस देवगड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊ स पडत आहे. पडेल येथील नामदेव शंकर बाणे यांच्या घरावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे देवगड बंदरात दाखल झालेल्या सुमारे ७०० हून अधिक नौका समुद्रातील वातावरण स्थिर होईपर्यंत बंदरातच आश्रयाला राहणार आहेत. शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला तरी तालुक्यात १८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भातशेती व नाचणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गेले काही दिवस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ऐन दिवाळीच्या सणामध्येच नागरिकांच्या उत्साहावर विरजण टाकले आहे. शुक्रवारी रात्री पडेल येथील नामदेव बाणे यांच्या राहत्या घराच्या छपरावर सागाचे झाड पडून सुमारे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तसेच रस्त्यांच्या बाजूच्या संरक्षण भिंती व रस्त्यांच्या साईडपट्ट्या खचण्याचे प्रकारही घडले आहेत. पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.देवगड तालुक्यामधील बहुतांश गावांमध्ये आपल्या उदर निर्वाहापुरती भातशेती व नाचणी शेती केली जाते. सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर भातशेती व दीड हजार हेक्टरवरती नाचणी शेती केली जाते. यावर्षी मुबलक प्रमाणात सुरुवातीपासून पाऊस पडत असल्याने भातपीक चांगले आले होते. मात्र, हातातोंडाशी आलेल्या भातपीक कापणीच्यावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भातशेतीचे व नाचणी शेतीचे पूर्णत: नुकसान झाले आहे.तालुक्यातील मळेशेतीच्या ठिकाणी भातशेती कुजून गेल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील विजयदुर्ग दशक्रोशीतील काही गावांमधील परिस्थितीही काहीशी अशीच आहे. अतिवृष्टीमुळे नाचणी शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाहासाठी केली जाणारी देवगड तालुक्यामधील भात व नाचणीशेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने येथील शेतकऱ्यांसमोर यावर्षी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी