शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भातपिकाचे नुकसान, पीक आडवे पडल्यामुळे तीव्रता वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:35 IST

कडावल परिसरात पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्यामुळे पुढील काळातही नुकसानीची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वन्य प्राण्यांकडून शेती आधीच उद्ध्वस्त होत आहे. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपावसामुळे भातपिकाचे नुकसानपीक आडवे पडल्यामुळे तीव्रता वाढण्याची भीती

कडावल : कडावल परिसरात पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्यामुळे पुढील काळातही नुकसानीची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वन्य प्राण्यांकडून शेती आधीच उद्ध्वस्त होत आहे. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.कडावल परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडल्यामुळे परिसरातील ओढे- नाल्यांना मोठा पूर आला. परतीच्या या पावसाचा भातशेतीवर मात्र प्रतिकूल परिणाम झाला असून कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे झाल्याने उत्पादनात घट येण्याचा धोका निर्माण झाला आहे.पीक शेतात आडवे झाल्यामुळे दाणे गळ होऊन पुढील काळात नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी खरीप हंगामात भातशेतीला अतिवृष्टीचा वारंवार सामना करावा लागला आहे. पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने पिकाची वाढ खुंटली.

तसेच काही भागात करपासदृश रोगाची लागण झाल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर गवे, सांबर व माकडांसारख्या वन्य प्राण्यांकडूनही शेती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. आता भातकापणीचा हंगाम सुरू होत असतानाच पुन्हा पावसाचे संकट समोर उभे ठाकल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग