शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

पावसामुळे भातपिकाचे नुकसान, पीक आडवे पडल्यामुळे तीव्रता वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:35 IST

कडावल परिसरात पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्यामुळे पुढील काळातही नुकसानीची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वन्य प्राण्यांकडून शेती आधीच उद्ध्वस्त होत आहे. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपावसामुळे भातपिकाचे नुकसानपीक आडवे पडल्यामुळे तीव्रता वाढण्याची भीती

कडावल : कडावल परिसरात पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे पडल्यामुळे पुढील काळातही नुकसानीची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वन्य प्राण्यांकडून शेती आधीच उद्ध्वस्त होत आहे. आता भात कापणी हंगाम सुरू होत असताना पावसाचे संकट पुन्हा समोर ठाकल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.कडावल परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडल्यामुळे परिसरातील ओढे- नाल्यांना मोठा पूर आला. परतीच्या या पावसाचा भातशेतीवर मात्र प्रतिकूल परिणाम झाला असून कापणीयोग्य झालेले पीक शेतात आडवे झाल्याने उत्पादनात घट येण्याचा धोका निर्माण झाला आहे.पीक शेतात आडवे झाल्यामुळे दाणे गळ होऊन पुढील काळात नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी खरीप हंगामात भातशेतीला अतिवृष्टीचा वारंवार सामना करावा लागला आहे. पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने पिकाची वाढ खुंटली.

तसेच काही भागात करपासदृश रोगाची लागण झाल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर गवे, सांबर व माकडांसारख्या वन्य प्राण्यांकडूनही शेती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. आता भातकापणीचा हंगाम सुरू होत असतानाच पुन्हा पावसाचे संकट समोर उभे ठाकल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग