शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लाखोंचे नुकसान :, काजू बागायतीस आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:14 IST

बांदा : रोणापाल मळी भागातील तीन एकरातील काजू बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन काजू हंगामात ...

ठळक मुद्देरोणापाल मळी भागातील तीन एकरातील काजू झाडे जळून खाक

बांदा : रोणापाल मळी भागातील तीन एकरातील काजू बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन काजू हंगामात काजूबाग जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. सुमारे तीन एकरातील ६० ते ७० हून अधिक काजूची झाडे जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

गेली सात वर्षे मेहनत करून पीक घेण्यायोग्य झालेल्या काजूच्या झाडांना वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे आग लागल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. बागेतून जाणाऱ्या वीजवाहिन्यांचा यापूर्वी कधीच सर्व्हे न केल्यामुळे दुपारच्या सुमारास आलेल्या वाºयामुळे स्पार्किंग झाले. त्यामुळे आग लागून कलमे व काजूची झाडे यांच्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च आगीत जळून खाक झाल्याचे शेतकरी प्रकाश गावडे यांनी सांगितले.

मळी क्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची ही तिसरी वेळ असून शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच भविष्यातील सतर्कतेबाबत वीज वितरणकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. याला वीज वितरणच जबाबदार असल्याचे रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितले.

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांना माहिती देताच त्यांनी तातडीने अग्निशमन बंब पाठवून दिल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यापूर्वी आग आटोक्यात आणण्यासाठी सुरेश गावडे, माजी सरपंच प्रकाश गावडे, दशरथ गावडे, सुदीन गावडे, बाबू कोळापटे, विठ्ठल कोळापटे, बाळू तोरसकर, तुषार देऊलकर, नंदू नेमण यांच्यासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.

नुकसान भरपाई द्यावीबांदा वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अनिल यादव, वायरमन नारायण मयेकर, कर्मचारी उमेश कोरगावकर तसेच बांदा पोलीस विजय जाधव व होमगार्ड विश्वजित भोगटे, पोलीस पाटील निर्जरा परब यांनीही घटनास्थळी भेट दिली. कृषी व महसूल विभागाचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त झालेला नाही. महावितरण विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अभियंता अनिल यादव यांनी नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी