शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

लाखोंचे नुकसान :, काजू बागायतीस आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 18:14 IST

बांदा : रोणापाल मळी भागातील तीन एकरातील काजू बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन काजू हंगामात ...

ठळक मुद्देरोणापाल मळी भागातील तीन एकरातील काजू झाडे जळून खाक

बांदा : रोणापाल मळी भागातील तीन एकरातील काजू बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऐन काजू हंगामात काजूबाग जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. सुमारे तीन एकरातील ६० ते ७० हून अधिक काजूची झाडे जळून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

गेली सात वर्षे मेहनत करून पीक घेण्यायोग्य झालेल्या काजूच्या झाडांना वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे आग लागल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. बागेतून जाणाऱ्या वीजवाहिन्यांचा यापूर्वी कधीच सर्व्हे न केल्यामुळे दुपारच्या सुमारास आलेल्या वाºयामुळे स्पार्किंग झाले. त्यामुळे आग लागून कलमे व काजूची झाडे यांच्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च आगीत जळून खाक झाल्याचे शेतकरी प्रकाश गावडे यांनी सांगितले.

मळी क्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची ही तिसरी वेळ असून शेतकऱ्यांना कोणतीच नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच भविष्यातील सतर्कतेबाबत वीज वितरणकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. याला वीज वितरणच जबाबदार असल्याचे रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितले.

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांना माहिती देताच त्यांनी तातडीने अग्निशमन बंब पाठवून दिल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यापूर्वी आग आटोक्यात आणण्यासाठी सुरेश गावडे, माजी सरपंच प्रकाश गावडे, दशरथ गावडे, सुदीन गावडे, बाबू कोळापटे, विठ्ठल कोळापटे, बाळू तोरसकर, तुषार देऊलकर, नंदू नेमण यांच्यासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.

नुकसान भरपाई द्यावीबांदा वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अनिल यादव, वायरमन नारायण मयेकर, कर्मचारी उमेश कोरगावकर तसेच बांदा पोलीस विजय जाधव व होमगार्ड विश्वजित भोगटे, पोलीस पाटील निर्जरा परब यांनीही घटनास्थळी भेट दिली. कृषी व महसूल विभागाचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा प्राप्त झालेला नाही. महावितरण विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अभियंता अनिल यादव यांनी नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी