शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

खरंच कोकणी जनतेनं पुन्हा राणेंना नाकारलं ?

By वैभव देसाई | Published: May 28, 2019 6:53 AM

23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला.

- वैभव देसाई23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपानं 200 किंवा 250 नव्हे, तर तब्बल 303 जागा जिंकल्या. त्यामुळे साहजिकच विरोधकांचा पुरता भ्रमनिराश झाला. विशेष म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालही धक्कादायक म्हणावा लागेल. कारण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल कोकणी जनतेत फारसा जनाधार असल्याचं निवडणुकीदरम्यान दिसलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या मनातही कुठे तरी पराभवाची पाल चुकचुकत होती. या लढतीत मोदी प्रभावामुळे भाजपाची मते धनुष्यबाणाला मिळाली आणि विनायक राऊत यांचा विजय सुकर झाला. शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 4,58,022 एवढी मतं मिळाली असून, निलेश राणेंच्या पारड्यात 2,79,700 मते पडली. विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर यंदा 1 लाख 78 हजार 322 मतांनी विजय मिळवला. निलेश राणे यांच्या पराभवामुळे ईव्हीएमबद्दलही संशयाचं भूत निर्माण झालंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक निकालात EVM मशिनमध्ये trending set केल्याचा आरोपही स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला. सुरुवातीपासूनच प्रत्येक फेरीत रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत आणि राणे या दोन्ही उमेदवारांना ठराविक अंदाजात मते कशी काय मिळू शकतात?, असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.

नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबद्दल संशयाचं वातावरण समाजाच्या अनेक स्तरांमध्ये असल्याचा उल्लेखही केला. त्यामुळे साहजिकच या विजयाबद्दल एकूणच कोकणी जनता साशंक आहे. असो. पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालामुळे कोकणातली राजकीय समीकरणं आता बदलणार आहेत. आताच्या निवडणुकीत सेना-भाजपा युती विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणजेच नारायण राणे अशी लढत दिसली. पण या लढतीत एका अर्थी राणेंचा कोकणी जनतेनं पराभव केल्याचंही मान्य करावं लागेल. कणकवली या विधानसभा मतदारसंघात वैभववाडी आणि देवगड या तालुक्यांचा समावेश आहे. कणकवली हा पूर्वीपासून राणेंचा अभेद्य असा बालेकिल्ला समजला जातो. युतीकडून नेहमीच या जागेवर भाजपाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतो, कारण या मतदारसंघात शिवसेनेची म्हणावी तशी ताकद नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघातून यंदा स्वाभिमानला 40 हजारांचं मताधिक्य पडण्याचा अंदाज असताना निलेश राणेंना विनायक राऊतांपेक्षा फक्त 10 हजार 731 एवढंच मताधिक्य मिळालं. तर विनायक राऊत यांना चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघांतून चांगलं मताधिक्य मिळालं. चिपळूणमध्ये राऊतांना 87,630 मते मिळाली तर निलेश राणेंना 30, 397 मतं मिळाली. त्यामुळे राऊतांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राणेंवर 57,233 मतांची आघाडी घेतली. तर रत्नागिरीत राऊतांना 1 लाखांचं मताधिक्य मिळालं, तर दुसरीकडे निलेश राणेंना 41 हजार एवढ्या मतांवरच समाधान मानावं लागलं.
कुडाळमधून निलेश राणेंना जास्त मते मिळाली नसली तरी सेनेच्या राऊतांना फक्त 63 हजार 909 मतांवर समाधान मानावं लागलं. या मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक आमदार असूनही शिवसेनेचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटलं. पण स्वाभिमान पक्षालाही अपेक्षित मते मिळालेली नाहीत. स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा हा गड समजला जातो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातही गेल्या वेळेपेक्षा यंदा शिवसेनेचं मताधिक्य कमी झालेलं आहे. यंदा शिवसेनेला या मतदारसंघातून 74 हजार 233 एवढी मतं मिळाली. तर स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना याच मतदारसंघातून 44 हजार 845 इतकी मतं मिळाल्यानं केसरकरांचा सावंतवाडीच्या जनतेवर असलेला प्रभाव हळूहळू कमी होत असल्याचंही चित्र समोर आलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Narayan Raneनारायण राणे