शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

Lok Sabha Election 2019    विरोधकांच्या गैरप्रचाराला  बळी पडू नका ! विनायक राऊत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 4:42 PM

कणकवली :विरोधकांना लोकसभा निवडणुकीत आपला शंभर टक्के पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजप महायुती बाबत ते मतदारांमध्ये ...

कणकवली :विरोधकांना लोकसभा निवडणुकीत आपला शंभर टक्के पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजप महायुती बाबत ते मतदारांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या रक्तात बेईमानी भरलेली नाही. ते निष्ठावान कार्यकर्ते असून  विरोधकांच्या गैर प्रचाराला ते कधीही बळी पडणार नाहीत. असा ठाम विश्वास  रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला .

        कणकवली येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, राजश्री धुमाळे, जान्हवी सावंत, नीलम सावंत - पालव, शैलेश भोगले, सुशांत नाईक, संजय पडते, रमेश पावसकर, संदेश सावंत -पटेल, सुजित जाधव, गीतेश कडू ,  हर्षद गावडे, राजू राठोड, आंबडपाल सरपंच प्रणिता नाईक , धनंजय सावंत तसेच सेना - भाजपाचे नगरसेवक आदी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

        यावेळी विनायक राऊत म्हणाले, शिवसेना, भाजप व इतर पक्षांची महायुती व्हावी ही भारत मातेची इच्छा होती. त्यामुळे महायुती झाली आहे. सिंधुदुर्गचाच नव्हे तर देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर महायुतीची सत्ता पुन्हा येणे आवश्यक आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यानी एकदिलाने काम करावे आणि आपली  संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करावे. विरोधकांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने या लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत या नावाचा डमी उमेदवार उभा करण्याचे षढयंत्र रचले जात आहे. मात्र, जनता खऱ्या विनायक राऊतला चांगलीच ओळखत असल्याने काहीच फरक पडणार नाही असा टोलाही विनायक राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला .

         प्रमोद जठार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्यानाही आता उमका फुटू लागली आहे. हे महायुतीसाठी शुभ संकेत आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवाना बळी पडू नये. शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष व्हावा, त्यांच्यात मारामाऱ्या व्हाव्यात यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या डावपेचाना बळी पडू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आता राहिली नसून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी सर्वानी एकदिलाने काम करावे. शिवसेना- भाजप व इतर मित्र पक्षानी या निवडणुकीत आपल्या एकजुटीची ताकद दाखवून द्यावी .असे आवाहनही प्रमोद जठार यांनी यावेळी केले.

        भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांनीही कार्यकर्त्याना संबोधित करताना महायुतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले.  आमदार वैभव नाईक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटना नंतर कणकवली शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

जोरदार घोषणा बाजी !

कोण आला रे कोण आला...शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना -भाजपा युतीचा..विजय असो, मोदी साहेब आगे बढो...शिवसेना तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

-फोटो ओळ-- कणकवली येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार विनायक राऊत यांनी कार्यकर्त्याना संबोधित केले. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूकsinghbhum-pcसिंघम