शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सिंधुदुर्ग किल्ल्यावरून होणार मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ : सुहास सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:56 IST

मराठा समाजाने महाराष्ट्र सरकारकडे केलेल्या मागण्यांची वस्तुस्थितीदर्शक माहिती सकल मराठा समाजाला होण्यासाठी १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण महसुली विभागातून मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथून १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते आणि जिल्हा समन्वयक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग किल्ल्यावरून होणार मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ : सुहास सावंत यांची माहितीमराठा समाजात फूट पडू नये यासाठी महाराष्ट्रभर नियोजन

मालवण : मराठा समाजाने महाराष्ट्र सरकारकडे केलेल्या मागण्यांची वस्तुस्थितीदर्शक माहिती सकल मराठा समाजाला होण्यासाठी १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण महसुली विभागातून मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथून १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते आणि जिल्हा समन्वयक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी दिली.मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा सकल क्रांती मोर्चाच्या आयोजकांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अशोक सावंत, विक्रांत सावंत, बाबा परब, सुहास सावंत, सुधीर धुरी, नीलिमा सावंत, कांचन गावडे, श्वेता सावंत, विनायक परब, सुधीर साळसकर, नाना साईल, सुभाष लाड आदी मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.सुहास सावंत म्हणाले, मुंबई येथे ३१ आॅक्टोबर रोजी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रभर मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारने मराठा समाजाच्या किती मागण्या सरकारने पूर्ण केल्या? किती मागण्या प्रलंबित आहेत? तसेच सरकारने मागण्या पूर्ण करण्यासाठी काय कार्यवाही केली? याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक माहिती समाजाला व्हावी तसेच राज्य मागास आयोगाचा मराठा आरक्षणाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने लावण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण येथून १९ रोजी या यात्रेचा शुभारंभ होईल. त्यानंतर २६ रोजी मुंबईतील विधानभवनावर महाराष्ट्रातील सर्व संवाद यात्रा एकत्रित येणार असून अधिवेशन काळात सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.दोन वर्षांपूर्वी कोपर्डी हत्याकांडानंतर मराठा समाज एकवटला. कोपडीर्तील मारेक?्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच मराठा आरक्षण कायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्रात सुमारे ५८ मोर्चे, रास्तारोको तसेच जिल्हा बंद अशी अनेक आंदोलने शांततेत झाली.

मात्र आंदोलनातून मराठा समाजाची दिसून आलेल्या एकीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे जून-जुलै महिन्यात 'ठोकमोर्चा' निघाले. त्यात १९ हजार मराठा समाजातील युवकांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे राजकीय शक्तींकडून मराठा समाजात फूट पडली जाऊ नये, यासाठी मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.सावंतवाडी, कणकवलीत जनसभासिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ १९ नोव्हेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथून होणार आहे. शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन संवाद यात्रेला सुरुवात होईल. यात चारचाकी, दुचाकी तसेच एक सजवलेले वाहन असणार आहे.

संवाद यात्रा मालवण-कुंभारमाठमार्गे वेंगुर्ले, वेंगुर्ले-तुळस-तळवडे-मळगावमार्गे सावंतवाडी-कुडाळ-ओरोस-कसालमार्गे कणकवली अशी निघणार आहे. यात सावंतवाडी व कणकवली येथे जनसभा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दुस?्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.

ही संवाद यात्रा सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई ते मुंबई विधानभवन असा संवाद यात्रेचा मार्ग असून सरकारवर दबाव आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन एड. सुहास सावंत व अशोक सावंत यांनी केले.

टॅग्स :Sindhudurg portसिंधुदुर्ग किल्लाsindhudurgसिंधुदुर्गmarathaमराठा