शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

सिंधुदुर्ग किल्ल्यावरून होणार मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ : सुहास सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:56 IST

मराठा समाजाने महाराष्ट्र सरकारकडे केलेल्या मागण्यांची वस्तुस्थितीदर्शक माहिती सकल मराठा समाजाला होण्यासाठी १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण महसुली विभागातून मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथून १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते आणि जिल्हा समन्वयक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग किल्ल्यावरून होणार मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ : सुहास सावंत यांची माहितीमराठा समाजात फूट पडू नये यासाठी महाराष्ट्रभर नियोजन

मालवण : मराठा समाजाने महाराष्ट्र सरकारकडे केलेल्या मागण्यांची वस्तुस्थितीदर्शक माहिती सकल मराठा समाजाला होण्यासाठी १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण महसुली विभागातून मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथून १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते आणि जिल्हा समन्वयक अ‍ॅड. सुहास सावंत यांनी दिली.मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा सकल क्रांती मोर्चाच्या आयोजकांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अशोक सावंत, विक्रांत सावंत, बाबा परब, सुहास सावंत, सुधीर धुरी, नीलिमा सावंत, कांचन गावडे, श्वेता सावंत, विनायक परब, सुधीर साळसकर, नाना साईल, सुभाष लाड आदी मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.सुहास सावंत म्हणाले, मुंबई येथे ३१ आॅक्टोबर रोजी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रभर मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारने मराठा समाजाच्या किती मागण्या सरकारने पूर्ण केल्या? किती मागण्या प्रलंबित आहेत? तसेच सरकारने मागण्या पूर्ण करण्यासाठी काय कार्यवाही केली? याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक माहिती समाजाला व्हावी तसेच राज्य मागास आयोगाचा मराठा आरक्षणाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने लावण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण येथून १९ रोजी या यात्रेचा शुभारंभ होईल. त्यानंतर २६ रोजी मुंबईतील विधानभवनावर महाराष्ट्रातील सर्व संवाद यात्रा एकत्रित येणार असून अधिवेशन काळात सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.दोन वर्षांपूर्वी कोपर्डी हत्याकांडानंतर मराठा समाज एकवटला. कोपडीर्तील मारेक?्यांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच मराठा आरक्षण कायदा व्हावा, यासाठी महाराष्ट्रात सुमारे ५८ मोर्चे, रास्तारोको तसेच जिल्हा बंद अशी अनेक आंदोलने शांततेत झाली.

मात्र आंदोलनातून मराठा समाजाची दिसून आलेल्या एकीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे जून-जुलै महिन्यात 'ठोकमोर्चा' निघाले. त्यात १९ हजार मराठा समाजातील युवकांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे राजकीय शक्तींकडून मराठा समाजात फूट पडली जाऊ नये, यासाठी मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.सावंतवाडी, कणकवलीत जनसभासिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ १९ नोव्हेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग येथून होणार आहे. शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन संवाद यात्रेला सुरुवात होईल. यात चारचाकी, दुचाकी तसेच एक सजवलेले वाहन असणार आहे.

संवाद यात्रा मालवण-कुंभारमाठमार्गे वेंगुर्ले, वेंगुर्ले-तुळस-तळवडे-मळगावमार्गे सावंतवाडी-कुडाळ-ओरोस-कसालमार्गे कणकवली अशी निघणार आहे. यात सावंतवाडी व कणकवली येथे जनसभा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दुस?्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.

ही संवाद यात्रा सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई ते मुंबई विधानभवन असा संवाद यात्रेचा मार्ग असून सरकारवर दबाव आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन एड. सुहास सावंत व अशोक सावंत यांनी केले.

टॅग्स :Sindhudurg portसिंधुदुर्ग किल्लाsindhudurgसिंधुदुर्गmarathaमराठा