शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

चिंदर येथे काजू ,आंबा कलमबागा जळून लाखोंची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:10 IST

चिंदर तेरई माळरानावर सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सहा एकर क्षेत्रावरील काजू, आंबाकलम बागांसह बागेत गवत कापणीसाठी आणलेली दोन गवत कापणी यंत्रे जळून गेली. रविवार व सोमवारी सतत दोन दिवस लागलेल्या या भागातील आगीमुळे मोहरलेल्या आंबा, काजू कलमबागा बेचिराख होऊन लाखोंचे नुकसान झाले.

आचरा : चिंदर तेरई माळरानावर सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सहा एकर क्षेत्रावरील काजू, आंबाकलम बागांसह बागेत गवत कापणीसाठी आणलेली दोन गवत कापणी यंत्रे जळून गेली. रविवार व सोमवारी सतत दोन दिवस लागलेल्या या भागातील आगीमुळे मोहरलेल्या आंबा, काजू कलमबागा बेचिराख होऊन लाखोंचे नुकसान झाले.याची माहिती मिळताच कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. आग आटोक्यात आणण्यासाठी लब्देवाडी, तेरई ग्रामस्थ उशिरापर्यंत प्रयत्न करत होते.चिंदर तेरई माळरानावरील शशिकांत गोलतकर यांची ३०० कलम असलेली बाग आग लागून त्यांची मोहरलेली आंबा कलमे जळून नुकसान झाले होते ही आग रविवारी लागली होती.ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करत आग विझविली होती. संभाव्य आगीचा धोका लक्षात घेऊन या भागातील दुसरे काजू बागायतदार विलास घागरे आदींनी आपल्या बागेतील गवत साफसफाई सुरू केली होती.यासाठी होंडा कंपनीचे दोन गवत कापणी यंत्रे आणून सोमवार सकाळपासून कामाला सुरुवात केली होती.दुपारी विलास घागरे कामगारांसह जेवायला गेले असतानाच बागेच्या बाहेरच्या बाजूने अकस्मात आग लागली त्यात त्यांची ४०० काजूकलमे जळाली व गवत कापणी २ यंत्रे ही जळून गेली.वाऱ्यामुळे फैलावलेली आग लगतच्या चिंदर सरपंच भाग्यश्री घागरे यांच्या बागेत घुसल्याने त्यांच्या ही तीन एकर क्षेत्रावरील ४०० मोहरलेली काजू कलमे जळून त्यांचेही मोठं नुकसान झालं. त्याच माळावरील तुकाराम पाटणकर यांची २०० आंबा कलमे, प्रभाकर चिंदरकर यांची २०० आंबकलमे जाळून गेली. आगीची माहिती मिळताच तेरई,लब्देवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे यांनी मालवण येथून नगरपालिकेचा अग्निशामक बंबही बोलविला होता पण माळरानावर घनदाट झाडी मुळे बंबाने आग विझविणे शक्य होणार नसल्याने ग्रामस्थांनीच आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत होते.या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे सुनिल कदम, ग्रामविकास अधिकारी पि.जी.कदम, ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे, पोलीस पाटील दिनेश पाताडे, आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच भाग्यश्री घागरे, धनंजय नाटेकर,गणपत घागरे,उत्तम घागरे, निलकंठ चिंदरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग