शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

चिंदर येथे काजू ,आंबा कलमबागा जळून लाखोंची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:10 IST

चिंदर तेरई माळरानावर सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सहा एकर क्षेत्रावरील काजू, आंबाकलम बागांसह बागेत गवत कापणीसाठी आणलेली दोन गवत कापणी यंत्रे जळून गेली. रविवार व सोमवारी सतत दोन दिवस लागलेल्या या भागातील आगीमुळे मोहरलेल्या आंबा, काजू कलमबागा बेचिराख होऊन लाखोंचे नुकसान झाले.

आचरा : चिंदर तेरई माळरानावर सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सहा एकर क्षेत्रावरील काजू, आंबाकलम बागांसह बागेत गवत कापणीसाठी आणलेली दोन गवत कापणी यंत्रे जळून गेली. रविवार व सोमवारी सतत दोन दिवस लागलेल्या या भागातील आगीमुळे मोहरलेल्या आंबा, काजू कलमबागा बेचिराख होऊन लाखोंचे नुकसान झाले.याची माहिती मिळताच कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. आग आटोक्यात आणण्यासाठी लब्देवाडी, तेरई ग्रामस्थ उशिरापर्यंत प्रयत्न करत होते.चिंदर तेरई माळरानावरील शशिकांत गोलतकर यांची ३०० कलम असलेली बाग आग लागून त्यांची मोहरलेली आंबा कलमे जळून नुकसान झाले होते ही आग रविवारी लागली होती.ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करत आग विझविली होती. संभाव्य आगीचा धोका लक्षात घेऊन या भागातील दुसरे काजू बागायतदार विलास घागरे आदींनी आपल्या बागेतील गवत साफसफाई सुरू केली होती.यासाठी होंडा कंपनीचे दोन गवत कापणी यंत्रे आणून सोमवार सकाळपासून कामाला सुरुवात केली होती.दुपारी विलास घागरे कामगारांसह जेवायला गेले असतानाच बागेच्या बाहेरच्या बाजूने अकस्मात आग लागली त्यात त्यांची ४०० काजूकलमे जळाली व गवत कापणी २ यंत्रे ही जळून गेली.वाऱ्यामुळे फैलावलेली आग लगतच्या चिंदर सरपंच भाग्यश्री घागरे यांच्या बागेत घुसल्याने त्यांच्या ही तीन एकर क्षेत्रावरील ४०० मोहरलेली काजू कलमे जळून त्यांचेही मोठं नुकसान झालं. त्याच माळावरील तुकाराम पाटणकर यांची २०० आंबा कलमे, प्रभाकर चिंदरकर यांची २०० आंबकलमे जाळून गेली. आगीची माहिती मिळताच तेरई,लब्देवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे यांनी मालवण येथून नगरपालिकेचा अग्निशामक बंबही बोलविला होता पण माळरानावर घनदाट झाडी मुळे बंबाने आग विझविणे शक्य होणार नसल्याने ग्रामस्थांनीच आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत होते.या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे सुनिल कदम, ग्रामविकास अधिकारी पि.जी.कदम, ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे, पोलीस पाटील दिनेश पाताडे, आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच भाग्यश्री घागरे, धनंजय नाटेकर,गणपत घागरे,उत्तम घागरे, निलकंठ चिंदरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग