शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

चिंदर येथे काजू ,आंबा कलमबागा जळून लाखोंची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:10 IST

चिंदर तेरई माळरानावर सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सहा एकर क्षेत्रावरील काजू, आंबाकलम बागांसह बागेत गवत कापणीसाठी आणलेली दोन गवत कापणी यंत्रे जळून गेली. रविवार व सोमवारी सतत दोन दिवस लागलेल्या या भागातील आगीमुळे मोहरलेल्या आंबा, काजू कलमबागा बेचिराख होऊन लाखोंचे नुकसान झाले.

आचरा : चिंदर तेरई माळरानावर सोमवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे सहा एकर क्षेत्रावरील काजू, आंबाकलम बागांसह बागेत गवत कापणीसाठी आणलेली दोन गवत कापणी यंत्रे जळून गेली. रविवार व सोमवारी सतत दोन दिवस लागलेल्या या भागातील आगीमुळे मोहरलेल्या आंबा, काजू कलमबागा बेचिराख होऊन लाखोंचे नुकसान झाले.याची माहिती मिळताच कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. आग आटोक्यात आणण्यासाठी लब्देवाडी, तेरई ग्रामस्थ उशिरापर्यंत प्रयत्न करत होते.चिंदर तेरई माळरानावरील शशिकांत गोलतकर यांची ३०० कलम असलेली बाग आग लागून त्यांची मोहरलेली आंबा कलमे जळून नुकसान झाले होते ही आग रविवारी लागली होती.ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न करत आग विझविली होती. संभाव्य आगीचा धोका लक्षात घेऊन या भागातील दुसरे काजू बागायतदार विलास घागरे आदींनी आपल्या बागेतील गवत साफसफाई सुरू केली होती.यासाठी होंडा कंपनीचे दोन गवत कापणी यंत्रे आणून सोमवार सकाळपासून कामाला सुरुवात केली होती.दुपारी विलास घागरे कामगारांसह जेवायला गेले असतानाच बागेच्या बाहेरच्या बाजूने अकस्मात आग लागली त्यात त्यांची ४०० काजूकलमे जळाली व गवत कापणी २ यंत्रे ही जळून गेली.वाऱ्यामुळे फैलावलेली आग लगतच्या चिंदर सरपंच भाग्यश्री घागरे यांच्या बागेत घुसल्याने त्यांच्या ही तीन एकर क्षेत्रावरील ४०० मोहरलेली काजू कलमे जळून त्यांचेही मोठं नुकसान झालं. त्याच माळावरील तुकाराम पाटणकर यांची २०० आंबा कलमे, प्रभाकर चिंदरकर यांची २०० आंबकलमे जाळून गेली. आगीची माहिती मिळताच तेरई,लब्देवाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे यांनी मालवण येथून नगरपालिकेचा अग्निशामक बंबही बोलविला होता पण माळरानावर घनदाट झाडी मुळे बंबाने आग विझविणे शक्य होणार नसल्याने ग्रामस्थांनीच आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत होते.या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे सुनिल कदम, ग्रामविकास अधिकारी पि.जी.कदम, ग्रामपंचायत सदस्य समिर लब्दे, पोलीस पाटील दिनेश पाताडे, आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच भाग्यश्री घागरे, धनंजय नाटेकर,गणपत घागरे,उत्तम घागरे, निलकंठ चिंदरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग