शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

तब्बल १३ महिन्यांनंतर करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू, वाहनचालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:46 IST

घाटमार्ग वाहतुकीस बंद केल्यामुळे या मार्गावरील पर्यटकांची संख्या पूर्ण रोडावली होती

वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट तब्बल १३ महिन्यांनंतर सोमवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीस खुला झाला. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. घाटमार्गाच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरण व संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी गेल्या वर्षी २२ जानेवारीला हा घाट वाहतुकीस बंद करण्यात आला होता.कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १६ किलोमीटर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी १७१ कोटींची मंजुरी मिळाली होती, हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नाधवडे ते गगनबावडा या २१ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे कॉंक्रिटीकरणासाठी २४९ कोटी रुपये जानेवारी २०२३ मध्ये मंजुरी मिळाली. या कामांमध्ये करूळ घाट मार्गाच्या ९.६ किलोमीटर रस्त्याचा समावेश होता.करूळ घाटातून वाहतूक सुरू ठेवून या रस्त्यांची रुंदी वाढविणे, मोऱ्या व संरक्षण भिंतींची पुनर्बांधणी, गटारांचे बांधकामे धोक्याचे असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी हा घाटमार्ग वाहतुकीस बंद केला होता. सुरुवातीला तीन महिन्यांसाठी घाटमार्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर मुदत वाढविण्यात आली. जूनमध्ये घाटातील साडेसहा किलोमीटर एका मार्गिकेचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले होते. परंतु, दरडी कोसळण्याच्या शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक सुरू करण्यात परवानगी देण्यात आली नव्हती.त्यानंतर पुन्हा घाटरस्त्यांचे उर्वरित कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात दिलेल्या अनेक तारखा उलटून गेल्यानंतर तब्बल १३ महिन्यांनी करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.हा घाटमार्ग वाहतुकीस बंद केल्यामुळे या मार्गावरील पर्यटकांची संख्या पूर्ण रोडावली होती. त्याचा सर्वात जास्त फटका पेट्रोलपंप, हॉटेल व्यावसायिकांना बसला. त्यामुळे या महामार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

सुक आणि शांतीवरील पुलांच्या कामांना वेगकरूळ घाटातील रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, तळेरे ते नाधवडे आणि एडगाव ते करूळ येथील काम युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोकीसरे बांधवाडी ते वैभववाडी शहर व एडगाव दरम्यानचे सुरू झालेले नसले तरी वैभववाडी शहराला जोडणाऱ्या सुक आणि शांतीवरील पुलांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरात तळेरे ते कोल्हापूर हा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर