शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

तब्बल १३ महिन्यांनंतर करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू, वाहनचालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:46 IST

घाटमार्ग वाहतुकीस बंद केल्यामुळे या मार्गावरील पर्यटकांची संख्या पूर्ण रोडावली होती

वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाट तब्बल १३ महिन्यांनंतर सोमवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीस खुला झाला. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. घाटमार्गाच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरण व संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी गेल्या वर्षी २२ जानेवारीला हा घाट वाहतुकीस बंद करण्यात आला होता.कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १६ किलोमीटर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी १७१ कोटींची मंजुरी मिळाली होती, हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नाधवडे ते गगनबावडा या २१ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे कॉंक्रिटीकरणासाठी २४९ कोटी रुपये जानेवारी २०२३ मध्ये मंजुरी मिळाली. या कामांमध्ये करूळ घाट मार्गाच्या ९.६ किलोमीटर रस्त्याचा समावेश होता.करूळ घाटातून वाहतूक सुरू ठेवून या रस्त्यांची रुंदी वाढविणे, मोऱ्या व संरक्षण भिंतींची पुनर्बांधणी, गटारांचे बांधकामे धोक्याचे असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी हा घाटमार्ग वाहतुकीस बंद केला होता. सुरुवातीला तीन महिन्यांसाठी घाटमार्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर मुदत वाढविण्यात आली. जूनमध्ये घाटातील साडेसहा किलोमीटर एका मार्गिकेचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले होते. परंतु, दरडी कोसळण्याच्या शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक सुरू करण्यात परवानगी देण्यात आली नव्हती.त्यानंतर पुन्हा घाटरस्त्यांचे उर्वरित कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात दिलेल्या अनेक तारखा उलटून गेल्यानंतर तब्बल १३ महिन्यांनी करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.हा घाटमार्ग वाहतुकीस बंद केल्यामुळे या मार्गावरील पर्यटकांची संख्या पूर्ण रोडावली होती. त्याचा सर्वात जास्त फटका पेट्रोलपंप, हॉटेल व्यावसायिकांना बसला. त्यामुळे या महामार्गावरून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

सुक आणि शांतीवरील पुलांच्या कामांना वेगकरूळ घाटातील रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, तळेरे ते नाधवडे आणि एडगाव ते करूळ येथील काम युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोकीसरे बांधवाडी ते वैभववाडी शहर व एडगाव दरम्यानचे सुरू झालेले नसले तरी वैभववाडी शहराला जोडणाऱ्या सुक आणि शांतीवरील पुलांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरात तळेरे ते कोल्हापूर हा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर