शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

कणकवलीतील महामार्गाचे काम बंद पडणार, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 17:28 IST

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत अनेक कामे आश्वासन देऊनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत . ही कामे येत्या दोन दिवसात पुर्ण न केल्यास गुरुवारपासून शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवकांचा इशाराकामे अपूर्ण असल्याने घेतला पवित्रा

कणकवली : कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत अनेक कामे आश्वासन देऊनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत . ही कामे येत्या दोन दिवसात पुर्ण न केल्यास गुरुवारपासून शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे.कणकवली शहरातील पावसाळी कामाच्या नियोजनाची बैठक कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड , बांधकाम सभापती संजय कामतेकर , आरोग्य सभापती प्रतिक्षा सावंत, महिला व बालकल्याण सभापती उर्मी जाधव, नगरसेवक अबीद नाईक, ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे , महेंद्र सांब्रेकर , बंडू हर्णे, सुमेधा अंधारी , मेघा सावंत, मानसी मुंज तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कणकवली शहरात महामार्ग ठेकेदाराने केलेल्या अपूर्ण कामांमुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. याबाबत ठेकेदाराला आणि महामार्ग प्राधिकरणाला कळवून देखील कामे पूर्ण झालेली नाहीत. महामार्गाच्या दुतर्फा असलेली गटारे अपूर्ण आहेत. तसेच पथदीपही बसवण्यात आलेले नाहीत.

चौपदरीकरणात येणाऱ्या नाले तसेच पाइपलाईनची सफाईही अद्याप करण्यात आलेली नाही. त्यापेक्षा मोठा कहर म्हणजे ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी तर दुरध्वनी उचलणे बंद केले आहे.पावसाळ्यात योग्य प्रकारे पाणी निचरा न झाल्यास अनेक घरे , दुकाने यांच्यामध्ये चिखलयुक्त पाणी जाण्याचा धोका आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने येत्या दोन दिवसात शहरातील कामे पूर्ण करावीत.

अन्यथा गुरुवारपासून शहरात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम बंद पाडू असा इशारा नगराध्यक्ष आणि उपस्थित सत्ताधारी नगरसेवकांनी यावेळी दिला. तसेच त्याबाबतचे पत्र महामार्ग प्राधिकरण , प्रांताधिकारी, कणकवली पोलीस ठाणे याना देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.शहरातील नाले व गटार सफाई तसेच नवीन गटार मारणे आदी कामांचा यावेळी ठेकेदाराकडून आढावा घेण्यात आला. तसेच नगरसेवकांनी काही नवीन कामेही यावेळी सुचविली. नगरसेवक अबीद नाईक, संजय कामतेकर, बंडू हर्णे यांनी आपल्या प्रभागातील कामे यावेळी ठेकेदाराला सांगितली .नगरपंचायत रोड, पटकीदेवी ते हॉर्नबिल हॉटेल, तेलीआळी डीपी रोड ते पंचायत समिती येथील गटारे, विद्यानगर मधील कॉलेजमागील मोठा नाला, कॉलेज रोडची गटारे, शिवाजीनगर ते परबवाडी दरम्यानचा मोठा नाला साफ केल्याची माहिती यावेळी ठेकेदार मिथुन ठाणेकर यांनी दिली. तर ढालकाठी दरम्यानची चार चेंबर तत्काळ साफ करण्यात यावीत अशी मागणी नगरसेवक अबीद नाईक यांनी केली.शिवाजीनगर परिसरात ११ केव्हीचा वीज पुरवठा गटारातून विजवीतरणकडून निवासी इमारतींना अंडरग्राउंड करण्यात आला आहे. त्यामुळे गटार सफाई करताना अडचण निर्माण होत असून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले.यावेळी विजवीतरण कंपनीशी याबाबत तत्काळ पत्रव्यवहार करण्यात यावा. तसेच वीज वाहिनी मुळे काही दुर्घटना घडल्यास त्याला वीज विरणच जबाबदार राहील असेही त्यांना कळविण्यात यावे.असे आदेश नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगरपंचायत प्रशासनास दिले.पांगम बिल्डरने जळकेवाडीत नैसर्गिक ओहोळ अरुंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. त्याबाबत संबधित बिल्डरला नोटीस देण्यात यावी असेही नलावडे यांनी यावेळी सांगितले.नरडवे रोड ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या पदपथावर खड्डे पडले असून तिथे दुर्घटना घडू शकते.असे मानसी मुंज यांनी सांगितले. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करा.असे नलावडे यांनी प्रशासनास सांगितले.टेंबवाडीतील सार्वजनिक विहिरीचा गाळ काढण्याची सूचना नगरसेविका मेघा सावंत तसेच नगरसेवक अभिजित मुसळे यांनी केली. त्याला नगराध्यक्षानी सहमती दर्शविली. तसेच शहरातील सर्व नाले व गटारे लवकरात लवकर स्वच्छ करा असे आदेश नगराध्यक्ष नलावडे यांनी यावेळी ठेकेदाराला दिले.शहरातील नाले, गटारांची साफसफाई !पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक नाले व गटारे साफ करण्यात आले आहेत. अजूनही काम सुरू असून पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे लक्षात घेऊन नागरिक तसेच नगरसेवकांनी अजूनही काही ठिकाणची नाले सफाई करायची असल्यास ती ठिकाणे सुचवावीत असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.आपत्कालीन समिती नेमणार !पावसाळ्यात शहरात पाणी साचून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास तत्काळ कार्यवाही करण्यासाठी नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचारी यांची आपत्कालीन समिती नेमण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही समिती जेसीबी तसेच इतर सामुग्रीच्या सहाय्याने काम करेल असेही यावेळी ठरविण्यात आले. पावसाळ्यात नगरपंचायतची आपत्कालीन व्यवस्था असावी अशी सूचना नगरसेवक अभि मुसळे यांनी या बैठकीत केली होती. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग