शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जलजीवन मिशन : सावंतवाडीत ६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 16:05 IST

Sawantwadi Zp Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या जलजीवन मिशन या योजनेंतर्गत घराघरात पाणी पोहोचविण्याचा मानस असूनही याबाबत सावंतवाडी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात अनास्था असल्याचे आढावा बैठकीत दिसून आले. याविषयी खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देजलजीवन मिशन : सावंतवाडीत ६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ प्रस्ताव सरपंच, ग्रामसेवक आढावा बैठकीत संजना सावंत नाराज

सावंतवाडी : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या जलजीवन मिशन या योजनेंतर्गत घराघरात पाणी पोहोचविण्याचा मानस असूनही याबाबत सावंतवाडी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात अनास्था असल्याचे आढावा बैठकीत दिसून आले. याविषयी खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, ते सुद्धा परिपूर्ण नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर प्रस्ताव द्या अन्यथा आपल्या गावात योजना नको असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांच्या सहीनिशी द्या, असे अध्यक्ष सावंत यांनी यावेळी सांगितले. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामसेवक यांची ऑनलाईन बैठक झाली.यावेळी झालेल्या चर्चेत हा प्रकार उघड झाला. अडीच महिन्यांपूर्वी याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ग्रामसेवक व सरपंचांना देऊनही ६३ पैकी केवळ १८ प्रस्ताव प्राप्त झाल्याने या योजनेबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यात अनास्था असल्याचे दिसून येत आहे.

या योजनेच्या माध्यमातून घराघरात पाणी पोहोचविण्याचा प्रशासनाचा मानस असून, त्याला अपेक्षित सहकार्य संबंधितांकडून मिळत नाही. त्यामुळे या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी विशेषत: सरपंचांनी गाव प्रतिनिधी म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन संजना सावंत यांनी केले.केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजना ही पाणीटंचाई निवारण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या योजनेबाबतची माहिती प्रत्येक गावागावातील सरपंचांना होणे आवश्यक आहे. ती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे....अन्यथा योजना नको असल्याचे पत्र द्याया बैठकीत झालेल्या चर्चेत काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना या योजनेची माहिती नसल्याचे उघड झाले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांची पुन्हा बैठक घेऊन याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर प्रस्ताव देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यवाही करावी अन्यथा आपल्याला योजना नको असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांच्या सहीनिशी सादर करावे, असे अध्यक्षा सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग