शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

जलजीवन मिशन : सावंतवाडीत ६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 16:05 IST

Sawantwadi Zp Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या जलजीवन मिशन या योजनेंतर्गत घराघरात पाणी पोहोचविण्याचा मानस असूनही याबाबत सावंतवाडी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात अनास्था असल्याचे आढावा बैठकीत दिसून आले. याविषयी खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देजलजीवन मिशन : सावंतवाडीत ६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ प्रस्ताव सरपंच, ग्रामसेवक आढावा बैठकीत संजना सावंत नाराज

सावंतवाडी : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या जलजीवन मिशन या योजनेंतर्गत घराघरात पाणी पोहोचविण्याचा मानस असूनही याबाबत सावंतवाडी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यात अनास्था असल्याचे आढावा बैठकीत दिसून आले. याविषयी खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, ते सुद्धा परिपूर्ण नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर प्रस्ताव द्या अन्यथा आपल्या गावात योजना नको असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांच्या सहीनिशी द्या, असे अध्यक्ष सावंत यांनी यावेळी सांगितले. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामसेवक यांची ऑनलाईन बैठक झाली.यावेळी झालेल्या चर्चेत हा प्रकार उघड झाला. अडीच महिन्यांपूर्वी याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ग्रामसेवक व सरपंचांना देऊनही ६३ पैकी केवळ १८ प्रस्ताव प्राप्त झाल्याने या योजनेबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यात अनास्था असल्याचे दिसून येत आहे.

या योजनेच्या माध्यमातून घराघरात पाणी पोहोचविण्याचा प्रशासनाचा मानस असून, त्याला अपेक्षित सहकार्य संबंधितांकडून मिळत नाही. त्यामुळे या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी विशेषत: सरपंचांनी गाव प्रतिनिधी म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन संजना सावंत यांनी केले.केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजना ही पाणीटंचाई निवारण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या योजनेबाबतची माहिती प्रत्येक गावागावातील सरपंचांना होणे आवश्यक आहे. ती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे....अन्यथा योजना नको असल्याचे पत्र द्याया बैठकीत झालेल्या चर्चेत काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना या योजनेची माहिती नसल्याचे उघड झाले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांची पुन्हा बैठक घेऊन याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर लवकरात लवकर प्रस्ताव देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यवाही करावी अन्यथा आपल्याला योजना नको असल्याचे लेखी पत्र ग्रामस्थांच्या सहीनिशी सादर करावे, असे अध्यक्षा सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग