शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय निश्चिती करून प्रयत्न करणे महत्वाचे !: प्रांताधिकारी वैशाली राजमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:31 IST

Tahasildar, Woman, Kankavli, Sindhudurnews महिलांनी स्वतःवरचा विश्वास कधीही डळमळू देऊ नये. कोणताही प्रसंग समोर आला तरी त्याला धैर्याने तोंड देवून जिद्दीने आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत रहावे. जगात अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी येथे केले.

ठळक मुद्देध्येय निश्चिती करून प्रयत्न करणे महत्वाचे !प्रांताधिकारी वैशाली राजमाने

कणकवली : महिलांनी स्वतःवरचा विश्वास कधीही डळमळू देऊ नये. कोणताही प्रसंग समोर आला तरी त्याला धैर्याने तोंड देवून जिद्दीने आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत रहावे. जगात अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी येथे केले.अनेक महिला विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या जीवनाची पुढील वाटचाल करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी वैशाली राजमाने यांनी काही महत्वाच्या ' टिप्स' यावेळी दिल्या. त्या म्हणाल्या, महिला कोणत्याही उच्च पदावर चांगले काम करू शकतात, हे माझ्या स्वानुभवावरून मी सांगते. लहानपणापासून मोठ्या अधिकारी पदावर काम करायचे स्वप्न मी बघितले होते. ते आता पूर्ण झाले आहे.

अजूनही प्रशासकीय सेवेत मला मोठा पल्ला गाठायचा आहे. इतर महिलांनीही मोठी स्वप्ने बघावीत. त्यासाठी योग्य नियोजन करावे आणि आवश्यक ते शिक्षण घ्यावे, वाचन करावे. असे झाल्यास आपल्यापासून यश दूर नाही. फक्त उच्च शिक्षण घेऊन चालणार नाही. तर आपल्याला जीवनात नेमके काय बनायचे आहे ? हे प्रथम ठरवावे लागेल. तसेच त्यादृष्टीने वाटचाल करावी लागेल.तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरी आपल्या कामाशी प्रामाणिक राहून चांगले काम केले तर यश निश्चित मिळते. शिक्षकी पेशा मध्ये काम करताना दररोज एकसुरी काम करन्याचा आपल्याला कदाचित कंटाळा येऊ शकतो. अर्थात त्या क्षेत्रातही विविध विषयांवर संशोधन करू शकतो.मात्र, प्रशासकीय सेवेत विविधांगी विषय हाताळावे लागत असल्याने दिवसेंदिवस आपले व्यक्तिमत्वही बदलत जाते. प्रगल्भता वाढते. सर्वांगीण विकास होतो. सामान्य जनतेसाठी काही तरी रचनात्मक काम केल्याचे मिळणारे समाधान, आनंद यापेक्षा आपल्याला आणखीन काय हवे असते. त्यामुळे मुलींनी प्रशासकीय सेवेत बिनधास्त यावे.

आपल्या बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तुंग भरारी घ्यावी. आपल्या गावाबरोबरच जिल्ह्याचे ,राज्याचे , कुटुंबियांचे नाव रोशन करावे आणि समाधान मिळवावे. असेही वैशाली राजमाने यांनी यावेळी सांगितले.त्या म्हणाल्या , एम. एस. सी.( फिजिक्स) व एम. एड. पर्यंतचे शिक्षक मी घेतले. माझे आई, वडील तसेच पती व इतर कुटुंबीय यांना मी मोठ्या पदावर काम करतानाच जनसेवा करावी असे नेहमी वाटत असे . त्यानी तसे बोलूनही दाखविले होते. आपल्यातील ' टॅलेंट' चा वापर कर असे ते मला सांगत असत. वेळोवेळी त्यांचे प्रोत्साहन लाभल्याने सन १९९९ मध्ये लोकसेवाआयोगाची परीक्षा मी उत्तीर्ण झाले. माझ्या परिश्रमाना यश आले.त्यानंतर सन २००१ मध्ये सातारा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदी मी रुजू झाले. प्रशासकीय सेवेतील या प्रारंभानंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच खटाव व पुणे येथे काम करण्याची संधी मिळाली.

हातकणंगले येथे तहसीलदार म्हणून काम केल्यानंतर कणकवली येथे प्रांताधिकारी पदावर नियुक्ती झाली . त्यामुळे आता प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर काम करत असताना आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा वापर करून जनसेवा करायला मिळत असल्याबाबत समाधान वाटते. असेही त्या म्हणाल्या .

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीWomenमहिला