शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

ध्येय निश्चिती करून प्रयत्न करणे महत्वाचे !: प्रांताधिकारी वैशाली राजमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:31 IST

Tahasildar, Woman, Kankavli, Sindhudurnews महिलांनी स्वतःवरचा विश्वास कधीही डळमळू देऊ नये. कोणताही प्रसंग समोर आला तरी त्याला धैर्याने तोंड देवून जिद्दीने आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत रहावे. जगात अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी येथे केले.

ठळक मुद्देध्येय निश्चिती करून प्रयत्न करणे महत्वाचे !प्रांताधिकारी वैशाली राजमाने

कणकवली : महिलांनी स्वतःवरचा विश्वास कधीही डळमळू देऊ नये. कोणताही प्रसंग समोर आला तरी त्याला धैर्याने तोंड देवून जिद्दीने आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत रहावे. जगात अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी येथे केले.अनेक महिला विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या जीवनाची पुढील वाटचाल करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी वैशाली राजमाने यांनी काही महत्वाच्या ' टिप्स' यावेळी दिल्या. त्या म्हणाल्या, महिला कोणत्याही उच्च पदावर चांगले काम करू शकतात, हे माझ्या स्वानुभवावरून मी सांगते. लहानपणापासून मोठ्या अधिकारी पदावर काम करायचे स्वप्न मी बघितले होते. ते आता पूर्ण झाले आहे.

अजूनही प्रशासकीय सेवेत मला मोठा पल्ला गाठायचा आहे. इतर महिलांनीही मोठी स्वप्ने बघावीत. त्यासाठी योग्य नियोजन करावे आणि आवश्यक ते शिक्षण घ्यावे, वाचन करावे. असे झाल्यास आपल्यापासून यश दूर नाही. फक्त उच्च शिक्षण घेऊन चालणार नाही. तर आपल्याला जीवनात नेमके काय बनायचे आहे ? हे प्रथम ठरवावे लागेल. तसेच त्यादृष्टीने वाटचाल करावी लागेल.तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरी आपल्या कामाशी प्रामाणिक राहून चांगले काम केले तर यश निश्चित मिळते. शिक्षकी पेशा मध्ये काम करताना दररोज एकसुरी काम करन्याचा आपल्याला कदाचित कंटाळा येऊ शकतो. अर्थात त्या क्षेत्रातही विविध विषयांवर संशोधन करू शकतो.मात्र, प्रशासकीय सेवेत विविधांगी विषय हाताळावे लागत असल्याने दिवसेंदिवस आपले व्यक्तिमत्वही बदलत जाते. प्रगल्भता वाढते. सर्वांगीण विकास होतो. सामान्य जनतेसाठी काही तरी रचनात्मक काम केल्याचे मिळणारे समाधान, आनंद यापेक्षा आपल्याला आणखीन काय हवे असते. त्यामुळे मुलींनी प्रशासकीय सेवेत बिनधास्त यावे.

आपल्या बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तुंग भरारी घ्यावी. आपल्या गावाबरोबरच जिल्ह्याचे ,राज्याचे , कुटुंबियांचे नाव रोशन करावे आणि समाधान मिळवावे. असेही वैशाली राजमाने यांनी यावेळी सांगितले.त्या म्हणाल्या , एम. एस. सी.( फिजिक्स) व एम. एड. पर्यंतचे शिक्षक मी घेतले. माझे आई, वडील तसेच पती व इतर कुटुंबीय यांना मी मोठ्या पदावर काम करतानाच जनसेवा करावी असे नेहमी वाटत असे . त्यानी तसे बोलूनही दाखविले होते. आपल्यातील ' टॅलेंट' चा वापर कर असे ते मला सांगत असत. वेळोवेळी त्यांचे प्रोत्साहन लाभल्याने सन १९९९ मध्ये लोकसेवाआयोगाची परीक्षा मी उत्तीर्ण झाले. माझ्या परिश्रमाना यश आले.त्यानंतर सन २००१ मध्ये सातारा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदी मी रुजू झाले. प्रशासकीय सेवेतील या प्रारंभानंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच खटाव व पुणे येथे काम करण्याची संधी मिळाली.

हातकणंगले येथे तहसीलदार म्हणून काम केल्यानंतर कणकवली येथे प्रांताधिकारी पदावर नियुक्ती झाली . त्यामुळे आता प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर काम करत असताना आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा वापर करून जनसेवा करायला मिळत असल्याबाबत समाधान वाटते. असेही त्या म्हणाल्या .

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीWomenमहिला