शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

"जलसंधारणच्या कामांची सखोल चौकशी करा, ठराविक ठेकेदारांची दादागिरी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:27 IST

राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारण विभागामध्ये ठेकेदारांची प्रचंड दादागिरी चालली आहे. याकामांमध्ये मोठी साखळी कार्यरत असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार करणार आहोत. तसेच त्या कामांची सखोल चौकशी करत कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. भाजप कार्यालय येथे आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राजन तेली म्हणाले, राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ नव्याने निविदा निघाल्या होत्या. ३००-३५० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत. जलसंधारण विभागात स्वतःचे वर्चस्व निर्माण करीत काही ठेकेदार काम करतात. धरण बांधतात, पण तेथील भूसंपादन होत नाही. शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळत नाहीत. हा सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे.सावडाव येथे २०१० साली धरण झाले. आता त्याची  दुरुस्ती केली जात आहे. करंजे, कुंभवडे, वर्दे, आंब्रड, शिरवल या धरण प्रकल्पांचे काम सुरू असले तरी तेथील  भूसंपादन आजही झालेले नाही. याला जबाबदार कोण? जलसंधारणची कामे होतात, मात्र, त्यांचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व अन्य धरण प्रकल्प आहेत.त्या तालुक्यात अजून ५-६ प्रकल्प होत आहेत. त्यांचा काय उपयोग ? त्यामुळे पैशाची लयलूट थांबली पाहिजे.गरज नसलेल्या ठिकाणीही ठेकेदार कामे काढतात.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही तेली म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प