शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"जलसंधारणच्या कामांची सखोल चौकशी करा, ठराविक ठेकेदारांची दादागिरी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:27 IST

राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारण विभागामध्ये ठेकेदारांची प्रचंड दादागिरी चालली आहे. याकामांमध्ये मोठी साखळी कार्यरत असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार करणार आहोत. तसेच त्या कामांची सखोल चौकशी करत कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. भाजप कार्यालय येथे आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राजन तेली म्हणाले, राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ नव्याने निविदा निघाल्या होत्या. ३००-३५० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत. जलसंधारण विभागात स्वतःचे वर्चस्व निर्माण करीत काही ठेकेदार काम करतात. धरण बांधतात, पण तेथील भूसंपादन होत नाही. शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळत नाहीत. हा सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे.सावडाव येथे २०१० साली धरण झाले. आता त्याची  दुरुस्ती केली जात आहे. करंजे, कुंभवडे, वर्दे, आंब्रड, शिरवल या धरण प्रकल्पांचे काम सुरू असले तरी तेथील  भूसंपादन आजही झालेले नाही. याला जबाबदार कोण? जलसंधारणची कामे होतात, मात्र, त्यांचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व अन्य धरण प्रकल्प आहेत.त्या तालुक्यात अजून ५-६ प्रकल्प होत आहेत. त्यांचा काय उपयोग ? त्यामुळे पैशाची लयलूट थांबली पाहिजे.गरज नसलेल्या ठिकाणीही ठेकेदार कामे काढतात.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही तेली म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प