शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

इन्सुली ग्रामस्थांचे खड्ड्यांत बसून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:43 IST

highway, road, sindhudurgnews मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीपासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्यापर्यंत अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे इन्सुली ग्रामस्थांनी कुडवटेंब येथे खड्ड्यांत बसून  आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी येईपर्यंत सुमारे दोन तास केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली.

ठळक मुद्देइन्सुली ग्रामस्थांचे खड्ड्यांत बसून आंदोलन रस्ता सुरळीत करण्याचे महामार्ग विभागाचे आश्वासन

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीपासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्यापर्यंत अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे इन्सुली ग्रामस्थांनी कुडवटेंब येथे खड्ड्यांत बसून  आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी येईपर्यंत सुमारे दोन तास केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली.

यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी अनिल आवटी यांनी आठ दिवसांत खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर इन्सुली ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. गेले अनेक महिने खड्डे पडूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने त्यांना जाग आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वागत नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांत बसून इन्सुली कुडवटेंब येथे गुरुवारी आंदोलन केले.या महामार्गावरील इन्सुली घाटापासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्यापर्यंत रस्ता खड्डेमय झाला आहे. या खड्ड्यांत बरेच अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. त्यात काहींना गंभीर दुखापत होऊन अपंगत्व आले आहे. तर दुचाकीवरून या ठिकाणाहून प्रवास करणे वाहन चालकांना खूपच जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी स्वागत नाटेकर, माजी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, नंदू पालव, नाना पेडणेकर, माजी उपसरपंच सत्यवान केरकर, ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, केतन वेंगुर्लेकर, गजानन गायतोंडे, बाबलो झाट्ये, पिंटो हांडेकर, बाळा कापडोसकर, जयराम पालव, रवी परब, हरी तारी, प्रिया नाटेकर, महादेव पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग